शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ५१% जलसाठा! यवतमाळ जिल्ह्यात पाण्याची स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:12 IST

जिल्ह्यात ७५ सिंचन प्रकल्प : उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु असे ७५ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या भरोशावरच जिल्हावासीयांची तहान भागते. तसेच शेती सिंचनासाठीही याच प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी कमी आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन नदी-नाले ओसंडून वाहली होती. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात फारसी पाणीटंचाई जाणवली नाही. अपवाद काही तालुक्यांतील गावांना टँकर्सने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. शिवाय काही विहिरींचे अधिग्रहण करण्यातत आले होते. मात्र, शहरांना पाणीटंचाईचा फटका बसला नाही. जिल्ह्यात पुस, बेंबळा आणि अरुणावती असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी या सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नसल्याचे दितस आहे. अरुणावती प्रकल्पात तर अवघे २९ टक्केच पाणी आहे. लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थितीही विशेष नाही. केवळ मध्यम प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे. एकूण प्रकल्पांत ५१.३२ टक्केच पाणी असल्याने चिंता कायम आहे. त्यामुळे दमदार पावसाची आवश्यकता आहे. 

प्रकल्पांमध्ये आहे जेमतेमच जलसाठामोठ्या पूस प्रकल्पात ५६.२८ टक्के जलसाठा असून, बेंबळात ३७.४० तर अरुणावतीत केवळ २९.२६ टक्केच पाणी आहे. मध्यम सातपैकी दोन १०० टक्के भरले असून, इतर पाच प्रकल्पात बऱ्यापैकी साठा आहे. लघू ६५ प्रकल्पांत केवळ ५२.६० टक्के पाणी आहे. गतवर्षी लघू प्रकल्पांत ६२.९९ टक्के जलसाठा होता. 

पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्गमध्यम वाघाडी १३ सेमी तर सायखेडा प्रकल्पातून १२ सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेमीने उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. लघू प्रकल्प असलेल्या टाकळीतून १.५० आणि मुंजाळा प्रकल्पातून २ सेमीने पाणी विसर्ग सुरू आहे. 

२०२४ च्या तुलनेत मोठा बॅकलॉगजिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघू असे एकूण ७५ प्रकल्प आहे. गतवर्षी या सर्व प्रकल्पांमध्ये याच कालावधीपर्यंत ६५.१८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र कमी पर्जन्यमानामुळे प्रकल्पांमध्ये केवळ ५१.३२ टक्केची पाणी आहे. त्यामुळे सुमारे १४ टक्के पाण्याचा बॅकलॉग आहे. धरणे तुडुंब भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. 

मोठ्या, मध्यम प्रकल्पांतील पाण्याची आकडेवारीप्रकल्प                    दलघमी           टक्केपूस                            ५१.३६            ५६.२८अरुणावती                  ४९.६५            २९.२६बेंबळा                        ६८.८०            ३७.४०गोकी                          २४.०८            ५६.३८वाघाडी                       ३५.३६             १००सायखेडा                     २७.१८             १००लोअरपूस                    ३८.००            ६३.७३बोरगाव                       ५.७७             ८७.२९अडाण                        ४२.३९            ६३.०३नवरगाव                      ११.५८            ९२.७९

किती प्रकल्प ओव्हरफ्लो ?जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ वाघाडी आणि सायखेडा हे दोनच प्रकल्प ओव्हरफ्लो झाली आहे. या प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा असून, इतर पाच प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांच्या आतच पाणी आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ