पुसदमध्ये दोन दिवसात २३ कोरोना रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:37+5:30
शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. ५ ऑगस्टला १४५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात गणेश वॉर्डातील चार, मोतीनगर चार, गांधीनगर तीन, पार्डी येथील दोन, निंबी येथील एक , रामनगर एक, लक्ष्मीनगर एक व द्वारकानगरीतील एकाचा समावेश आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नंदपूर, बेलुरा व इसापूर येथील चौघांचा समावेश आहे.

पुसदमध्ये दोन दिवसात २३ कोरोना रुग्ण वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत आणखी २३ रुग्णांची भर पडली. याशिवाय तालुक्यातील बेलोरा येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे शहर व तालुक्यात दहशत पसरली आहे.
गेल्या पंधरवड्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत नव्याने १७ रुग्णांची भर पडली. शुक्रवारी अॅन्टीजन चाचणीमध्ये दोन व आणखी चार रुग्णांची भर पडली. शुक्रवारी दुपारपर्यंत २३ रुग्ण वाढले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची आकडा आता ३८५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत तब्बल २७१ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तूर्तास तालुक्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १०३ वर पोहोचल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले.
शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. ५ ऑगस्टला १४५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात गणेश वॉर्डातील चार, मोतीनगर चार, गांधीनगर तीन, पार्डी येथील दोन, निंबी येथील एक , रामनगर एक, लक्ष्मीनगर एक व द्वारकानगरीतील एकाचा समावेश आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नंदपूर, बेलुरा व इसापूर येथील चौघांचा समावेश आहे. याशिवाय गुरुवारी बेलोरा येथील एका ७६ वर्षीय महिलेला प्रकृती खालावल्याने यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती डॉ.आशीष पवार यांनी दिली. यामुळे तालुक्यात कोरोनाबळींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. यामुळे शहरासह खेडयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी सूचनांचे पालन करावे
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, नियमित मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासन व प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच विविध सूचना दिल्याचे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, बीडीओ शिवाजी गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांनी स्पष्ट केले.