शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

रेती तस्करी महसूल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:52 IST

नदी-नाल्यांमधील रेती हा शासनाच्या महसुलाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यात १२० पैकी शंभरांवर घाटाचा अद्याप लिलाव न झाल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे.

ठळक मुद्देशासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय : घाटांच्या लिलावाआधीच हजारो ब्रासचा उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नदी-नाल्यांमधील रेती हा शासनाच्या महसुलाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यात १२० पैकी शंभरांवर घाटाचा अद्याप लिलाव न झाल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. या उलट या घाटांमधून शासनाला एक रुपयाही न भरता तस्कर हजारो ब्रास रेतीचा उपसा करीत आहे. एरव्ही शासनाला जाणारा कोट्यवधींचा महसूल या तस्करांच्या तिजोरीत जातो आहे. त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासकीय व राजकीय यंत्रणेचीही साथ लाभत असल्याने जिल्ह्यातील ही रेती तस्करी महसूल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.जिल्ह्यात शंभरावर घाट मोकळेचजिल्ह्यात रेतीचे १२० प्रमुख घाट आहेत. त्यापैकी कळंब वेणी (झरी), बेलोरा (वणी), कोटीशारी (घाटंजी), ताडसावळी (घाटंजी), निंबर्डा (घाटंजी), भोसा तांडा (यवतमाळ), सावंगी (दारव्हा), नवरगाव (बाभूळगाव) आदी अवघ्या १७ ते १८ घाटांचा लिलाव झाला आहे. उर्वरित घाटांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. पर्यायाने या घाटांमधून शासनाला मिळणारा कोट्यवधींचा महसूल थांबला आहे. कागदोपत्री घाटाचे लिलाव झाले नसले तरी प्रत्यक्षात या घाटांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा राजरोसपणे केला जात आहे. त्यासाठी कुठे छुपे पाठबळ तर कुठे महसूल यंत्रणेला हुलकावणी देऊन आपले काम फत्ते केले जात आहे. महसूल यंत्रणाही कुठे प्रामाणिकपणे तर कुठे केवळ देखाव्यासाठी कारवाईचा बागुलबुवा उभा करताना दिसत आहे.बाभूळगावात तस्करांवरील पकड सैलबाभूळगाव येथे नव्या तहसीलदारांच्या दमदार एन्ट्रीनंतर रेती तस्करीला बऱ्यापैकी आळा बसला होता. त्यांची तहसील कार्यालयातील पहिल्या दिवसाची ‘पायदळ एन्ट्री’ सर्वांना अपिलही झाली. परंतु अलिकडे रेती तस्करांवरील त्यांची पकड सैल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या तालुक्यात बेंबळा व वर्धा नदीतून शेकडो ब्रास रेतीचा उपसा करण्यात येतो आहे. गेली सहा महिने तेथे घाटांचे लिलाव नाही.नेर, नांदगाव खंडेश्वरपर्यंत पुरवठाबाभूळगाव तालुक्यातील रेती नेर व अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरपर्यंत राजरोसपणे पाठविली जात असल्याने या रेती तस्करीला शासकीय यंत्रणेतील अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यवतमाळ, आर्णी, पांढरकवडा आदी तालुक्यात हर्रास न झालेल्या घाटांमधून ट्रॅक्टर-ट्रकने चोरी केली जात आहे. कळंब तालुक्यात तर कळसपूर येथे मशीनने रस्ता करून ट्रेझर बोटद्वारे हजारो ब्रास रेतीचा उपसा करण्यात आला.दिग्रसमध्ये चक्क बनावट पावत्यादिग्रस तालुक्यात तर रेती तस्करीसाठी चक्क बनावट पावत्यांचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. या पावत्या बनावट असल्याचे स्पष्टपणे जाणवत असूनही शासकीय यंत्रणा ठोस कारवाईसाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. दिग्रसमधील या बनावट पावत्या जिल्हा प्रशासनासाठी आव्हान ठरल्या आहे.भाजप आमदार थेट रेती घाटांवर!आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी काही दिवसांपूर्वी घाटंजी तालुक्यातील कोटीशारी, ताडसावळी या लिलाव झालेल्या रेती घाटांवर स्वत: भेट देऊन रेती तस्करीची वाहने पकडल्याचे सांगितले जाते. या घाटांवर आमदारांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला होता. आमदारांच्या या तत्परतेमागे महसूल यंत्रणेवरील अविश्वास की वेगळेच काही अशी चर्चा केली जात आहे. आमदार खरोखरच तत्पर असतील तर मतदारसंघात चालणाºया मटका-जुगाराच्या अवैध धंद्यांवर धाडी का घालत नाहीत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.बाभूळगाव, राळेगाव, कळंबमध्ये सर्वाधिकराळेगाव, कळंब, बाभूळगाव या तीनच तालुक्यातील रेती घाटांमधून शासनाला वर्षाकाठी किमान चार ते पाच कोटींचा महसूल मिळतो. परंतु यावर्षी बहुतांश घाटांचे लिलाव झाले नाही. बाभूळगाव तालुक्यातील नारगाव घाटाचा नुकताच लिलाव झाला. परंतु तेथून अद्याप अधिकृत रेती उपसा सुरू झालेला नाही. या तीन तालुक्यातील घाटांमधून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेतीची तस्करी केली जात आहे. शासनाला मिळणारा महसूल तस्करांच्या घशात व त्यांना पाठबळ देणाºया संबंधित शासकीय यंत्रणेच्या खिशात जातो आहे.लिलाव वर्धा-चंद्रपुरात, उपसा मात्र यवतमाळातवर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा या भागात त्या जिल्ह्यात घाटांचे लिलाव झाले आहेत. परंतु या घाटांवरून यवतमाळ जिल्हा सीमेवरील बोरगाव, सोनेगाव, नगाजी पार्डी, रोहिट कोसारा, घोटी कोच्ची, बोरी या गावांमधून ट्रेझर बोटद्वारे सर्रास रेतीचा उपसा व तस्करी होत आहे. वना नदीतून ही तस्करी केली जात आहे.वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वत्र तस्करीजिल्हाभरातील वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वच तालुक्यातील रेती घाटांवर सुरू असलेल्या या उपसा व तस्करीने तमाम महसूल यंत्रणेच्या कर्तव्यदक्षतेवरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे. घाटांचा लिलाव न होण्यामागे काही शासकीय यंत्रणेचे षडयंत्र तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जाते. काही अधिकारी प्रामाणिकपणे रेती घाटांवर नजर ठेऊन आहे. मात्र त्यांची संख्या अगदीच नगन्य आहे. त्यातही त्यांची अधिनस्त यंत्रणा तेवढ्याच प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असेल याचीही हमी नाही. रेती घाट लिलावातील कायदेशीर अडचणींंचा तस्कर व शासकीय यंत्रणा पुरेपूर फायदा उठवित असल्याचे बोलले जाते.