शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नरभक्षक वाघिणीला आधीच मारायला हवे होते, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 05:09 IST

नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी ओरड चालविली असली तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच मारायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी व्यक्त केली.

यवतमाळ - नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी ओरड चालविली असली तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच मारायला पाहिजे होते, तसे झाले असते तर अनेक शेतकरी-शेतमजुरांचे जीव वाचू शकले असते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी व्यक्त केली.पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत. अखेर वन खात्याने या वाघिणीला नुकतेच गोळी घालून ठार केले. मात्र तिला गोळ्या का घातल्या म्हणून वन्यजीवप्रेमींनी देशभर ओरड चालविली आहे. मुख्यमंत्री, वनमंत्री यांना धारेवर धरले जात आहे. वन खात्याची नियमावली वाचून दाखविली जात आहे. त्याच वेळी या दोन विधानसभा मतदारसंघांचे काँग्रेसकडून अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके (राळेगाव), अ‍ॅड. शिवाजीराव मोघे (केळापूर-आर्णी) आणि मिशनचे अध्यक्ष किशोत तिवारी यांनी मात्र जनतेच्या हितासाठी वाघिणीला ठार करण्याच्या वन खात्याच्या कारवाईचे समर्थन केले आहे.वन खात्याने संयम राखला - अ‍ॅड. मोघेवन खात्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचे कोणतेही प्रयत्न न करता थेट गोळ्या घातल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींकडून होत असला तरी काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वन खात्याने अवनीला पकडण्यासाठी खूप संयम राखला व वर्षभर प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. तिला ठार मारायचे नव्हते, बेशुद्ध करण्याचेच प्रयत्न झाले. मात्र ती टप्प्यात येत नव्हती. अखेर वन खात्याचाही नाईलाज झाला. कारण जनतेचे जीव महत्वाचे असल्याचे मोघे यांनी सांगितले.वनखात्याने विलंब केला - प्रा. पुरकेमाजी मंत्री प्रा. वसंत पुरके म्हणाले, वाघिणीने पहिली शिकार केल्यानंतर वन खात्याने लगेच पावले उचलून तिला बेशुद्ध करण्याचे, पकडण्याचे प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र वन खात्याने त्याकडे बरेच दुर्लक्ष केले. मध्यंतरीच्या काळात तिला बेशुद्ध करण्याच्या मिळालेल्या तीन संधी दवडल्या गेल्या. १३ जीव गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, वाघिणीच्या दहशतीत हजारो एकर शेती पडिक आहे. त्यामुळे तिचा बंदोबस्त करणे गरजेचेच होते. वन्यजीवप्रेमींनी प्रत्यक्ष वाघदहशतग्रस्त भागात भेट दिल्यास त्यांना ‘वास्तव’ कळू शकेल, असेही पुरके यांनी सांगितले.मनेका गांधी शेतकरी विरोधी - तिवारीवसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, दिल्ली, मुंबईत बसलेल्या वन्यजीवप्रेमींनी वन खात्याच्या वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेत याचिका व अन्य माध्यमातून सातत्याने अडथळे आणले. आजही ही मंडळी वन खात्यावर तोंडसुख घेत आहे. त्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत. मात्र त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. पर्यायाने त्यांच्याकडून सरकारवर केली जात असलेली टीका शेतकरी व आदिवासी विरोधी ठरत आहे. अशा आगावू मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळीच आवर घालावा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना विनम्रपणे दिलेल्या उत्तराचे किशोर तिवारी यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :Tigerवाघcongressकाँग्रेस