जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांची लाखोंची लाचखोरी उघड झाली आहे. हा विभाग थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याच अखत्यारीत येत असल्याने त्यांच्या अनुमती शिवाय हा प्रकार होऊ शकत नाही. त्यामुळे या २५ लाखांच्या लाचखोरी प्रकरणात जिल्हा पोलीस ...
जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला. ...
तालुक्यातील भांब येथील नर्सरीत लावण्यात आलेली रोपटी पूर्णत: वाळली आहे. यामुळे शासनाचे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
सांग पाटला काय करू, उपड पऱ्हाटी पेर गहू... जिल्ह्यात ही म्हण नवी नाही. पण यंदा तीच म्हण कृषी विभाग शेतकऱ्यांवर थोपवित आहे. अन् थोपवित असल्याने शेतकरीही कानाडोळा करीत आहे. बोंडअळी नष्ट करण्यासाठी कृषी विभागाने उभ्या पऱ्हाट्या कापण्याचे आवाहन करीत कॉटन ...
मटका, जुगार, दारू, गुटखा, घातक शस्त्रे, जनावर तस्करी आदी अवैध धंद्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना २५ लाखांची भुरळ पडली. या ‘डीलिंग’चे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने ‘अलर्ट’ही दिला होता. ...
जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे. ...
मारेगाव व झरी तालुक्यात शिक्षणाचा अक्षरश: बट्ट्याबोळ झाला असून अनेक शाळांना रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून काही शाळांचा गाडा रोजंदारी शिक्षकांवर सुरू असल्याचे भयावह चित्र या दोन तालुक्यात पाहावयास मिळते. ...
दु:खी, कष्टी, गरीब लोकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन प्रकाशमान करणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले. ...