एक हजार ३७७ जणांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:18+5:30
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर शहरी भागात त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे.

एक हजार ३७७ जणांची घरवापसी
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यात विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून आजपर्यंत एक हजार ३७७ नागरिक, मजूर, विद्यार्थी आले आहेत. त्यांची प्रथमत: केळापूर येथील जगदंबा मंदिरात वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. तेथे आरोग्य विभाग, महसूल व पोलीस विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर शहरी भागात त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे. रेड झोनमध्ये असलेल्या पुणे येथून ९८, तर मुंबईतून ५८ नागरिक आले आहेत. आजपर्यंत केळापूर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण आढळून आला नाही, ही प्रशासनाची जमेची बाजू आहे. मात्र प्रशासनासोबतच नागरिकांची जबाबदारेखील वाढली आहे.
आता मात्र स्थलांतरीत नागरिकांना किमान १४ दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. तसेच कोणाला कोरोनाविषयक लक्षणे आढळून आले, तर तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना कळवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. अन्यथा एखादी छोटीशी चूकदेखिल अनेकांचे जीव धोक्यात टाकू शकते. त्यामुळे नागरिकांना ३१ मेपर्यंत अतिशय जागरूक व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.