शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

अध्यक्ष, सीईओंमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:06 IST

शासनाचे कोणतेही आदेश नसताना जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. अध्यक्षांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी सीईओंना पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कमी पटसंख्या असल्याचा दावा करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शाळा बंद करण्याचा घेतला परस्पर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाचे कोणतेही आदेश नसताना जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. अध्यक्षांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी सीईओंना पत्र दिले आहे.जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कमी पटसंख्या असल्याचा दावा करण्यात आला. मात्र याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाही. शिवाय या निर्णयाबाबत सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, शिक्षण समितीत कोणतीही चर्चा झाली नाही, असा दावा अध्यक्ष माधुरी आडे यांनी केला आहे. सोबतच या निर्णयाबाबत आपल्याला प्रशासनाने अवगत केले नाही, असा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.शाळा बंद करताना शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले नाही. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्याचे आडे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या शाळाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे शाळाबंदीचा आदेश रद्द करून शासनाच्या कोणत्या आदेशाने शाळा बंद केल्या त्याची माहिती आपल्याला द्यावी, असे पत्र अध्यक्ष माधुरी आडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.दोन वर्षांपूर्वी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षाने मिळून सत्ता काबीज केली. सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला विरोधात बसावे लागले. या सत्ताधाºयांच्या विचित्र युतीमुळे विरोधी शिवसेनेत असंतोष खदखदत होता. त्याचाच परिणाम म्हणून नुकताच तीन सभापतींवर अविश्वास ठराव दाखल झाला. त्यापैकी दोन सभापतींवरील ठराव पारित झाले. मात्र या दोघांनी उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळविला. त्यानंतर झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचा आरोप केला,मात्र प्रशासनाच्या या मनमानीला पदाधिकारी आणि सदस्यच कारणीभूत असल्याचे बोलले जाते.पदाधिकारी व सदस्यांचा प्रशासनावर कोणताही वचक नाही. काही पदाधिकारी व सदस्यांना अभ्यास नाही. त्यामुळे प्रशासन सतत वरचढ ठरत आहे.आता तर थेट अध्यक्षांनाच अंधारात ठेवून शाळाबंदीचा परस्पर निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्षांच्या पत्रावरून स्पष्ट होते. यामुळे अध्यक्षांचा कोणताही वचक नसल्याचे दिसून येते.अधिकाऱ्यांची मनमानी सुरूचनुकत्याच स्थायी समिती सभेत सदस्यांनी जिल्हा परिषदेत अधिकाºयांची मनमानी सुरू असल्याचा आरोप केला. त्यावेळी अध्यक्षांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आता मात्र थेट सीईओंना पत्र देऊन अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे एक प्रकारे कबूल केले. प्रशासन अध्यक्षांनाच विश्वासात घेत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. प्रशासन परस्पर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचेही यातून दिसून येते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा