शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

पुसदची आरोग्य यंत्रणा सुस्तावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:37 PM

विविध प्रकारच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. मात्र शासकीय रुग्णालयांची यंत्रणा सुस्तावली आहे. परिणाम गरीब नागरिकांनाही खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्येत वाढ : अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : विविध प्रकारच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. मात्र शासकीय रुग्णालयांची यंत्रणा सुस्तावली आहे. परिणाम गरीब नागरिकांनाही खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यातूनच डेग्यूची लक्षणे दिसत असलेले रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहे. स्क्रब टायफसची लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. अशावेळी सरकारी रुग्णालयात तत्काळ आणि प्रभावी उपचार होणे अपेक्षित आहे. मात्र या रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारीही लोकांच्या आरोग्या प्रती गंभीर नाही.प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधलेली आहे. त्याचा उपयोग अपवादानेच घेतला जात आहे. अधिकारी तर सोयीच्या ठिकाणाहून ड्युटी सांभाळत आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर उपचारासाठी नागरिक डॉक्टरच्या प्रतिक्षेत थांबून असतात. तापाने फणफणत असलेला रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा अशी आशा असते. परंतु डॉक्टरच वेळेवर येत नाही. रुग्णालयात वाढलेल्या गर्दीमुळे थातूरमातूर तपासणी करून औषधोपचार केला जातो. बरेच दिवसपर्यंत रुग्ण या आजारातून बाहेर पडत नाही.अधिकाºयांसोबतच कर्मचारीही रुग्णालयातच वेळेवर पोहोचत नाही. औषधोपचाराची माहिती योग्यरित्या दिली जात नाही. दाखल असलेल्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाही. यासर्व कारणांमुळे नागरिक खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. उधार उसनवार करून शहरातील दवाखान्यात उपचार घेतात. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी ठरत आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठही याप्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते.लोकप्रतिनिधींकडून निराशास्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींकडूनही लोकांच्या पदरी निराशा येत आहे. सरकारी रुग्णालयांचा कारभार सुधारण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी सोईची भूमिका घेतली जाते. यात त्रास मात्र गरीब लोकांना होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल