शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थितीत दहा पैकी केवळ तीन आमदार 'ऑनफिल्ड'; सात जणांनी फोनवरूनच केली विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 16:32 IST

जिल्ह्याला तीन खासदार आहे. यातील दोन खासदारांनी पाठ फिरविली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींबाबत पूरबाधित क्षेत्रात मोठा असंतोष व्यक्त होत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून पाच तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. शेती खरडून गेल्याने पुढील काही वर्षे उत्पन्न निघणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मोठा महाप्रलयच आला आहे. अशाही स्थितीत स्थानिक आमदार, खासदार जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले नाहीत. दहा पैकी केवळ तीन आमदारांनीपूरग्रस्तांची भेट घेतली. तर इतर आमदारांनी केवळ फोनवरूनच सोपस्कार पूर्ण केला. त्यांना जनतेच्या दु:खापेक्षा राज्यातील राजकीय घडामोडीत अधिक रस असल्याने मुंबईतच ठाण मांडून आहेत.

जिल्ह्याला तीन खासदार आहे. यातील दोन खासदारांनी पाठ फिरविली आहे. भावना गवळी दीड वर्षापासून यवतमाळात फिरकल्याच नाहीत. खासदार हरविल्याचे फलकही लागले, तक्रारी झाल्या. पूरस्थितीतही त्यांना मतदारसंघाची आठवण झाली नाही. यामुळे लोकप्रतिनिधींबाबत पूरबाधित क्षेत्रात मोठा असंतोष व्यक्त होत आहे. अडचणीच्या काळात जिल्ह्याला पालकमंत्री नसता येथील आमदारांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन करणे अपेक्षित होते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

तीन हजार २३८ नागरिकांना हलविले

पूरस्थितीमुळे धोका निर्माण झालेल्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जवळपास तीन हजार २३८ नागरिकांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले आहे.

अतिपावसाने दीड लाख हेक्टरवरील पीक झाले नष्ट

पावसाने हाहाकार उडाला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने जमीन खरडून गेली आहे. प्राथमिक अंदाजानुसार एक लाख ५० हजार ८०५ हेक्टर पिकाचे नुकसान झाले.

पाच तालुक्यांमध्ये स्थिती झाली गंभीर

पाऊस व पुराच्या तडाख्याने पाच तालुक्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे. राळेगाव, मारेगाव, कळंब, बाभूळगाव, वणी या तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे.

१५६ गावांमध्ये पुराचे थैमान

जिल्ह्यातील १५६ गावांमध्ये नदी, नाल्यांंच्या पुरामुळे नुकसान झाले आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे.

शेतकरी संकटात... खासदारांचाही पत्ता नाही

पूरस्थितीमुळे सामान्य शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अनेकांची घरे कोसळली आहेत. जीव वाचविण्याची धडपड सुरू आहे. अशा स्थितीत येथील यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी आणि उमरखेड-हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे ऑनफिल्ड दिसलेच नाहीत. त्यांच्याकडून स्थानिक यंत्रणेला पूरस्थितीबाबत साधी विचारणाही झाली नाही. हे खासदार आपल्या राजकीय घडामोडीतच दिल्लीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. जनतेच्या मतावर खासदार झालेल्यांना संकटात असलेल्या मतदारांची आठवण आली नसल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. केळापूर-चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळासाहेब धानोरकर यांनी चंद्रपूर व वणी येथील पूरग्रस्त भागात मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले. तसेच प्रशासनाकडून आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्याची माहिती आहे.

आमदार साहेब कुठे?

संजीवरेड्डी बोदुकरवार

वणी तालुक्यात पूरस्थिती निर्माण होताच मदत कार्य पोहोचविण्यासाठी आमदार तत्काळ ऑनफिल्ड आले. यंत्रणेला वेळोवेळी सूचनाही दिल्या.

अशोक उईके

पूर आला असताना बाधित गावात भेट देऊन ग्रामस्थांचे सांत्वन केले. प्रशासनाची मदत तत्काळ कशी पोहोचेल याचाही आढावा घेतला.

नामदेव ससाने

उमरखेडमध्ये २९ हजार हेक्टर शेतीचे व ३५० घरांचे अंशत: नुकसान झाले. याचा आढावा घेण्यासाठी आमदार ससाने ऑनफिल्ड दिसून आले.

संदीप धुर्वे

केळापूर विधानसभेतील आर्णी तालुक्यात २७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. आमदार धुर्वे यांनी आर्णी पंचायत समितीमध्ये आढावा घेतला.

मदन येरावार

यवतमाळात शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना शहरात घडली. तालुक्यातील शेतीचेही नुकसान झाले. याचा आढावा फोनवर घेतला.

संजय राठोड

दारव्हा-दिग्रस-नेरमध्ये पावसाने शेतीचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. याची स्थिती मुंबईतून फोनवर घेत, अहवाल मागितला.

इंद्रनील नाईक

पुसदमध्ये पुराचा फटका नसला तरी शेतीचे नुकसान झाले आहे. ही स्थिती मुंबईत राहून आमदारांनी फोनवरच जाणून घेतली.

नीलय नाईक

जवळपास २०० हेक्टर शेतीचे नुकसान आहे. काही घरे बाधित झाली. याचा आढावा फोनवर घेतला आहे.

वजाहत मिर्झा

फोन करून पाऊस पाण्याची काय अवस्था आहे, याची माहिती घेत आमदार वजाहत मिर्झा यांनी सोपस्कार पार पाडला.

दुष्यंत चतुर्वेदी

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आल्यापासून चतुर्वेदी यवतमाळात दिसलेच नाहीत. पूरस्थिती त्यांना माहितीही नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणfloodपूरMLAआमदारYavatmalयवतमाळRainपाऊस