शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सततच्या लॉकडाऊनला कंटाळून इसमाची आत्महत्या; मजुरीने चालायचा कुटुंबाचा उदारनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 11:43 IST

लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत चार लॉकडाऊन निघून गेले आणि अखेर पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली.

यवतमाळ: घरात अठरा विश्व दारिद्र्य. त्यातच वृद्ध आईवडील आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. यातच पाचवा लॉकडाऊन घोषित झाल्याचे वृत्त येताच, खचलेल्या सुनील टेकाम (वय 35 वर्षे) रा. नरसाळा याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील नरसाळा येथील टेकाम कुटुंबीयसुद्धा गेल्या अडीच महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने त्रस्त होते रोज मजुरी करून  या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालायचा. परंतु मार्च महिन्यात कोरोनाने  देश लॉकडाऊन झाला आणि पोट भरण्याचा प्रश्न आवासून समोर आला. सुरवातीला अनेक समाजसेवकांनी मदतीचे हात पुढे केले. परंतु हळूहळू मदतीचे हे हात लुप्त व्हायला लागले. आता आईवडील आणि मुलांना सांभाळायचं कस, हा न सुटणारा प्रश्न सुनीलला उपाशीपोटी अस्वस्थ करीत होता. लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत चार लॉकडाऊन निघून गेले आणि अखेर  पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली. राज्यात दररोज वाढणारा कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता कुटुंबाची वाताहात होणार, या विचाराने तो अस्वस्थ झाला. आणि त्याने अखेर आत्महत्येचा निर्णय घेतला. ३१ मे रोजी पाच वाजताच्या दरम्यान, मी गिट्टी खदाणीवर काम शोधून येतो, असे कुटुंबियांना सांगून त्याने घर सोडले आणि नामदेव दुर्गे या शेतकऱ्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे  वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuicideआत्महत्याYavatmalयवतमाळ