शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

प्रज्ञाशोध परीक्षेत ९४ हजारपैकी फक्त ७७६ विद्यार्थी पात्र; महाराष्ट्राची पिछेहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:52 PM

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय परीक्षेत लागणार दहावीच्या विद्यार्थ्यांचा कस

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीची परीक्षा येत्या ३ मार्चपासून आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहे. आता मे महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची मदत देता यावी, याकरिता ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. तत्पूर्वी प्रत्येक राज्याचा कोटा ठरवून राज्यपातळीवर परीक्षा घेऊन त्यातून प्रवर्गनिहाय विद्यार्थी निवडले जातात. त्यानुसार यंदा दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती.गुरुवारी राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार, सर्वसाधारण प्रवर्गातून ३१४, इतर मागास प्रवर्गातून २११, अनुसूचित जाती प्रवर्गातून ११६, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ५८ आणि आर्थिक दुर्बल घटकातून ७७ असे एकंदर ७७६ विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. आता १० मे रोजी एनसीईआरटीतर्फे देशपातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीसाठी १२५० रुपये तर त्यानंतर पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडीपर्यंत २००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देशभरातून केवळ २००० विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र ठरले होते. त्यातील २६२ विद्यार्थी महाराष्ट्राचे होते, हे विशेष.यवतमाळला मिळाला भोपळाराज्यस्तरावर झालेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत यवतमाळातील एकही विद्यार्थी पात्र ठरू शकलेला नाही. तर विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी काहीअंशी स्थान मिळविले आहे. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक ४२ विद्यार्थी देशपातळीवर होणाºया परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थी