शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पुसदमध्ये तूर खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:39 IST

खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय वाद : अचानक निर्णय, शेतकऱ्यांना न्याय देणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या २ मेपासून नाफेडने पुसदला तूर खरेदी सुरू केली. ७ मेपर्यंत दोन हजार ५०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. १५ मेपर्यंत नाफेड तूर खरेदी करणार होते. दरम्यान, यावर्षी आत्तापर्यंत १० हजार ३८८ क्विंटल एवढीच तूर खरेदी करण्यात आली. नाफेडकडे एक हजार ६६९ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ९४१ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. दररोज सरासरी ३२० क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. आता शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष व सचिव यांच्यात आपसी वाद झाला. या वादात नाफेडने १० मेपासून अचानक तूर खरेदी बंद केली.तालुक्यातील ७२८ शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे अद्याप बाकी आहे. बहुसंख्य शेतकºयांची तूर अद्यापही घरीच शिल्लक असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत पाच हजार ५० रुपये प्रति क्विंटल दराने बाजार समितीच्या मार्केट यार्डात तूर खरेदी सुरु होती. व्यापाऱ्यांकडे साडे तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकण्याकरिता पसंती दिली. मात्र नाफेडची तूर खरेदी संथगतीने सुरू होती. त्यात प्रशासकीय यंत्रणेची अचानक खोडी आली व खरेदी बंद झाल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून सुरळीत सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी प्रशासकीय यंत्रणेच्या हेकेखोर वृत्तीमुळे गुरूवार, १० मे रोजी अचानक बंद झाल्याने शेतकरी संतापले आहे. तसेही १५ मेपासून नाफेडची तूर खरेदी बंद होणार होती. मात्र पाच दिवस शिल्लक असतानााच खरेदी बंद झाल्याने तालुक्यातील ७२८ तूर उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे.आमदारांनी पुढाकार घेण्याची गरजआमदार मनोहरराव नाईक यांनी स्वत: पुढाकार घेऊन शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय क्षेत्रातील आपसी वाद मिटविण्यासाठी आमदार नाईक यांनी पुढाकार घ्यावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.