वित्त आयोगाच्या निधीतून नळ योजनांना प्राधान्य
By Admin | Updated: April 22, 2016 04:27 IST2016-04-22T04:27:07+5:302016-04-22T04:27:07+5:30
ग्रामस्थांना विश्वासत घेऊनच १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या खर्चाचे नियोजन करावे, यातून गावातील पाणी

वित्त आयोगाच्या निधीतून नळ योजनांना प्राधान्य
यवतमाळ : ग्रामस्थांना विश्वासत घेऊनच १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या खर्चाचे नियोजन करावे, यातून गावातील पाणी टंचाई निवारणार्थ कायमस्वरूपी उपाय योजना करावी, असे आवाहन दिल्ली येथील माहिती व प्रसार विभागाचे उपसचिव एम.आय. वाधवाणी यांनी कळंब तालुक्यातील वंडली येथे ग्रामसभेत केले.
जिल्हा परिषदेकडून ग्राम उदय ते भारत उदय अभियान राबविण्यात येत आहे. १४ ते २४ एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या या अभियानाचे अवलोकन करण्यासाठी दिल्ली येथील माहिती व प्रसार उपसचिव एम. आय. वाधवाणी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी कळंब तालुक्यातील वंडली या गावात भेट देऊन ग्रामस्थासोबत चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप अपार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीने शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत गटाची रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. २३ एप्रिल रोजी जिल्हाचे पालक सचिव व्ही. गिरीराज हे सुध्दा ग्रासभेला उपस्थित राहणार आहेत. यावरून शासन अभियानाबाबत गंभीर असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)
वंडलीत सभा
४पंचायत राज सक्षमीकरणासाठी ग्राम उदय ते भारत उदय अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील वंडली येथे ग्रामसभा घेण्यात आली. गावात पानवठ्यांची स्वच्छता, नाल्यांची सफाई करण्यात आली. येथील सुशोभिकरण पाहून उपसचिवांनी शंकाही व्यक्त केली.