शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

जनतेच्या रक्षकांचे जीर्ण घरांत वास्तव्य, कुटुंबीयांचीही चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 18:21 IST

बिटरगाव पोलिस ठाणे: ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क बिटरगाव : उमरखेड तालुक्यातील बंदी भागात बिटरगाव येथे पोलिस ठाणे व कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने जनतेचे रक्षकच असुरक्षित झाले. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सतत जीर्ण घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबीयांची चिंता सतावत राहते. बिटरगाव पोलिसांना ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

बिटरगाव येथे ब्रिटिश काळात पोलिस ठाण्याची स्थापना झाली. त्याचवेळी निवासस्थाने बांधली गेली. वेळोवेळी त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र आता ही निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जीव मुठीत घेऊन पोलिस कुटुंबांना वास्तव्य करावे लागत आहे. बंदी भागातील ४५ गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी या पोलिस कर्मचाऱ्यांवर आहे. दोन अधिकारी आणि ३२ कर्मचारी ही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र त्यांच्या घराची दैनावस्था झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी मुरून निवासस्थानाच्या भिंती फुगल्या आहेत. अखेर पोलिसांनीच निवासस्थाने व ठाण्यावर टिनाचे शेड टाकले आहे. 

बिटरगाव हा परिसर अतिशय दुर्गम म्हणून ओळखला जातो. पोलिसांना ४५ गावांचा डोल्हारा सांभाळावा लागत आहे. ही एक प्रकारची कसरतच मानली जाते. या भागात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. यामुळे येथे काम करण्यासाठी पोलिस कर्मचारी व अधिकारी येण्याचे टाळतात. त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. 

ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्णब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण झाली. देश स्वतंत्र झाल्यावर १९४७ मध्ये नवीन वास्तू बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, ७० वर्षांनंतरही हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. परिणामी धोकादायक ठाणे आणि निवासस्थाने ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण कधीही कोसळण्याची शक्यता बळावली आहे. यंदा परतीच्या पावसाने ठाण्यात वायरलेस कक्षातील पीओपीच्या छताला छिद्रे पडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी साधे निवासस्थान मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय ठाण्यातील वाहनही जुने झाले आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास पोहोचण्यासाठी अडचण जाते. 

ग्रामपंचायत ठरावाकडे दुर्लक्षनिवासस्थानाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. येथील ग्रामपंचायत वारंवार ग्रामसभेचा ठराव घेऊन संबंधितांकडे निवासस्थाने व ठाण्याच्या वास्तूची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करण्यासाठी साकडे घालत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. बिटरगाव हे बंदी भागात मोडते. या परिसरात घनदाट जंगल आहे. काही वर्षांपूर्वी या जंगलात नक्षल्यांचाही वावर होता. त्यामुळे बिटरगावचे पोलिस ठाणे जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ