शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

मुलांना पारखे वृद्ध आई-वडील ‘मेडिकल’मध्ये खितपत

By admin | Updated: May 25, 2017 01:12 IST

तरणी मुले आहेत. पण वय झालेल्या आई-बापांची सावलीही त्यांना नकोशी झाली.

नशिबी हालअपेष्टा : मुले कृतघ्न, पण मायबापाच्या मनात मायाच

सुरेंद्र राऊतयवतमाळ : तरणी मुले आहेत. पण वय झालेल्या आई-बापांची सावलीही त्यांना नकोशी झाली. असे वृद्ध बेवारसासारखे यवतमाळच्या मेडिकल परिसरात येऊन आसरा शोधतात. त्यातले काही समाजसेवींच्या नजरेत आले तर उपचारही मिळतो. पण उपचारानंतर त्यांना कुठे पाठवावे हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा चार वृद्धांची ‘जिंदगी’ खितपत पडलेली आहे. पण हालअपेष्टा नशिबी येऊनही कृतघ्न मुलांविषयी चकार शब्दही ते बोलत नाहीत. अजूनही माया करणाऱ्या या मायबापांना फक्त त्यांच्या मुलांनी भेट दिली, तरी मनावरच्या जखमा भरू शकतात. त्यासाठीच ही कहाणी...हेमराज हा ६९ वर्षीय वृद्ध नागपूरच्या लालगंज पोलीस चौकीजवळील भारतीवाडीतला मूळ रहिवासी. त्याला मूलबाळ नाही. पत्नी लिलाबाई १८ वर्षांपूर्वी दगावली आणि आबाळ सुरू झाली. भावाने त्याचे राहते घर बळकावून त्याला हाकलून दिले. तेव्हापासून तो यवतमाळात आहे. मिळेल ती रोजमजुरी करतो. गेल्या सात दिवसांपासून तो मेडिकल कॉलेज परिसरात तापाने पडून होता. त्याच्या पायाला मोठी जखम होती. अशाही परिस्थितीत तो भीक मागत नव्हता. रुग्णसेवी ओम चव्हाण यांनी विचारपूस करून खाऊ-पिऊ घातले. उचलून दवाखान्यात भरती केले. उजव्या पायाला ‘सेल्यूलाईटीस’ झाल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असून प्रकृती सुधारत आहे. या रूग्णाची अवस्था म्हणजे त्याला कपडेही नाही. काही समाजसेवी त्याच्यासाठी धडपड करीत आहे. डॉक्टर म्हणतात, याला सुट्टी देण्याची गरज आहे. पण जखम घेऊन तो वृद्धाश्रमात गेल्यास जखम चिघळण्याची शक्यता आहे. रोज ड्रेसिंग आवश्यक असून नर्स-डॉक्टर्स सेवा करीत आहे. हेमराज कोल्हे म्हणाले, ‘माही कोणाबद्दलही तक्रार नाही. इमानदारीने जगत आलो आता शेवटही इमानदारीनेच झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.’ पोरायले काही करू नका!नाना हे आर्णी तालुक्यातील कास्तकार. वय वर्षे ७०. पाच एकर शेतीचा मालक आणि चार तरुण पोरांचा पिता, हीदेखील त्यांची ओळख. पत्नी चार वर्षांपूर्वी मरण पावली. गावातच पडल्याने त्यांचा उजवा पाय मोडला आहे. महिनाभरापासून ते यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात बेवारस म्हणून उपचार घेत आहे. समाजसेवक भास्कर जळके, अविनाश जानकर देखभाल करीत आहे. पाय फ्रॅक्चर असून ट्रॅक्शन देऊन प्लास्टर करावे लागणार आहे. त्यांच्या पोरांशी संपर्काचा प्रयत्नही झाला. जवळा येथे रोजमजुरी करणाऱ्या मुलाने एकदा येऊन बापाची भेट घेतली. इतर दोन मुले घाटंजी तालुक्यातील पांगरीत भाड्याची शेती करतात. या शिवाय चौथा मुलगाही भेटायला आला नाही. एवढे असूनही वृद्ध नानांची पोरांबद्दल काही तक्रार नाही. विचारपूस करणाऱ्यांना ते सांगतात, ‘‘माह्या पोरायले काही करू नका.’’ मुलांच्या उपचारासाठी मागते भीकशाहीन (४५) रा. आर्णी हिला मुलबाळ होत नव्हते म्हणून पहिल्या नवऱ्याने सोडले. तो शासकीय नोकरीत होता. नंतर मोलमजुरी करणाऱ्या इसमासोबत तिने दुसरे लग्न केले. त्याच्यापासून दोन मुलं झाली. ही मुले लहानपणापासून अस्थम्याने त्रस्त आहेत. शाहीन त्यांना यवतमाळच्या मेडिकलमध्ये नेहमी आणायची. वारंवारच्या फेरीमुळे रूग्णालयात तिच्या ओळखी वाढल्या. आता ती स्वत:च्या मुलांसोबत गावातले इतरही रूग्ण घेऊन येते. पोराच्या उपचारासाठी पैसे नसले तर भीक मागून उपचार करते. दोन-तीन वर्षाच्या पोराला बेंचला बांधून रूग्णालयात इकडे तिकडे फिरते. तिचे म्हणणे असे की, ‘पहिल्या लग्नात पोरं झाले असते तं सुखात राहिले असते. आता पोरं झाले. पण भीक मागा लागते.’ डॉक्टरवरच धावून जाते गंगूबाईगंगूबाई (वय ८०) या नेर तालुक्यातील असून काहीशा विमनस्क आहेत. त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर आहे. मुले आहेत, पण मुलांबद्दल त्या कुठलीही माहिती सांगायला तयार नाही. त्या म्हणतात, ‘नाव कायले सांगू? माया पोराचंच काही कमी जास्त झालं तं मले माईत नाई.’ त्यांचा नातू प्रणय याने आजीजवळ थांबण्यासाठी वडलाकडून हजार रुपये घेतले. पण तो काही तिच्यासोबत रूग्णालयात थांबत नाही. कधीतरी एखादी चक्कर मारतो. गंगूबाई विमनस्क असल्याने डॉक्टर-नर्स यांनाही शिव्या देते. तिच्या पायाला बांधलेले प्लास्टरही तिने स्वत:च्या हाताने काढण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर समजावण्यास गेले तर अंगावर धावून येते. असे अनेक वृद्ध आता रूग्णालयात खितपत पडले आहेत. या वृद्धांना पाठवायचे कुठे ? ४ठिकठिकाणाहून यवतमाळच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात असे निराधार वृद्ध रूग्ण येतात. त्यांच्यावर जमेल तसा उपचारही होतो. मात्र उपचारानंतर त्यांना पाठवायचे कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना रूग्णालयातच जास्त ठेवल्यास संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी यवतमाळात महिला आधार केंद्र, अनाथालय, वृद्धाश्रम यांची अत्यंत आवश्यकता आहे. या संस्था शासकीय यंत्रणेमार्फत चालविण्याची गरज आहे.