मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा प्रश्न अखेर निकाली
By Admin | Updated: May 23, 2014 00:18 IST2014-05-23T00:18:04+5:302014-05-23T00:18:04+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांनी शासनाशी चर्चा करून मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला.

मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा प्रश्न अखेर निकाली
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांनी शासनाशी चर्चा करून मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला. संपूर्ण महाराष्टÑात समायोजनामुळे होणार्या बदल्या २० पटसंख्येच्या अटीमुळे जादा होणारे शिक्षक आरटीई अॅक्टमुळे जादा होणारे मुख्याध्यापकांची पदे यामुळे महाराष्टÑात पाच ते सहा हजार शिक्षकांचे स्थानांतरण होणार होते. तसेच पटसंख्येच्या अटीमुळे तीन हजार मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले होते. यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा जवळपास ३०० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरलेले होते. त्यांचे समायोजन करताना सहायक शिक्षकावर अन्याय झाला आहे. मुख्याध्यापकांनासुद्धा सहायक शिक्षक या पदावर काम करावे लागत आहे. तसेच शाळेवर फार मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुख्याध्यापकांच्या समायोजनामुळे परिक्षेचा निकाल, टीसी देणे, पटनोंदणी, मुलांचे प्रवेश, पोषण आहार योजनेचा हिशेब, गणवेश वाटप, पाठ्यपुस्तक वाटप आदी कामांमध्ये अडथळे निर्माण झालेले होते. अनेक मुख्याध्यापकांना पंचायत समितीबाहेर जावे लागत होते तर काही मुख्याध्यापकांना जिल्ह्याबाहेर सुद्धा जावे लागणार होते. या सर्व बाबींचा विचार करुन महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजारामजी वरुटे, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, प्रा.एस.डी. पाटील, राज्य सरचिटणीस आप्पासाहेब कुल, बाळासाहेब तांबारे, अंबादास वाजे, सुभाष धवसे, प्रदीप गंधेवार, प्रकाश येरमे यांनी महाराष्टÑ शासनाशी चर्चा करुन मुख्याध्यापकाच्या समायोजनाचा महत्वाचा प्रश्न सोडविला आहे. आरटीई अॅक्टनुसार इयत्ता १ ते ५ साठी १५० पटसंख्येला एक मुख्याध्यापक तसेच ६ ते ८ साठी १०० पटसंख्येला एक मुख्याध्यापक असे धोरण निश्चित करण्यात आले होते. शासनाशी झालेल्या चर्चेनुसार इयत्ता १ ते ७ साठी एकूण पटसंख्या १५१ वर व त्यापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना एक मुख्याध्यापक देण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांची पदे, शिक्षकांच्या बदल्या, समायोजन, शालेय पोषण आहार योजना, निमशिक्षक, अंशकालीन निदेशक, रजा सवलत, महिलांना बदल्यात सवलत या आणि अशा सर्व जटील मागण्या महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघानेच शासनाकडून मंजूर करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांनी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ध्येय धोरणाखाली एकत्रित यावे व या संघटनेचे सभासदत्व स्वीकारून संघटनेचे हात मजबूत करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुभाष धवसे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप गंधेवार, सुभाष पाचभाई, पुंडलीक बुटले, सुुंदरदास कांबळे, प्रकाश येरमे, भगवंत राऊत, राजेंद्र एकोणकार, संजय इंगोले, गुणवंतराव कोंबे, दिलीप वानखडे, प्रशिक नंदूरकर, विनोद पाटील डंभारे, मारोती उघडे, राजेंद्र गावंडे, अरुण सोनकुसरे, अनिता हाडे, अशोक म्हस्के, सुरेंद्र गडदे, सुनीता ढोणे, विद्या राऊत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)