शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

कोरोना रुग्ण वाढल्यानंतर एसटीने गावाकडचा मुक्काम थांबविला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यानंतरही एसटीचा गावाकडचा हालटिंग टाईम येत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खासगी वाहनावर विसंबून राहावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.  मात्र अनेक शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने काहींची फरपट थांबली आहे. 

ठळक मुद्देशाळा सुरू झाल्यानंतरच ग्रामीण भागातील मुक्कामाला जाणाऱ्या बसेस वाढतील

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ग्रामीण भागाचे संपूर्ण गणित एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांवर अवलंबून होते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एसटी बस हमखास ठरलेली होती. कोरोनामुळे ही एसटी बस गावातच येणे बंद झाले आहे. अनेक भागात एसटीचा मुक्काम थांबला आहे. विविध भागात एसटी दररोज एक लाख किलोमीटरचा प्रवास करते. ज्या मार्गावर सर्वाधिक प्रवासी असतात अशाच ठिकाणी एसटी ये-जा करीत आहे. ग्रामीण भागात मुक्कामाला जाणारी एसटी सध्या तरी बंद आहे. कोरोना रुग्ण वाढल्यानंतर एसटीने गावाकडचा मुक्काम थांबविला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यानंतरही एसटीचा गावाकडचा हालटिंग टाईम येत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खासगी वाहनावर विसंबून राहावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.  मात्र अनेक शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने काहींची फरपट थांबली आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल सुरूच

कोरोना काळापूर्वी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मुक्कामी बस राहात होत्या. कोरोनामुळे अनेक बस बंद करण्यात आल्या. परिणामी त्या गावात बस मुक्कामी राहणे गेल्या दोन वर्षांपासून बंद झाले. गावात मुक्कामी असलेल्या बसच्या वेळापत्रकानुसार त्या गावातील व मार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे वेळापत्रक ठरत होते. बसच्या वेळेनुसार नागरिक आपल्या कामांचे नियोजन करीत होते. मात्र मुक्कामी बस बंद झाल्यामुळे नागरिकांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांचे हाल होत आहे. मुक्कामी बसअभावी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल अद्यापही सुरूच आहे. 

सर्व बसेस आगारातच

जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये असलेल्या एसटी बसेस सध्या आगारात आहे.एकूण बसेसपैकी आठ ते दहा बसेस इतर आगारांमध्ये मुक्कामी आहेत.शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या बसेस सुरू होणार आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर मुक्कामी बस सुरू होणार एसटी बसेस सुरू करताना सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. ज्या मार्गावर अधिक प्रवासी मिळतात अशा ठिकाणी एसटी बसेस सुरू आहे. ग्रामीण भागात मुक्कामाला असणाऱ्या एसटी बसेस शाळा सुरू झाल्यानंतरच सुरू होणार आहे.  - श्रीनिवास जोशीविभाग नियंत्रक, यवतमाळ

रूग्ण घटले; एसटी कधी धावणार?

शाळा सुरू झाल्या आहे. दहाव्या वर्गातील विद्यार्थी विद्यालयात जाण्यासाठी तयार आहे. मात्र त्यांना जाण्यासाठी एसटी मिळत नाही. कुणाला तरी खासगी वाहनाने मोठ्या गावापर्यंत जावे लागते. त्यानंतर पुढील प्रवास सुरू होतो. एसटीने मुक्कामी बसेस सुरू कराव्यात. एसटीअभावी काही विद्यार्थ्यांना चिखल तुडवित शाळेत जावे लागत आहे.  - सुभाष जाधव 

ग्रामीण भागातून शहरी भागात पोहोचण्यासाठी गावातील पहिली बस सर्वांसाठी महत्त्वाची आहे. इतकेच नव्हेतर रात्रीचा हालटिंग टाईम महत्त्वाचा आहे. या दोन्ही गाड्या गावाकडे येणे बंद झाल्या आहे. यामुळे प्रवाशांना जमेल त्या वाहनाने सकाळी शहराकडे प्रवास करावा लागतो. तरच कामे होतात. खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी अवास्तव खर्च करावा लागत आहे.     - मयूर मेश्राम

 

टॅग्स :state transportएसटी