शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच आरक्षणानंतरच ठरणार गावगाड्यात आघाडीचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

भाजपा या प्रबळ विरोधी पक्षासोबत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे राजकीय पक्ष निर्णायक आहेत. भाजपाकडे पाच आमदार आहेत. शिवसेना जिल्ह्यात सत्तेत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीही ठराविक भागात आपले वर्चस्व राखून आहे. अशा स्थितीत गावपातळीवरच्या पक्ष कार्यकर्त्याला थेट पाठबळ देण्याचे काम केले जाते. प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षस्तरावरून सहभाग घेतला जात नाही. जो निवडून येईल त्याला पक्षाशी जोडले जाते. याही निवडणुकीत हाच प्रयोग होणार आहे.

ठळक मुद्देपक्षापेक्षा परंपरागत विरोध महत्त्वाचा : पक्षीय नेत्यांचा सर्वांनाच होकार

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींची  निवडणूक होऊ घातली आहे. राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी जुळलेले समीकरण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहजासहजी तयार होत नाही. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीचा प्रभाव तुलनेने जास्त आहे. मात्र, ग्रामपंचायतींमध्ये पक्षीय राजकारणाला कधीच थारा मिळत नाही. गावातील गटातटाचे राजकारणच त्यावर प्रभावी असते. त्यामुळे पक्षाचे नेतेही ग्रामपंचायत निवडणुकीपासून दूर राहणे पसंत करतात. विजयी गटाला पक्षासोबत जोडले जाते. हीच खेळी याही निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे आघाडीच्या गणिताचा निर्णय हा सरपंच आरक्षण सोडतीनंतरच ठरला आहे.  भाजपा या प्रबळ विरोधी पक्षासोबत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे राजकीय पक्ष निर्णायक आहेत. भाजपाकडे पाच आमदार आहेत. शिवसेना जिल्ह्यात सत्तेत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीही ठराविक भागात आपले वर्चस्व राखून आहे. अशा स्थितीत गावपातळीवरच्या पक्ष कार्यकर्त्याला थेट पाठबळ देण्याचे काम केले जाते. प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षस्तरावरून सहभाग घेतला जात नाही. जो निवडून येईल त्याला पक्षाशी जोडले जाते. याही निवडणुकीत हाच प्रयोग होणार आहे. निवडणूकपूर्व आघाडी ग्रामपंचायतींमध्ये तयार होण्याचे चित्र नाही. सध्या वार्डातील आरक्षणानुसार उमेदवार शोधण्यावरच पॅनल प्रमुखांचा भर दिसत आहे. 

तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?राजकीय पटलावर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. मात्र, आघाडीचा हा फॉर्म्युला गावपंचायतीच्या निवडणुकीत यशस्वी ठरणारा नाही. उलट आघाडी केल्याने पक्षाला नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आघाडीकडून तिन्ही पक्ष एकाच पॅनलला मदत करतील, याची शक्यता नाही.

स्थानिक संस्थांमध्ये शिवसेनेचा दबदबाजिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्याच्या महाविकास आघाडीचाच दबदबा आहे. ज्या पक्षाकडे सत्ता त्याचा प्रभाव सर्वाधिक असतो. पालकमंत्री पद शिवसेनेकडे असल्याने स्थानिक संस्थांमध्येही बऱ्याच ठिकाणी शिवसेना प्रभावी आहे. त्यापाठोपाठ आमदारांचे संख्याबळ असल्याने भाजपचा प्रभाव दिसतो. 

ग्रा.पं. निवडणुकीत गटातटालाच मान्यताग्रामपंचायत निवडणूक व्यक्तीविरोधावर होते. त्यातही गटातटाला मानणारा वर्ग मोठा असतो. पक्ष हा बाजूला ठेवून गावात गटातटाचे समीकरण कसे जुळते त्यासाठीच पक्षीय कार्यकर्ते ताकद आजमावताना दिसतात. त्यामुळे महाविकास आघाडी होऊन निकाल काय येईल, अशी स्थिती नाही. काही गावांमध्येच पक्ष दिसतात. 

लढल्यास काय परिणाम?शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आघाडीकडून लढल्यास त्याचा परिणाम काय दिसेल, हे सध्या सांगणे शक्य नाही. तिन्ही पक्षातील दावेदारांमध्ये फूट पडून विरोधकाला आयतीच संधी मिळण्याची शक्यता अधिक राहू शकते. त्यामुळे असा प्रयोग उघडरित्या करण्यासाठी तरी कोणताच पक्ष धजावत नाही. एका गावात परिस्थितीनुसार महाआघाडी होऊ शकते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच