शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

भाजप-सेनेतील वितुष्टाने राजकीय भूकंप शमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:59 IST

सत्तेसाठी स्थानिक नेते कोणतीही तडजोड करण्यास तयार आहेत. यातूनच जिल्हा परिषदेत शिवसेनेला बाहेर ठेवत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. हा अभद्र संसार तुटून जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सत्ताबदलाच्या मनसुब्याला पुन्हा सुरूंग, कामगार नोंदणीत वाद उफाळला ५५५

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्तेसाठी स्थानिक नेते कोणतीही तडजोड करण्यास तयार आहेत. यातूनच जिल्हा परिषदेत शिवसेनेला बाहेर ठेवत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. हा अभद्र संसार तुटून जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत होते. सत्तेसाठी भाजपा-शिवसेना आणि बाहेरून राष्ट्रवादी असे समीकरण आकार घेऊ लागले होते. पण कामगार नोंदणीच्या वादामुळे आता पुन्हा एकदा भाजपा-सेना हे वितुष्ट विकोपाला गेले आणि सत्ताबदलाचा मनसुबा बाजूला पडला.जिल्हा परिषदेच्या सत्तेने शिवसेनेला सलग दोन वेळा हुलकावणी दिली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शिवसेनेचे दोन सभापती होते. मात्र या सभापतींनी ऐनवेळी बंडाचा झेंडा हाती घेऊन शिवसेना नेत्याचे वर्चस्व झुगारले होते. त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या सर्वात्रिक निवडणुकीत शिवसेना नेत्याने सर्वाधिक संख्याबळ मिळवले. आता सत्ता आपलीच, असे चित्र स्पष्ट दिसत असताना ऐनवेळी राष्ट्रवादीच्या खेळीमुळे विरोधात बसण्याची वेळ आली. पत्रपरिषद घेऊन सत्ता स्थापन करणार, अशी घोषणा करून शिवसेना नेत्याला तोंडघशी पडावे लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता हा शिवसेना नेत्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी व्यूहरचना तयार करणे सुरू झाले होते. पुसदमधून राष्ट्रवादीचा गटनेता बदलविण्यात आला. भाजपाकडूनही स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक कामगार नोंदणीचा मुद्दा पुढे आला. यात थेट विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांना अटक झाली. या घटनेने जिल्हा परिषदेसाठी तयार होत असलेल्या भाजपा-सेना समीकरणावरच आघातझाला.कलगीतुऱ्यामुळे युतीचा प्रस्ताव थंडबस्त्यातशिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरून पालकमंत्री मदन येरावार यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केले. सोशल मीडियावरूनही आगपाखड झाली. याविरोधात भाजपाने पोलिसांत तक्रार दाखल केली. हा वाद धुमसत असताना जिल्हा परिषद युतीचा प्रस्ताव नेते मंडळीनी थंडबस्त्यात ठेवला आहे. या वादाचा फायदा थेट काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला. जिल्हा परिषदेतील सत्ता तुर्त धोक्याबाहेर आली आहे. मात्र आगामी काळात काय समीकरण तयार होईल, हे वेळच ठरविणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना