शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

अध्यक्ष, सीईओंमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:06 IST

शासनाचे कोणतेही आदेश नसताना जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. अध्यक्षांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी सीईओंना पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कमी पटसंख्या असल्याचा दावा करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शाळा बंद करण्याचा घेतला परस्पर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाचे कोणतेही आदेश नसताना जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. अध्यक्षांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी सीईओंना पत्र दिले आहे.जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कमी पटसंख्या असल्याचा दावा करण्यात आला. मात्र याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाही. शिवाय या निर्णयाबाबत सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, शिक्षण समितीत कोणतीही चर्चा झाली नाही, असा दावा अध्यक्ष माधुरी आडे यांनी केला आहे. सोबतच या निर्णयाबाबत आपल्याला प्रशासनाने अवगत केले नाही, असा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.शाळा बंद करताना शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले नाही. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्याचे आडे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या शाळाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे शाळाबंदीचा आदेश रद्द करून शासनाच्या कोणत्या आदेशाने शाळा बंद केल्या त्याची माहिती आपल्याला द्यावी, असे पत्र अध्यक्ष माधुरी आडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.दोन वर्षांपूर्वी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षाने मिळून सत्ता काबीज केली. सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला विरोधात बसावे लागले. या सत्ताधाºयांच्या विचित्र युतीमुळे विरोधी शिवसेनेत असंतोष खदखदत होता. त्याचाच परिणाम म्हणून नुकताच तीन सभापतींवर अविश्वास ठराव दाखल झाला. त्यापैकी दोन सभापतींवरील ठराव पारित झाले. मात्र या दोघांनी उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळविला. त्यानंतर झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचा आरोप केला,मात्र प्रशासनाच्या या मनमानीला पदाधिकारी आणि सदस्यच कारणीभूत असल्याचे बोलले जाते.पदाधिकारी व सदस्यांचा प्रशासनावर कोणताही वचक नाही. काही पदाधिकारी व सदस्यांना अभ्यास नाही. त्यामुळे प्रशासन सतत वरचढ ठरत आहे.आता तर थेट अध्यक्षांनाच अंधारात ठेवून शाळाबंदीचा परस्पर निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्षांच्या पत्रावरून स्पष्ट होते. यामुळे अध्यक्षांचा कोणताही वचक नसल्याचे दिसून येते.अधिकाऱ्यांची मनमानी सुरूचनुकत्याच स्थायी समिती सभेत सदस्यांनी जिल्हा परिषदेत अधिकाºयांची मनमानी सुरू असल्याचा आरोप केला. त्यावेळी अध्यक्षांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आता मात्र थेट सीईओंना पत्र देऊन अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे एक प्रकारे कबूल केले. प्रशासन अध्यक्षांनाच विश्वासात घेत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. प्रशासन परस्पर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचेही यातून दिसून येते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा