शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

वनविभागाविरुद्ध जनक्षोभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:28 IST

वाघिणीने ठार मारलेल्या शेतकºयाच्या घरापर्यंत जाण्याची ४८ तास उलटूनही वन विभागाने तसदी घेतली नसल्याने राळेगाव तालुक्यात वन विभागाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो नागरिक राळेगाव ठाण्यावर पोहोचले.

ठळक मुद्देवाघिणीचा बारावा बळी : ‘सीसीएफ’वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : वाघिणीने ठार मारलेल्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाण्याची ४८ तास उलटूनही वन विभागाने तसदी घेतली नसल्याने राळेगाव तालुक्यात वन विभागाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो नागरिक राळेगाव ठाण्यावर पोहोचले. मुख्य वनसंरक्षकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला.गेल्या दीड वर्षांपासून राळेगाव, कळंब, केळापूर या तालुक्यातील दोन डझन गावात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. दर महिन्या-दोन महिन्यात एक बळी वाघीण घेत आहे. दरवेळी शासन वाघबळी कुटुंबांची आर्थिक मदत करून बोळवण करते. परंतु अद्यापपर्यंत या वाघिणीचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला यश आले नाही. दरम्यान लोणी येथील रामा कोंडबा शेंदरे या शेतकºयाचा शनिवारी वाघिणीने फडशा पाडला. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच एकापाठोपाठ एक बळी जात असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. लोणी, वरध परिसरातील शेकडो नागरिक रविवारी राळेगाव पोलीस ठाण्यावर धडकले. ठाणेदार संजय खंदाडे यांना निवेदन देऊन मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. आणखी किती बळी हवे आहेत. वाघिणीचा बंदोबस्त केव्हा करणार, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त नागरिकांचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, अरविंद फुटाणे, अरविंद वाढोणकर, अशोक केवटे, प्रवीण कोकाटे, विजय तेलंगे, विनोद भोकरे, बळवंत जगराळे, रवी गलांडे यांनी केले. दरम्यान माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी पोलीस ठाण्यात येऊन कारवाईबाबत विचारणा केली.उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. शहरातही चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले होते.नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखलेवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राळेगावात येऊन आमच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करावी. त्यानंतरच शवविच्छेदन करू दिले जाईल, अशी भूमिका रामाजी शेंदरे यांच्या नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. या नातेवाईकांची समजूत तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वृत्तलिहिस्तोवर शवविच्छेदनाला सुरुवात झाली नव्हती.कुटुंब उघड्यावररामाजी शेंदरे यांचा वाघिणने बळी घेतल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. यापूर्वी शेतात काहीच पिकले नाही. त्यामुळे रबीत निदान गहू पेरुन संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी रामाजी स्वत:च्या नऊ एकर शेतात मशागतीकरिता कुटुंबासह गेले होते. कुटुंबातील इतर सदस्य दुसरीकडे काम करीत असताना वाघाने झडप घालून त्यांच्या नरडीचा घोट घेतला. त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई, मुलगा नारायण असा परिवार आहे.