शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पंतप्रधानांनी केली बचत गट महिलांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 10:51 PM

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : दाभडी, पांढरकवडा पाठोपाठ औरंगाबादमध्येही खोटी आश्वासने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटाच्या गोरगरीब लाखो महिलांची कर्ज व निधीचे आमिष दाखवून दिशाभूल करीत आहेत. याच महिलांचा मग प्रचारातील गर्दी वाढविण्यासाठी वापर केला जातो. पांढरकवडा येथे १६ फेब्रुवारी रोजी याच महिलांचा आधार घेऊन प्रचारसभा यशस्वी केली गेली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केला आहे.अ‍ॅड. मोघे म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १६ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आर्णी विधानसभा मतदारसंघात पांढरकवडा येथे सभा घेतली. या सभेतसुद्धा बचत गटाच्या महिलांना पुन्हा कर्ज, निधी यासारखी आश्वासने दिली गेली. त्यावरून सहा महिने लोटले. मात्र अद्याप या आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. आता दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येसुद्धा मोदींनी पुन्हा बचत गटाच्या महिलांपुढे एक लाखापर्यंत कर्ज, जनधन खात्यात पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट आदी आश्वासने दिली. औरंगाबादमधील या मेळाव्यातून तर मोदींच्या फसव्या आश्वासनांची जणू पोलखोल झाली आहे. त्यांनी बचत गटाच्या महिलांना दिलेले कोणतेच आश्वासन पाळलेले नाही. उलट या आश्वासनांच्या बळावर सदर महिलांच्या गर्दीचा आपल्या सभा यशस्वी करण्यासाठी व गर्दी जमविण्यासाठी उपयोग केल्याचा आरोप मोघे यांनी केला आहे.खोट्या आश्वासनांसाठी दाभडी-पांढरकवडाचा वापरमोदी यांनी खोट्या प्रचार व दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांसाठी कायम यवतमाळ जिल्ह्यातील आणि विशेषत: आर्णी विधानसभा मतदारसंघातील भूमीचा वापर केला आहे. मोदींनी बचत गटाच्या महिलांचीच नव्हे तर देशातील तमाम जनतेचीसुद्धा प्रत्येकाच्या बँक खात्यता १५ लाख रुपये जमा करू, हे आश्वासन देऊन व त्याची पूर्तता न करून दिशाभूल केली आहे. बचत गटाच्या महिलांची दिशाभूल करून भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले. आर्णी मतदारसंघातसुद्धा याच बळावर भाजपला ५८ हजार मतांची लोकसभेत आघाडी मिळाली.भाजप आमदारांना फटकाआता बचत गटाच्या महिलांचा मोदींच्या फसव्या आश्वासनामुळे गैरसमज दूर झाला असून विधानसभा निवडणुकीत बचत गटाच्या महिला मोदींच्या या फसव्या आश्वासनांना थारा देणार नाही, भाजपची ही पैशाची जादू आता चालणार नाही, असेही शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. मोदींच्या या फसव्या आश्वासनांचा आगामी विधाससभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांना गावागावात मोठा फटका बसण्याची शक्यताही अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी