शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:00 AM

जनता कर्फ्यू हा कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी हत्यार जिल्हावासीयांनी पहिल्याच दिवशी अतिशय प्रभावीपणे राबविले. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत रविवार २२ मार्चला कुणीही घराबाहेर पडले नाही. काहींना अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडावे लागले. मात्र त्यांनीही काही मिनिटात काम आटोपून घर गाठले. यवतमाळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील सोळाही तालुके व गावागावात हे चित्र पहावयास मिळाले.

ठळक मुद्देपहाटे ५ वाजतापासून १४४ कलम : नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले, सायंकाळी ५ वाजता थाळीनाद करून कृतज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जनता कर्फ्यू हा कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी हत्यार जिल्हावासीयांनी पहिल्याच दिवशी अतिशय प्रभावीपणे राबविले. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत रविवार २२ मार्चला कुणीही घराबाहेर पडले नाही. काहींना अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडावे लागले. मात्र त्यांनीही काही मिनिटात काम आटोपून घर गाठले. यवतमाळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील सोळाही तालुके व गावागावात हे चित्र पहावयास मिळाले.जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीची साधनेही पूर्णत: बंद होती. एसटी महामंडळाने ४२५ गाड्यांच्या एक हजार फेऱ्या रद्द केल्या. खासगी प्रवासी वाहने, आॅटोरिक्षाही रस्त्यावर दिसलाच नाही. यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, आर्णी, महागाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव, कळंब, घाटंजी, मारेगाव, झरी, पांढरकवडा, राळेगाव तालुक्यात जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजीमंडी व्यवस्थापनाने रविवारी बंदची घोषणा केल्यामुळे भाजीपाला, दूध या सारख्या वस्तूही बाजारपेठेत आणल्या नाही. प्रमुख मंदिरे, चर्च, प्रार्थना स्थळेसुद्धा पूर्णत: बंद होती. शनिवारी मध्यरात्रीच लॉक डाऊनची घोषणा झाल्यानंतर नागरिक घरी गेले. ते बाहेर निघालेच नाही. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून करीत होते. सायंकाळी ५ वाजता सायरन वाजताच शहरासह गावखेड्यातील नागरिकांनी घरासमोर उभे राहून थाळीनाद, टाळ्या वाजवून प्रशासनाच्या उपाययोजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. घरासमोर आलेले नागरिक काही मिनिटातच परत माघारी फिरले. अनेकांचे दारही पूर्णवेळ बंद होते. रात्री ९ नंतर पुन्हा पोलिसांची गस्त सुरू झाली. कुणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन केले जात होते. यावेळीसुद्धा नागरिक घरातच होते. सर्वत्र चिटपाखरुही दिसत नव्हते. रस्त्यांवर निरवशांतता पसरली होती.

जीवनावश्यक वस्तू विक्री सुरूजनता कर्फ्यूमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही बंद ठेवली होती. किराणा, दुध, भाजीपाला मिळत नव्हता. मात्र सोमवारपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले. रविवारी रात्री दुधाची दुकाने उघडली होती. कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, १४४ कलम लागू झाल्याने विनाकारण गर्दी करणारे, भटकणारे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे तसे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

यवतमाळचा एक युवक मुंबईत कोरोना पॉझिटीव्हआफ्रिकेतून भारतात परतलेला यवतमाळातील युवक मुंबई विमानतळावर चाचणीमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्याला तेथेच ठेवण्यात आले आहे. जिल्ह््यात १५० संशयितांना होम क्वॉरेनटाईन केले आहे. शासकीय रुग्णालयात सहा जण निगरानी खाली आहेत. यापैकी एकाचा रिपोर्ट निगेव्हीव आल्याने त्याला सुटी देऊन होम क्वॉरेनटाईन केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात विदेशातून आलेले ११६ संशयित आहे. तर २३ जण थेट संपर्कात आलेले आहेत. मुंबई, पुणे येथून आलेले ११ जण निगराणीत आहे.असेच सहकार्य कराकोरोनाला थांबविण्यासाठी प्रतिबंध हाच उपाय आहे. नागरिकांनी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून उत्तम सहकार्य केले. पुढील काही दिवस नागरिकांनी संयम ठेऊन गर्दी टाळावी. सकाळी ५ वाजतापासून नागरी भागात कलम १४४ लागू होणार आहे.- एम.डी.सिंहजिल्हाधिकारीस्वत:साठी घरात थांबाकुटुंब, देश व मानवतेसाठी हा महत्वाचा काळ आहे. प्रत्येकाने पुढचे काही दिवस घरात थांबून सहकार्य करावे. कुठल्याच अत्यावश्यक वस्तूंची दुकाने बंद केली जाणार नाही. धावपळ करू नये, काही अडचण असल्यास पोलीस ठाण्यात मदत मागावी. पोलीस मदतीसाठी तत्पर आहे.- एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या