मोबाईल कंपन्यांमध्ये पेटले प्रचारयुद्ध

By Admin | Updated: June 10, 2016 02:35 IST2016-06-10T02:35:58+5:302016-06-10T02:35:58+5:30

वणी शहरात येत्या काही दिवसात ४-जी नेटवर्कींग सेवा सुरू होणार आहे. सध्या या ४-जी सीमचा ग्राहकांना काहीच लाभ होत नाही.

Promotional campaign against mobile companies | मोबाईल कंपन्यांमध्ये पेटले प्रचारयुद्ध

मोबाईल कंपन्यांमध्ये पेटले प्रचारयुद्ध

फोर-जी सेवा : ग्राहकांपुढे निर्माण झाला संभ्रम
वणी : वणी शहरात येत्या काही दिवसात ४-जी नेटवर्कींग सेवा सुरू होणार आहे. सध्या या ४-जी सीमचा ग्राहकांना काहीच लाभ होत नाही. या ४-जीच्या सेवेकरिता तीन मोठ्या कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वत्र युद्ध पेटल्याचे दिसून येत आहे.
वणीत ४-जी सेवा सुरू झाल्यास इंटरनेटला चांगली स्पीड मिळण्याची शक्यता आहे. हीच बाब हेरून काही मोबाईल कंपन्या वणीत ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नरत आहे. ग्राहकांची अनेक कामे या ४-जीमुळे गतीमान होणार आहे. त्यामुळे अनेकांना आता ४-जीचे जणू काही वेडच लागले आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांनीही ग्राहकांना विविध प्रलोभने देणे सुरू केले आहे. ग्राहक मोबाईल कंपन्यांच्या आमिषाला बळी पडून पूर्वीच्या २-जी व ३-जी नेटवर्कींग सेवेला ४-जीमध्ये कन्व्हर्ट करण्याकरिता धडपड करीत आहे. याला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरात अद्याप ४-जी सेवा सुरू झाली नाही. तरीही ४-जीमध्ये सीम कन्व्हर्ट करा व १ जी.बी.डाटा मोफत मिळवा, असा प्रचार संबंधित कंपन्यांकडून सुरू झाला आहे. त्यानुसार अनेकांनी त्यांचे पूर्वीचे सीम ४-जीमध्ये कन्व्हर्ट केले आहे.
सध्या वणीत नावापुरतीच ४-जी सेवा सुरू आहे. नेटची स्पीड ३-जीपेक्षा जास्त वाढत नाही. उलट त्याचा डाटा लवकर संपतो. मात्र त्यावर ४-जीचे शुल्क लागते व कॉल रेटच्या दरातही बदल होतो. तरीही ग्राहक कंपन्यांच्या आमिषाला बळी पडत आहे.
ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता संबंधित कंपन्या किरकोळ व्यावसायीकांना आय.सी.एम. सुरू करण्याकरिता प्रत्येक ग्राहकामागे ३० ते ४० रूपये देते. ग्राहक त्यांच्याकडून सेवा ोतात. मात्र वणीत अद्याप सेवा सुरू झाली नाही. ४-जी सेवा सुरू झाली का, असा प्रश्न संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क सादून विचारला असता, पुणे ब्रँचमधून ही ४-जी सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या ४-जीचे युवकांमध्ये जादा आकर्षण असून ते या सीम कार्डकडे आकर्षित होत आहे. मात्र कंपनी त्याचा लाभ स्वत:साठीच करून घेत आहे.
प्रमुख तीन मोबाईल नेटवर्कींग कंपन्या याबाबत जोरात जाहिरात करीत आहे. या कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्याचा सपाटाच सुरू केला. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Promotional campaign against mobile companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.