शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अध्यक्ष-सभापती आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:51 IST

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांमधील वर्चस्वाचा वाद संपण्याची चिन्हे नाहीत. आर्णीतील एक काम आपल्याच मर्जीतील व्यक्तीला मिळावे, यासाठी अध्यक्ष व बांधकाम सभापती पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आर्णीतील बांधकाम कंत्राटाचा वाद, ‘ईर्इं’ची वरिष्ठांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमधील वर्चस्वाचा वाद संपण्याची चिन्हे नाहीत. आर्णीतील एक काम आपल्याच मर्जीतील व्यक्तीला मिळावे, यासाठी अध्यक्ष व बांधकाम सभापती पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकल्याचे सांगितले जाते. या भांडणातून मध्यम मार्ग काढण्यासाठी बांधकाम कार्यकारी अभियंत्याने आता थेट सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठांकडे धाव घेतली आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे आणि बांधकाम सभापती निमीष मानकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वर्चस्वाचा वाद सुरू आहे. बैठकीतून बहिष्कार टाकण्यापर्यंत हा वाद गेला होता. गेली काही दिवस शांत असताना आता पुन्हा एका बांधकामावरून हे दोनही पदाधिकारी टोकाच्या भूमिकेवर आले आहे. सूत्रानुसार, १६ डिसेंबरला जिल्हा परिषदेत बांधकामाच्या निविदा काढल्या गेल्या. त्यात आर्णी-महाळुंगी या मार्गावरील भंडारी येथील एक किलोमीटरच्या रस्ते सुधारणेच्या १५ लाखांच्या कामावरुन अध्यक्ष-सभापती आमने-सामने उभे ठाकले आहे. या कामासाठी पाच निविदा आल्या होत्या. परंतु दोन निविदा कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने उघडल्याच गेल्या नाही. अन्य तीनपैकी २.८३ टक्के कमी दराची सागर नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याची निविदा मंजूर झाली. रेकॉर्डवर सागर यांचे नाव असले तरी प्रत्यक्षात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मर्जीतील छोटू नामक व्यक्ती हे काम करणार असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे ज्या दोन निविदा उघडल्या गेल्या नाही, त्यात यवतमाळातील राजकीय नेता तथा कंत्राटदाराच्या भाच्याची निविदा आहे. या भाच्याला कोणत्याही परिस्थितीत काम मिळवून देण्याचा त्या नेत्याचा प्रयत्न आहे. परंतु हा भाचा अगदीच नवखा आहे, त्याची या कामाच्या निमित्ताने पहिलीच एन्ट्री आहे. नव्या कंत्राटदाराला किमान पाच लाखांच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. हा अनुभव नसल्याने ही निविदा उघडली गेली नसल्याचे सांगितले जाते. या दोनपैकी एक निविदा १८ टक्के तर दुसरी १० टक्के कमी दराची असल्याची माहिती आहे.कार्यकारी अभियंता संजय राठोड यांचा कल सामाजिक भावनेतून अध्यक्षांकडे अधिक असल्याचा सूर ऐकायला मिळतो आहे. अध्यक्ष-सभापतीच्या या भांडणात कोंडीत सापडलेल्या कार्यकारी अभियंत्याने या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्याचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून जिल्हा परिषदेत अध्यक्ष-सभापतीचा हा वाद धुमसतो आहे. त्यात काय तोडगा निघतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. न उघडलेले टेंडर ओपन होते की, सागरला वर्कआॅर्डर मिळून छोटू कामाला लागतो, याकडे जिल्हा परिषदेच्या नजरा लागल्या आहे. या निर्णयावर अध्यक्ष-सभापतींची राजकीय ताकद अधोरेखीत होणार आहे, हे विशेष.सभापतींनी वर्कआॅर्डर रोखलीही निविदा उघडावी यासाठी बांधकाम सभापतींचा प्रयत्न आहे. निविदांची ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाल्याचे समाधान होईस्तोवर सागरला प्रत्यक्ष कामाचे आदेश जारी करू नये, असे पत्र सभापतींनी दिले आहे. तर छोटूला काम न भेटल्यास कुणालाही सोडणार नाही, अशा शब्दात अध्यक्षांनी खासगीत टोकाची भूमिका मांडल्याची चर्चा बांधकाम विभागात आहे.आर्णीतील प्रकरणात आपण मार्गदर्शन मागितले आहे. आजही अधीक्षक अभियंत्याच्या भेटीसाठी गेलो होतो. मात्र भेट होऊ शकली नाही. नियमानुसारच त्या दोन निविदा उघडल्या गेल्या नाही. पुरेशी कागदपत्रे नसणे हे त्यामागे कारण आहे.- संजय राठोड,कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. २