शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

पुसदमध्ये तूर खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:39 IST

खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय वाद : अचानक निर्णय, शेतकऱ्यांना न्याय देणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या २ मेपासून नाफेडने पुसदला तूर खरेदी सुरू केली. ७ मेपर्यंत दोन हजार ५०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. १५ मेपर्यंत नाफेड तूर खरेदी करणार होते. दरम्यान, यावर्षी आत्तापर्यंत १० हजार ३८८ क्विंटल एवढीच तूर खरेदी करण्यात आली. नाफेडकडे एक हजार ६६९ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ९४१ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. दररोज सरासरी ३२० क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. आता शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष व सचिव यांच्यात आपसी वाद झाला. या वादात नाफेडने १० मेपासून अचानक तूर खरेदी बंद केली.तालुक्यातील ७२८ शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे अद्याप बाकी आहे. बहुसंख्य शेतकºयांची तूर अद्यापही घरीच शिल्लक असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत पाच हजार ५० रुपये प्रति क्विंटल दराने बाजार समितीच्या मार्केट यार्डात तूर खरेदी सुरु होती. व्यापाऱ्यांकडे साडे तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकण्याकरिता पसंती दिली. मात्र नाफेडची तूर खरेदी संथगतीने सुरू होती. त्यात प्रशासकीय यंत्रणेची अचानक खोडी आली व खरेदी बंद झाल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून सुरळीत सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी प्रशासकीय यंत्रणेच्या हेकेखोर वृत्तीमुळे गुरूवार, १० मे रोजी अचानक बंद झाल्याने शेतकरी संतापले आहे. तसेही १५ मेपासून नाफेडची तूर खरेदी बंद होणार होती. मात्र पाच दिवस शिल्लक असतानााच खरेदी बंद झाल्याने तालुक्यातील ७२८ तूर उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे.आमदारांनी पुढाकार घेण्याची गरजआमदार मनोहरराव नाईक यांनी स्वत: पुढाकार घेऊन शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय क्षेत्रातील आपसी वाद मिटविण्यासाठी आमदार नाईक यांनी पुढाकार घ्यावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.