शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रिक्षावाला ते मायानगरीचा PRO, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विदर्भपुत्र राजू कारिया कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 19:27 IST

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे मूळ रहिवासी : ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी 

ठळक मुद्देतालुक्यातील आर्णी हे त्यांचे मूळ गाव. केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी बरीच वर्षे यवतमाळातही घालविली. दत्त चौकात अनेक वर्षे त्यांनी राजू टी स्टाॅल चालविले.

यवतमाळ : अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत आर्णी सारख्या ग्रामीण भागातून थेट मुंबईच्या मायानगरीत पाय रोवणारे राजू कारिया (६८) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. विदर्भातील पहिले आणि ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी करणारे भारतातील एकमेव पीआरओ म्हणून त्यांची ख्याती आहे. सेलिब्रेटी सिनेकलावंतांसोबत सलोख्याचे संबंध असलेल्या कारिया यांनी मूळ यवतमाळ जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे संबंध शेवटपर्यंत जपले. 

तालुक्यातील आर्णी हे त्यांचे मूळ गाव. केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी बरीच वर्षे यवतमाळातही घालविली. दत्त चौकात अनेक वर्षे त्यांनी राजू टी स्टाॅल चालविले. परंतु शिक्षणादरम्यानच त्यांना चित्रपट क्षेत्राची प्रचंड आवड असल्याने वयाच्या वीसाव्या वर्षीच त्यांनी मुंबई गाठली. तेथे कुणीही गाॅडफादर नव्हते. अशा वेळी मोठ्या स्टुडिओच्या बाहेर त्यांनी ऑटोरिक्षा चालक म्हणून काम केले. स्टुडिओत जाणाऱ्या-येणाऱ्या एक्स्ट्रा आर्टिस्टसोबत ओळख वाढवून राजू कारिया यांनी स्टुडिओमध्ये प्रवेश मिळविला. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी स्वत:ही एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून चित्रपटांमध्ये काम केले. शिक्षण कमी असले तरी अंगभूत कलागुणांमुळे त्यांनी मोठमोठ्या कलाकारांची दाद मिळविली. त्यातूनच चित्रपट जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. अत्यल्प काळात ६५० पेक्षा जास्त सिनेमांचे पीआरओ म्हणून काम करणारे ते भारतातील एकमेव पीआरओ आहेत. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. तर विदर्भातील पहिले चित्रपट जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.  

यवतमाळातील मित्र परिवार शोकमग्नदोन वर्षांपूर्वी त्यांना शुगरचा आजार जडल्यावर मध्यंतरी एक पाय कापावा लागला. तरीही हसत हसत त्यांनी काम सुरू ठेवले होते. यवतमाळातील अविनाश पाचकवडेंसारख्या जुन्या मित्रांसोबत त्यांचा नित्य संवाद होता. मंगळवारी आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने राज्यभरातील चाहत्यांसह यवतमाळातील मित्र परिवारही शोकमग्न आहे. राजू कारिया यांच्या मागे पत्नी, दोन मुली, नात असा आप्त परिवार आहे 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भ