शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या रक्षकांचे जीर्ण घरांत वास्तव्य, कुटुंबीयांचीही चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 18:21 IST

बिटरगाव पोलिस ठाणे: ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क बिटरगाव : उमरखेड तालुक्यातील बंदी भागात बिटरगाव येथे पोलिस ठाणे व कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने जनतेचे रक्षकच असुरक्षित झाले. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सतत जीर्ण घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबीयांची चिंता सतावत राहते. बिटरगाव पोलिसांना ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

बिटरगाव येथे ब्रिटिश काळात पोलिस ठाण्याची स्थापना झाली. त्याचवेळी निवासस्थाने बांधली गेली. वेळोवेळी त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र आता ही निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जीव मुठीत घेऊन पोलिस कुटुंबांना वास्तव्य करावे लागत आहे. बंदी भागातील ४५ गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी या पोलिस कर्मचाऱ्यांवर आहे. दोन अधिकारी आणि ३२ कर्मचारी ही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र त्यांच्या घराची दैनावस्था झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी मुरून निवासस्थानाच्या भिंती फुगल्या आहेत. अखेर पोलिसांनीच निवासस्थाने व ठाण्यावर टिनाचे शेड टाकले आहे. 

बिटरगाव हा परिसर अतिशय दुर्गम म्हणून ओळखला जातो. पोलिसांना ४५ गावांचा डोल्हारा सांभाळावा लागत आहे. ही एक प्रकारची कसरतच मानली जाते. या भागात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. यामुळे येथे काम करण्यासाठी पोलिस कर्मचारी व अधिकारी येण्याचे टाळतात. त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. 

ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्णब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण झाली. देश स्वतंत्र झाल्यावर १९४७ मध्ये नवीन वास्तू बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, ७० वर्षांनंतरही हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. परिणामी धोकादायक ठाणे आणि निवासस्थाने ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण कधीही कोसळण्याची शक्यता बळावली आहे. यंदा परतीच्या पावसाने ठाण्यात वायरलेस कक्षातील पीओपीच्या छताला छिद्रे पडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी साधे निवासस्थान मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय ठाण्यातील वाहनही जुने झाले आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास पोहोचण्यासाठी अडचण जाते. 

ग्रामपंचायत ठरावाकडे दुर्लक्षनिवासस्थानाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. येथील ग्रामपंचायत वारंवार ग्रामसभेचा ठराव घेऊन संबंधितांकडे निवासस्थाने व ठाण्याच्या वास्तूची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करण्यासाठी साकडे घालत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. बिटरगाव हे बंदी भागात मोडते. या परिसरात घनदाट जंगल आहे. काही वर्षांपूर्वी या जंगलात नक्षल्यांचाही वावर होता. त्यामुळे बिटरगावचे पोलिस ठाणे जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ