येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे. ...
भुरकीपोड ते कान्हाळगाव या रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली असून पायदळ चालणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा रस्ताच कायमचा बंद करावा, अशी मागणी संतप्त कान्हाळगाववासीयांनी केली आहे. ...
१४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. ...
यवतमाळात २६ वी ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातल्या २८ जिल्ह्यामधून ४०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ...
समाज कल्याण खात्यांतर्गत चालविल्या जाणाऱ्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये भोजन पुरवठा कंत्राटाच्या निविदा दरवर्षी काढल्या जात असल्या तरी ती एक खानापूर्ती ठरत असून कंत्राटदार मात्र वर्षानुवर्षे जुनेच राहत असल्याचे आढळून आले. ...
हिऱ्यांना पैलू पाडणारा प.विदर्भातील पहिला उद्योग नेरमध्ये कार्यान्वित झाला. मातोश्री डायमंड इन्स्टिट्यूट नावाने या उद्योगाचे औपचारिक उद्घाटन शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नुकतेच झाले. ...
व्यापारी महासंघ व औषधी विक्रेता संघाने शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला पुसद, उमरखेड, दिग्रस व महागावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली. ...
आॅनलाईन आणि रिटेल एफडीआयविरुद्ध व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला दारव्हा, आर्णी, घाटंजी, राळेगाव व बाभूळगाव येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...