शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

वनविभागाविरुद्ध जनक्षोभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:28 IST

वाघिणीने ठार मारलेल्या शेतकºयाच्या घरापर्यंत जाण्याची ४८ तास उलटूनही वन विभागाने तसदी घेतली नसल्याने राळेगाव तालुक्यात वन विभागाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो नागरिक राळेगाव ठाण्यावर पोहोचले.

ठळक मुद्देवाघिणीचा बारावा बळी : ‘सीसीएफ’वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : वाघिणीने ठार मारलेल्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाण्याची ४८ तास उलटूनही वन विभागाने तसदी घेतली नसल्याने राळेगाव तालुक्यात वन विभागाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो नागरिक राळेगाव ठाण्यावर पोहोचले. मुख्य वनसंरक्षकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला.गेल्या दीड वर्षांपासून राळेगाव, कळंब, केळापूर या तालुक्यातील दोन डझन गावात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. दर महिन्या-दोन महिन्यात एक बळी वाघीण घेत आहे. दरवेळी शासन वाघबळी कुटुंबांची आर्थिक मदत करून बोळवण करते. परंतु अद्यापपर्यंत या वाघिणीचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला यश आले नाही. दरम्यान लोणी येथील रामा कोंडबा शेंदरे या शेतकºयाचा शनिवारी वाघिणीने फडशा पाडला. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच एकापाठोपाठ एक बळी जात असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. लोणी, वरध परिसरातील शेकडो नागरिक रविवारी राळेगाव पोलीस ठाण्यावर धडकले. ठाणेदार संजय खंदाडे यांना निवेदन देऊन मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. आणखी किती बळी हवे आहेत. वाघिणीचा बंदोबस्त केव्हा करणार, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त नागरिकांचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, अरविंद फुटाणे, अरविंद वाढोणकर, अशोक केवटे, प्रवीण कोकाटे, विजय तेलंगे, विनोद भोकरे, बळवंत जगराळे, रवी गलांडे यांनी केले. दरम्यान माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी पोलीस ठाण्यात येऊन कारवाईबाबत विचारणा केली.उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. शहरातही चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले होते.नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखलेवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राळेगावात येऊन आमच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करावी. त्यानंतरच शवविच्छेदन करू दिले जाईल, अशी भूमिका रामाजी शेंदरे यांच्या नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. या नातेवाईकांची समजूत तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वृत्तलिहिस्तोवर शवविच्छेदनाला सुरुवात झाली नव्हती.कुटुंब उघड्यावररामाजी शेंदरे यांचा वाघिणने बळी घेतल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. यापूर्वी शेतात काहीच पिकले नाही. त्यामुळे रबीत निदान गहू पेरुन संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी रामाजी स्वत:च्या नऊ एकर शेतात मशागतीकरिता कुटुंबासह गेले होते. कुटुंबातील इतर सदस्य दुसरीकडे काम करीत असताना वाघाने झडप घालून त्यांच्या नरडीचा घोट घेतला. त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई, मुलगा नारायण असा परिवार आहे.