शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

ग्रामीण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकामे अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 2:01 PM

लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणार, शासनाचे अद्यापही नियोजन नाही

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असल्याने दोन महिन्यांपासून सर्वकाही ठप्प आहे. सार्वजनिक बांधकामे जानेवारी ते जून या काळात केली जातात. परंतु यावर्षी फेब्रुवारीपासूनच कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने शासनाचे या कामांकडे दुर्लक्ष झाले. लॉकडाऊनमुळे ही कामे अर्धवट स्थितीत आहेत. नवा पूल बांधायचा म्हणून जुना पूल तोडला गेला, बांधकामासाठी रस्ता उखडून ठेवण्यात आला, अनेक इमारतींची कामे अर्धवट आहेत. पावसाळा महिनाभरावर आला तरीही अर्धवट बांधकामे पूर्ण करण्याबाबत किंवा किमान सुस्थितीत आणून ठेवण्याबाबत शासनाचे कोणतेही नियोजन नाही. ही कामे आहे त्याच अवस्थेत राहिल्यास ग्रामीण जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागेल, त्यात पावसाळ्यात जीवित हानी होण्याची, गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

शासनाने शेकडो कोटी परत घेतले२५ मार्चला शासनाने बांधकाम खात्याला निधी दिला. परंतु बीडीएस प्रणाली बंद करून शासनाने ३१ मार्चला शेकडो कोटी रुपये बांधकाम खात्याकडून परत घेतले. शिवाय भविष्यात निधी केव्हा उपलब्ध होणार याबाबतचे कोणतेही सूतोवाच करण्यात आलेले नाही. त्यामुळे कामे सुरू करण्यास कंत्राटदार तयार नाहीत.कंत्राटदारांची शेकडो कोटींची देयके थकीतआधीच कंत्राटदारांची शेकडो कोटींची देयके थकीत आहे. शासनाचा पैसा घेऊनही ही देयके मिळालेली नाहीत. निधी केव्हा उपलब्ध होणार याबाबत शासनाने आठवडाभरात स्पष्ट धोरण जाहीर करणे अपेक्षित आहे. एकूणच सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंते व कंत्राटदारांमध्येसुद्धा संभ्रमाची स्थिती आहे.

पावसाळ्यात डांबर-काँक्रीटीकरण अशक्यशासनाने जूनच्या तोंडावर निधी दिल्यास पावसाळ्यात डांबरीकरण, काँक्रीटीकरण किंवा अन्य बांधकामे करणे अशक्य आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला या अपूर्ण बांधकामांचा त्रास सहन करावा लागेल. शासन प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अभियंत्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे ग्रामीण समस्या कायम राहतात, असा सूर बांधकाम खात्यातून ऐकायला मिळतो.‘पीएमजीएसवाय’ला निधीचे ग्रहणप्रत्येक जिल्ह्यात ‘पीएमजीएसवाय’ची २५ ते ३० कोटींची देयके प्रलंबित आहेत. शासनाने समृद्धी महामार्ग, हायब्रीड अ‍ॅन्युईटी, केंद्रीय रस्ते निधी ही कामे तूर्त बाजूला ठेवून आधी ग्रामीण बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार