शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

पुसदमध्ये तूर खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:39 IST

खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय वाद : अचानक निर्णय, शेतकऱ्यांना न्याय देणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या २ मेपासून नाफेडने पुसदला तूर खरेदी सुरू केली. ७ मेपर्यंत दोन हजार ५०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. १५ मेपर्यंत नाफेड तूर खरेदी करणार होते. दरम्यान, यावर्षी आत्तापर्यंत १० हजार ३८८ क्विंटल एवढीच तूर खरेदी करण्यात आली. नाफेडकडे एक हजार ६६९ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ९४१ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. दररोज सरासरी ३२० क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. आता शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष व सचिव यांच्यात आपसी वाद झाला. या वादात नाफेडने १० मेपासून अचानक तूर खरेदी बंद केली.तालुक्यातील ७२८ शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे अद्याप बाकी आहे. बहुसंख्य शेतकºयांची तूर अद्यापही घरीच शिल्लक असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत पाच हजार ५० रुपये प्रति क्विंटल दराने बाजार समितीच्या मार्केट यार्डात तूर खरेदी सुरु होती. व्यापाऱ्यांकडे साडे तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकण्याकरिता पसंती दिली. मात्र नाफेडची तूर खरेदी संथगतीने सुरू होती. त्यात प्रशासकीय यंत्रणेची अचानक खोडी आली व खरेदी बंद झाल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून सुरळीत सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी प्रशासकीय यंत्रणेच्या हेकेखोर वृत्तीमुळे गुरूवार, १० मे रोजी अचानक बंद झाल्याने शेतकरी संतापले आहे. तसेही १५ मेपासून नाफेडची तूर खरेदी बंद होणार होती. मात्र पाच दिवस शिल्लक असतानााच खरेदी बंद झाल्याने तालुक्यातील ७२८ तूर उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे.आमदारांनी पुढाकार घेण्याची गरजआमदार मनोहरराव नाईक यांनी स्वत: पुढाकार घेऊन शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय क्षेत्रातील आपसी वाद मिटविण्यासाठी आमदार नाईक यांनी पुढाकार घ्यावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.