शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

एक रुपयात विम्याचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ - कृषिमंत्री धनंजय मुंडे

By अविनाश साबापुरे | Updated: August 18, 2023 18:05 IST

पुसद येथे वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कारांचे वितरण

पुसद (यवतमाळ) : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाने पंचामृत अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

पुसद येथे शुक्रवारी ‘वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात हा समारंभ झाला. यावेळी आमदार ॲड. निलय नाईक, आमदार इंद्रनिल नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, माजी राज्यमंत्री डॅा. एन. पी. हिराणी, बाबासाहेब नाईक कापूस सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी आमदार ख्वाजा बेग, राजेंद्र नजरधने व शेतकरी उपस्थित होते.

हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, वसंतराव नाईक यांचे कार्य अजरामर आहे. मुख्यमंत्री असताना दुष्काळासारख्या संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी राज्यात हरितक्रांती घडविली. त्यांनी सुरु केलेली रोजगार हमी योजना आजही सुरु आहे. राज्य शासनाचे कृषिभूषण पुरस्कार येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही कृषिमंत्री मुंडे यांनी दिली.

पीएम किसान योजनेंतर्गत ४५ लाख लोकांना लाभ मिळाला. ई-केवायसी, आधार लिंक, भूमिअभिलेखच्या अडचणींमुळे वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पहिल्या टप्याचा लाभ दिला जाईल. नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून १२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याचा पहिला हप्ता लवकरच दिला जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना पुन्हा सुरु करणार आहोत. मागेल त्याला शेततळे, शेडनेट, ठिबक सिंचनासाठी अर्ज करणाऱ्यांना लाभ दिला जाईल. खते, बियाण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पुरस्कार दिला जातो, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे हे काम कौतुकास्पद असल्याचे मुंडे म्हणाले.

पुरस्कारार्थींची माहिती

यावेळी प्रगतीशिल शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात कपिल जयप्रकाश जाचक (जाचकवाडी, जि. पुणे), बजरंग सदाशिव साळुंखे (बामणी, जि. सोलापूर), विश्वास आनंदराव पाटील (लोहारा, जि. जळगाव), महेंद्र निंबा परदेशी (कुसुंबा, जि. धुळे), बाळासाहेब नारायणराव पडूळ (लाडसावंगी, जि. औरंगाबाद), अनिल तुळशीराम शेळके (कुंभेफळ, जि.औरंगाबाद), मिथिलेश हरिश्चंद्र देसाई (लांजा, जि. रत्नागिरी), संदिप बबन कांबळे (खानू, जि. रत्नागिरी), रवींद्र जयाजी गायकवाड (गायवड, जि. वाशिम), अनिल शिवलाल किरणापुरे (लवारी, जि. भंडारा), कृषी शास्त्रज्ञ प्रा. डॅा. दिगंबर मोकाट, वनस्पती विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महिला शेतकरी सविता वैभव नालकर (चिंचविहिरे, जि. अहमदनगर) यांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेFarmerशेतकरीYavatmalयवतमाळCrop Insuranceपीक विमा