शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या रक्षकांचे जीर्ण घरांत वास्तव्य, कुटुंबीयांचीही चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 18:21 IST

बिटरगाव पोलिस ठाणे: ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क बिटरगाव : उमरखेड तालुक्यातील बंदी भागात बिटरगाव येथे पोलिस ठाणे व कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने जनतेचे रक्षकच असुरक्षित झाले. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सतत जीर्ण घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबीयांची चिंता सतावत राहते. बिटरगाव पोलिसांना ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

बिटरगाव येथे ब्रिटिश काळात पोलिस ठाण्याची स्थापना झाली. त्याचवेळी निवासस्थाने बांधली गेली. वेळोवेळी त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र आता ही निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जीव मुठीत घेऊन पोलिस कुटुंबांना वास्तव्य करावे लागत आहे. बंदी भागातील ४५ गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी या पोलिस कर्मचाऱ्यांवर आहे. दोन अधिकारी आणि ३२ कर्मचारी ही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र त्यांच्या घराची दैनावस्था झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी मुरून निवासस्थानाच्या भिंती फुगल्या आहेत. अखेर पोलिसांनीच निवासस्थाने व ठाण्यावर टिनाचे शेड टाकले आहे. 

बिटरगाव हा परिसर अतिशय दुर्गम म्हणून ओळखला जातो. पोलिसांना ४५ गावांचा डोल्हारा सांभाळावा लागत आहे. ही एक प्रकारची कसरतच मानली जाते. या भागात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. यामुळे येथे काम करण्यासाठी पोलिस कर्मचारी व अधिकारी येण्याचे टाळतात. त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. 

ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्णब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण झाली. देश स्वतंत्र झाल्यावर १९४७ मध्ये नवीन वास्तू बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, ७० वर्षांनंतरही हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. परिणामी धोकादायक ठाणे आणि निवासस्थाने ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण कधीही कोसळण्याची शक्यता बळावली आहे. यंदा परतीच्या पावसाने ठाण्यात वायरलेस कक्षातील पीओपीच्या छताला छिद्रे पडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी साधे निवासस्थान मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय ठाण्यातील वाहनही जुने झाले आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास पोहोचण्यासाठी अडचण जाते. 

ग्रामपंचायत ठरावाकडे दुर्लक्षनिवासस्थानाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. येथील ग्रामपंचायत वारंवार ग्रामसभेचा ठराव घेऊन संबंधितांकडे निवासस्थाने व ठाण्याच्या वास्तूची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करण्यासाठी साकडे घालत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. बिटरगाव हे बंदी भागात मोडते. या परिसरात घनदाट जंगल आहे. काही वर्षांपूर्वी या जंगलात नक्षल्यांचाही वावर होता. त्यामुळे बिटरगावचे पोलिस ठाणे जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ