शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-सेनेतील वितुष्टाने राजकीय भूकंप शमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:59 IST

सत्तेसाठी स्थानिक नेते कोणतीही तडजोड करण्यास तयार आहेत. यातूनच जिल्हा परिषदेत शिवसेनेला बाहेर ठेवत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. हा अभद्र संसार तुटून जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सत्ताबदलाच्या मनसुब्याला पुन्हा सुरूंग, कामगार नोंदणीत वाद उफाळला ५५५

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्तेसाठी स्थानिक नेते कोणतीही तडजोड करण्यास तयार आहेत. यातूनच जिल्हा परिषदेत शिवसेनेला बाहेर ठेवत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. हा अभद्र संसार तुटून जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत होते. सत्तेसाठी भाजपा-शिवसेना आणि बाहेरून राष्ट्रवादी असे समीकरण आकार घेऊ लागले होते. पण कामगार नोंदणीच्या वादामुळे आता पुन्हा एकदा भाजपा-सेना हे वितुष्ट विकोपाला गेले आणि सत्ताबदलाचा मनसुबा बाजूला पडला.जिल्हा परिषदेच्या सत्तेने शिवसेनेला सलग दोन वेळा हुलकावणी दिली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शिवसेनेचे दोन सभापती होते. मात्र या सभापतींनी ऐनवेळी बंडाचा झेंडा हाती घेऊन शिवसेना नेत्याचे वर्चस्व झुगारले होते. त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या सर्वात्रिक निवडणुकीत शिवसेना नेत्याने सर्वाधिक संख्याबळ मिळवले. आता सत्ता आपलीच, असे चित्र स्पष्ट दिसत असताना ऐनवेळी राष्ट्रवादीच्या खेळीमुळे विरोधात बसण्याची वेळ आली. पत्रपरिषद घेऊन सत्ता स्थापन करणार, अशी घोषणा करून शिवसेना नेत्याला तोंडघशी पडावे लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता हा शिवसेना नेत्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी व्यूहरचना तयार करणे सुरू झाले होते. पुसदमधून राष्ट्रवादीचा गटनेता बदलविण्यात आला. भाजपाकडूनही स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक कामगार नोंदणीचा मुद्दा पुढे आला. यात थेट विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांना अटक झाली. या घटनेने जिल्हा परिषदेसाठी तयार होत असलेल्या भाजपा-सेना समीकरणावरच आघातझाला.कलगीतुऱ्यामुळे युतीचा प्रस्ताव थंडबस्त्यातशिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरून पालकमंत्री मदन येरावार यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केले. सोशल मीडियावरूनही आगपाखड झाली. याविरोधात भाजपाने पोलिसांत तक्रार दाखल केली. हा वाद धुमसत असताना जिल्हा परिषद युतीचा प्रस्ताव नेते मंडळीनी थंडबस्त्यात ठेवला आहे. या वादाचा फायदा थेट काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला. जिल्हा परिषदेतील सत्ता तुर्त धोक्याबाहेर आली आहे. मात्र आगामी काळात काय समीकरण तयार होईल, हे वेळच ठरविणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना