शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुसदकरांना आता दररोज पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:40 IST

शहराला दोन दिवसाआड होत असलेला पाणीपुरवठा रद्द करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. आता १६ जुलैपासून दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून प्रारंभ : नगर परिषदेचा निर्णय, पूूसमध्ये ७0 टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराला दोन दिवसाआड होत असलेला पाणीपुरवठा रद्द करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. आता १६ जुलैपासून दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.मागीलवर्षी पूस धरण परिसरात अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे धरणातील जलसाठा कमी झाला होता. त्यामुळे नगरपरिषदेने डिसेंबरपासून शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला होता. नंतर धरणातील जलसाठा कमी होताच जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. नगरपरिषदेच्या नियोजनबद्ध पद्धतीमुळे उन्हाळ्यात पुसदकरांना तीन दिवसाआड का होईना, पाणी मिळत होते. त्यामुळे पुसदकरांना पाणीटंचाईची फारशी झळ बसली नव्हती.मागील सहा महिन्यांपासून पुसदला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. जून महिन्याच्या सुरूवातीपासून पूस धरण परिसर व धरणाच्यावरील वाशीम, अनसिंग, लाखी या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणातील जलसाठ्यात वाढ होत गेली. सध्या ७० टक्के पाणीसाठा आहे. मे महिन्यात पूस धरणात केवळ ३ टक्के जलसाठा होता. आता धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्याने दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.अतिरिक्त पाणीसाठा करावासोमवारपासून नगरपरिषद प्रशासन दररोज पाणी पुरवठा करणार असले, तरी नागरिकांनी एक दिवसाचा अतिरिक्त पाणीसाठा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी आल्यास जलशुद्धीकरण कामात अडथळा येतो. त्यामुळे पाणी पुरवठा कदाचित खंडित होण्याची शक्यता असतते. त्यामुळे पुसदकरांनी सध्या अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती राजु दुधे यांनी केले आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई