शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

विषबाधेचा रुग्ण शंभर टक्के ठणठणीत बरा होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:00 IST

योग्य उपचारानंतर विषबाधितांच्या शरीरात विषाचा कोणताही अंश राहत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही विषबाधेची नसून औषधांची असू शकतात.

ठळक मुद्देगरज समुपदेशनाची : उपचारानंतरच्या लक्षणांनी घाबरु नका, तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : योग्य उपचारानंतर विषबाधितांच्या शरीरात विषाचा कोणताही अंश राहत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही विषबाधेची नसून औषधांची असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. विषबाधेचा रुग्ण हा शंभर टक्के ठणठणीत बरा होतो, असे विषबाधित रुग्णांवर उपचार करणाºया खासगी व शासकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगतिले.यवतमाळ जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून १९ जणांचा बळी गेला. चारशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ही मंडळी आता आपल्या गावी गेली आहे. त्यातील अनेक रुग्णांना अशक्तपणा, हातापायाला थरकाप सुटणे, भोजन कमी होणे, दृष्टी तात्पुरती अधू होणे, अंगदुखी आणि मळमळ होऊन उलटी होणे आदी लक्षणे दिसत आहे. आपल्या अंगात विषाचे अंश असतील आणि त्यामुळेच ही लक्षणे दिसत आहे, असे समजून रुग्णांसह घरची मंडळीही घाबरून गेली आहे. कोणतेही माहिती नसल्याने रुग्ण पराकोटीचे दडपणाखाली आहे. परंतु ही लक्षणे विषबाधेची नसून उपचारादरम्यान दिलेल्या औषधाचे असतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘लोकतम’शी बोलताना सांगितले. विषबाधेचा आघात मानवी चेता संस्था (न्युरोमस्क्यूलर) आणि स्नायूवर होतो. हृदयाची गतीही कमी होते. ही गती कायम ठेवण्यासाठी रुग्णाला अ‍ॅट्रोफिन हे औषध दिले जाते. या औषधाचा परिणाम बराच काळ शरीरावर राहतो. रुग्ण घरी गेल्यानंतर काही लक्षणे दिसू लागतात. परंतु घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. विषबाधित रुग्ण हा ठणठणीत बरा होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच विषबाधितांना अ‍ॅन्टी डोज म्हणून पाम ही औषधी दिली जाते. अलिकडच्या काळात या औषधीचा प्रभाव कमी दिसून येत आहे. त्यामुळे अनेकदा ही औषधी प्रभावी ठरत नाही.यवतमाळातील जनरल फिजीशियन डॉ. दीपक अग्रवाल म्हणाले, उपचारानंतर शरीरात विषाचा कोणताही अंश राहणे शक्य नाही. आपले शरीर संपूर्ण विष बाहेर टाकते. तसेच किडणी, यकृत, पचनसंस्था आदी अवयवांवर विषबाधेचा परिणाम होण्याचीही शक्यता नगन्य असते. रुग्णांनी आणि नातेवार्इंकानी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. त्रास मोठ्या प्रमाणात जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डॉ.अग्रवाल यांनी सांगितले.मानसिक आधार हवाविषबाधा झालेले रुग्ण घरी गेल्यानंतर अनेकदा रुग्णांना झटके येतात. परंतु हे झटके विषबाधेचे नसतात. तंबाखू अथवा दारूचे व्यसन असणाºयांत असे लक्षण दिसते. दवाखान्यात उपचारादरम्यान तंबाखू आणि दारू वर्ज्य असते. त्यामुळे निकोटीन किंवा अल्कोहोल विड्रॉलचे झटके येतात. काहींना अस्वस्थ वाटू शकते. परंतु घाबरण्याचे कोणतेही कारण नसते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.बळीराजा चेतना अभियानाचे वराती मागून घोडेजिल्ह्यात फवारणीचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता शासकीय यंत्रणेसह बळीराजा चेतना अभियान शेतकºयांना फवारणीचे ‘शास्त्रशुद्ध’ मार्गदर्शन करीत आहे. हा प्रकार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असाच आहे. साधारणत: जुलै महिन्यापासून फवारणीला प्रारंभ होतो. त्याच काळात विषबाधा झाल्याचे पुढे आले. नंतरच्या काळात १९ जणांचा बळी गेला तर चारशेच्यावर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली. तोपर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेचे फवारणीकडे लक्ष नव्हते. विशेष म्हणजे खास शेतकºयांसाठी स्थापन झालेल्या बळीराजा चेतना अभियानही यापासून अनभिज्ञ होते. सर्वप्रथम ‘लोकमत’ने फवारणीतील विषबाधेचा विषय मांडला होता. त्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. आता जो तो शेतकºयांना फवारणीसाठी मार्गदर्शन करीत आहे. परंतु सुरुवातीच्या काळातच फवारणीबाबत मार्गदर्शन केले असते तर १९ जणांचा बळी गेला नसता. बळीराजा चेतना अभियानानेही या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्षच केले. आता फवारणीच्या मार्गदर्शनापेक्षा शेतकºयांना समूपदेशनाची गरज आहे. मात्र जो तो पाठीवर पंप घेऊन शेतकºयांना फवारणीचे मार्गदर्शन करीत आहेत.फवारणीतून असो की कोणत्याही विषबाधेत रुग्णांवर योग्य उपचार झाल्यास तो ठणठणीत बरा होतो. विषबाधेचे कोणतेही दीर्घकालीन परिणाम रुग्णांच्या शरीरावर होत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही काही काळापुरतीच असतात. हळूहळू ती कमी होऊन रुग्ण बरा होतो. तसेच विषबाधेचा उपचार फार महागडाही नसतो. या काळात रुग्णांना समजून घेऊन त्यांना धीर देणे गरजेचे आहे.- डॉ. सचिन बेलेअतिदक्षता उपचार तज्ज्ञ यवतमाळ