शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

कोरोना रुग्ण वाढल्यानंतर एसटीने गावाकडचा मुक्काम थांबविला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यानंतरही एसटीचा गावाकडचा हालटिंग टाईम येत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खासगी वाहनावर विसंबून राहावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.  मात्र अनेक शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने काहींची फरपट थांबली आहे. 

ठळक मुद्देशाळा सुरू झाल्यानंतरच ग्रामीण भागातील मुक्कामाला जाणाऱ्या बसेस वाढतील

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ग्रामीण भागाचे संपूर्ण गणित एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांवर अवलंबून होते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एसटी बस हमखास ठरलेली होती. कोरोनामुळे ही एसटी बस गावातच येणे बंद झाले आहे. अनेक भागात एसटीचा मुक्काम थांबला आहे. विविध भागात एसटी दररोज एक लाख किलोमीटरचा प्रवास करते. ज्या मार्गावर सर्वाधिक प्रवासी असतात अशाच ठिकाणी एसटी ये-जा करीत आहे. ग्रामीण भागात मुक्कामाला जाणारी एसटी सध्या तरी बंद आहे. कोरोना रुग्ण वाढल्यानंतर एसटीने गावाकडचा मुक्काम थांबविला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यानंतरही एसटीचा गावाकडचा हालटिंग टाईम येत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खासगी वाहनावर विसंबून राहावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.  मात्र अनेक शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने काहींची फरपट थांबली आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल सुरूच

कोरोना काळापूर्वी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मुक्कामी बस राहात होत्या. कोरोनामुळे अनेक बस बंद करण्यात आल्या. परिणामी त्या गावात बस मुक्कामी राहणे गेल्या दोन वर्षांपासून बंद झाले. गावात मुक्कामी असलेल्या बसच्या वेळापत्रकानुसार त्या गावातील व मार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे वेळापत्रक ठरत होते. बसच्या वेळेनुसार नागरिक आपल्या कामांचे नियोजन करीत होते. मात्र मुक्कामी बस बंद झाल्यामुळे नागरिकांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांचे हाल होत आहे. मुक्कामी बसअभावी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल अद्यापही सुरूच आहे. 

सर्व बसेस आगारातच

जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये असलेल्या एसटी बसेस सध्या आगारात आहे.एकूण बसेसपैकी आठ ते दहा बसेस इतर आगारांमध्ये मुक्कामी आहेत.शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या बसेस सुरू होणार आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर मुक्कामी बस सुरू होणार एसटी बसेस सुरू करताना सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. ज्या मार्गावर अधिक प्रवासी मिळतात अशा ठिकाणी एसटी बसेस सुरू आहे. ग्रामीण भागात मुक्कामाला असणाऱ्या एसटी बसेस शाळा सुरू झाल्यानंतरच सुरू होणार आहे.  - श्रीनिवास जोशीविभाग नियंत्रक, यवतमाळ

रूग्ण घटले; एसटी कधी धावणार?

शाळा सुरू झाल्या आहे. दहाव्या वर्गातील विद्यार्थी विद्यालयात जाण्यासाठी तयार आहे. मात्र त्यांना जाण्यासाठी एसटी मिळत नाही. कुणाला तरी खासगी वाहनाने मोठ्या गावापर्यंत जावे लागते. त्यानंतर पुढील प्रवास सुरू होतो. एसटीने मुक्कामी बसेस सुरू कराव्यात. एसटीअभावी काही विद्यार्थ्यांना चिखल तुडवित शाळेत जावे लागत आहे.  - सुभाष जाधव 

ग्रामीण भागातून शहरी भागात पोहोचण्यासाठी गावातील पहिली बस सर्वांसाठी महत्त्वाची आहे. इतकेच नव्हेतर रात्रीचा हालटिंग टाईम महत्त्वाचा आहे. या दोन्ही गाड्या गावाकडे येणे बंद झाल्या आहे. यामुळे प्रवाशांना जमेल त्या वाहनाने सकाळी शहराकडे प्रवास करावा लागतो. तरच कामे होतात. खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी अवास्तव खर्च करावा लागत आहे.     - मयूर मेश्राम

 

टॅग्स :state transportएसटी