शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

रिक्षावाला ते मायानगरीचा PRO, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विदर्भपुत्र राजू कारिया कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 19:27 IST

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे मूळ रहिवासी : ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी 

ठळक मुद्देतालुक्यातील आर्णी हे त्यांचे मूळ गाव. केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी बरीच वर्षे यवतमाळातही घालविली. दत्त चौकात अनेक वर्षे त्यांनी राजू टी स्टाॅल चालविले.

यवतमाळ : अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत आर्णी सारख्या ग्रामीण भागातून थेट मुंबईच्या मायानगरीत पाय रोवणारे राजू कारिया (६८) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. विदर्भातील पहिले आणि ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी करणारे भारतातील एकमेव पीआरओ म्हणून त्यांची ख्याती आहे. सेलिब्रेटी सिनेकलावंतांसोबत सलोख्याचे संबंध असलेल्या कारिया यांनी मूळ यवतमाळ जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे संबंध शेवटपर्यंत जपले. 

तालुक्यातील आर्णी हे त्यांचे मूळ गाव. केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी बरीच वर्षे यवतमाळातही घालविली. दत्त चौकात अनेक वर्षे त्यांनी राजू टी स्टाॅल चालविले. परंतु शिक्षणादरम्यानच त्यांना चित्रपट क्षेत्राची प्रचंड आवड असल्याने वयाच्या वीसाव्या वर्षीच त्यांनी मुंबई गाठली. तेथे कुणीही गाॅडफादर नव्हते. अशा वेळी मोठ्या स्टुडिओच्या बाहेर त्यांनी ऑटोरिक्षा चालक म्हणून काम केले. स्टुडिओत जाणाऱ्या-येणाऱ्या एक्स्ट्रा आर्टिस्टसोबत ओळख वाढवून राजू कारिया यांनी स्टुडिओमध्ये प्रवेश मिळविला. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी स्वत:ही एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून चित्रपटांमध्ये काम केले. शिक्षण कमी असले तरी अंगभूत कलागुणांमुळे त्यांनी मोठमोठ्या कलाकारांची दाद मिळविली. त्यातूनच चित्रपट जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. अत्यल्प काळात ६५० पेक्षा जास्त सिनेमांचे पीआरओ म्हणून काम करणारे ते भारतातील एकमेव पीआरओ आहेत. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. तर विदर्भातील पहिले चित्रपट जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.  

यवतमाळातील मित्र परिवार शोकमग्नदोन वर्षांपूर्वी त्यांना शुगरचा आजार जडल्यावर मध्यंतरी एक पाय कापावा लागला. तरीही हसत हसत त्यांनी काम सुरू ठेवले होते. यवतमाळातील अविनाश पाचकवडेंसारख्या जुन्या मित्रांसोबत त्यांचा नित्य संवाद होता. मंगळवारी आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने राज्यभरातील चाहत्यांसह यवतमाळातील मित्र परिवारही शोकमग्न आहे. राजू कारिया यांच्या मागे पत्नी, दोन मुली, नात असा आप्त परिवार आहे 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भ