शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
3
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
4
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
5
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
6
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
7
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
8
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
9
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
10
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
11
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
12
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
13
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
14
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
15
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
16
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
17
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
18
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
19
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
20
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ५१% जलसाठा! यवतमाळ जिल्ह्यात पाण्याची स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:12 IST

जिल्ह्यात ७५ सिंचन प्रकल्प : उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु असे ७५ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या भरोशावरच जिल्हावासीयांची तहान भागते. तसेच शेती सिंचनासाठीही याच प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी कमी आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन नदी-नाले ओसंडून वाहली होती. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात फारसी पाणीटंचाई जाणवली नाही. अपवाद काही तालुक्यांतील गावांना टँकर्सने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. शिवाय काही विहिरींचे अधिग्रहण करण्यातत आले होते. मात्र, शहरांना पाणीटंचाईचा फटका बसला नाही. जिल्ह्यात पुस, बेंबळा आणि अरुणावती असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी या सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नसल्याचे दितस आहे. अरुणावती प्रकल्पात तर अवघे २९ टक्केच पाणी आहे. लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थितीही विशेष नाही. केवळ मध्यम प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे. एकूण प्रकल्पांत ५१.३२ टक्केच पाणी असल्याने चिंता कायम आहे. त्यामुळे दमदार पावसाची आवश्यकता आहे. 

प्रकल्पांमध्ये आहे जेमतेमच जलसाठामोठ्या पूस प्रकल्पात ५६.२८ टक्के जलसाठा असून, बेंबळात ३७.४० तर अरुणावतीत केवळ २९.२६ टक्केच पाणी आहे. मध्यम सातपैकी दोन १०० टक्के भरले असून, इतर पाच प्रकल्पात बऱ्यापैकी साठा आहे. लघू ६५ प्रकल्पांत केवळ ५२.६० टक्के पाणी आहे. गतवर्षी लघू प्रकल्पांत ६२.९९ टक्के जलसाठा होता. 

पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्गमध्यम वाघाडी १३ सेमी तर सायखेडा प्रकल्पातून १२ सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेमीने उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. लघू प्रकल्प असलेल्या टाकळीतून १.५० आणि मुंजाळा प्रकल्पातून २ सेमीने पाणी विसर्ग सुरू आहे. 

२०२४ च्या तुलनेत मोठा बॅकलॉगजिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघू असे एकूण ७५ प्रकल्प आहे. गतवर्षी या सर्व प्रकल्पांमध्ये याच कालावधीपर्यंत ६५.१८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र कमी पर्जन्यमानामुळे प्रकल्पांमध्ये केवळ ५१.३२ टक्केची पाणी आहे. त्यामुळे सुमारे १४ टक्के पाण्याचा बॅकलॉग आहे. धरणे तुडुंब भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. 

मोठ्या, मध्यम प्रकल्पांतील पाण्याची आकडेवारीप्रकल्प                    दलघमी           टक्केपूस                            ५१.३६            ५६.२८अरुणावती                  ४९.६५            २९.२६बेंबळा                        ६८.८०            ३७.४०गोकी                          २४.०८            ५६.३८वाघाडी                       ३५.३६             १००सायखेडा                     २७.१८             १००लोअरपूस                    ३८.००            ६३.७३बोरगाव                       ५.७७             ८७.२९अडाण                        ४२.३९            ६३.०३नवरगाव                      ११.५८            ९२.७९

किती प्रकल्प ओव्हरफ्लो ?जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ वाघाडी आणि सायखेडा हे दोनच प्रकल्प ओव्हरफ्लो झाली आहे. या प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा असून, इतर पाच प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांच्या आतच पाणी आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ