शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

फक्त ५१% जलसाठा! यवतमाळ जिल्ह्यात पाण्याची स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:12 IST

जिल्ह्यात ७५ सिंचन प्रकल्प : उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु असे ७५ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या भरोशावरच जिल्हावासीयांची तहान भागते. तसेच शेती सिंचनासाठीही याच प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी कमी आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन नदी-नाले ओसंडून वाहली होती. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात फारसी पाणीटंचाई जाणवली नाही. अपवाद काही तालुक्यांतील गावांना टँकर्सने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. शिवाय काही विहिरींचे अधिग्रहण करण्यातत आले होते. मात्र, शहरांना पाणीटंचाईचा फटका बसला नाही. जिल्ह्यात पुस, बेंबळा आणि अरुणावती असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी या सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नसल्याचे दितस आहे. अरुणावती प्रकल्पात तर अवघे २९ टक्केच पाणी आहे. लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थितीही विशेष नाही. केवळ मध्यम प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे. एकूण प्रकल्पांत ५१.३२ टक्केच पाणी असल्याने चिंता कायम आहे. त्यामुळे दमदार पावसाची आवश्यकता आहे. 

प्रकल्पांमध्ये आहे जेमतेमच जलसाठामोठ्या पूस प्रकल्पात ५६.२८ टक्के जलसाठा असून, बेंबळात ३७.४० तर अरुणावतीत केवळ २९.२६ टक्केच पाणी आहे. मध्यम सातपैकी दोन १०० टक्के भरले असून, इतर पाच प्रकल्पात बऱ्यापैकी साठा आहे. लघू ६५ प्रकल्पांत केवळ ५२.६० टक्के पाणी आहे. गतवर्षी लघू प्रकल्पांत ६२.९९ टक्के जलसाठा होता. 

पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्गमध्यम वाघाडी १३ सेमी तर सायखेडा प्रकल्पातून १२ सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेमीने उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. लघू प्रकल्प असलेल्या टाकळीतून १.५० आणि मुंजाळा प्रकल्पातून २ सेमीने पाणी विसर्ग सुरू आहे. 

२०२४ च्या तुलनेत मोठा बॅकलॉगजिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघू असे एकूण ७५ प्रकल्प आहे. गतवर्षी या सर्व प्रकल्पांमध्ये याच कालावधीपर्यंत ६५.१८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र कमी पर्जन्यमानामुळे प्रकल्पांमध्ये केवळ ५१.३२ टक्केची पाणी आहे. त्यामुळे सुमारे १४ टक्के पाण्याचा बॅकलॉग आहे. धरणे तुडुंब भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. 

मोठ्या, मध्यम प्रकल्पांतील पाण्याची आकडेवारीप्रकल्प                    दलघमी           टक्केपूस                            ५१.३६            ५६.२८अरुणावती                  ४९.६५            २९.२६बेंबळा                        ६८.८०            ३७.४०गोकी                          २४.०८            ५६.३८वाघाडी                       ३५.३६             १००सायखेडा                     २७.१८             १००लोअरपूस                    ३८.००            ६३.७३बोरगाव                       ५.७७             ८७.२९अडाण                        ४२.३९            ६३.०३नवरगाव                      ११.५८            ९२.७९

किती प्रकल्प ओव्हरफ्लो ?जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ वाघाडी आणि सायखेडा हे दोनच प्रकल्प ओव्हरफ्लो झाली आहे. या प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा असून, इतर पाच प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांच्या आतच पाणी आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ