शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

यवतमाळ विद्युत कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठाेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:33 IST

Electricity Bill: वीज बिल माफीची मागणी : वीज ग्राहक संघटनेची आक्रमक भूमिका

यवतमाळ : वीज बिल माफीसाठी सरकारकडून केवळ आश्वासन दिली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहक संघटनेने मंगळवारी विद्युत कंपनीच्या स्थानिक लोहारा येथील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

दरमहा ३०० युनिटच्या आत वीज वापर असलेल्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची सहा महिन्याच्या काळातील संपूर्ण वीज देयके माफ करावी, यासाठी १३ जुलै २०२० रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले. बिलाची होळी करून राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. २२ जिल्हे तसेच अनेक ठिकाणी गावपातळीवर हे आंदोलन झाले. यावर सरकारकडून कुठलीही कारवाई झाली नाही.

२० ते ३० टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली. ही सवलत नाकारत तीन महिन्याचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, ही मागणी घेवून १० ऑगस्टला धरणे देण्यात आले. यानंतरही गेल्या अडीच महिन्यात कोणताही निर्णय झाला नाही. अखेर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी विद्युत कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. सहा महिने कालावधीचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी करण्यात आली.

कुलूप ठोकताना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दर्यापुरकर, उपाध्यक्ष राजू जेकब, दत्ता कुळकर्णी, अमोल देशमुख, सुहास सावरकर, अविनाश धनेवार, मोहन रिनाईत, राधेश्याम निमोदिया, राजू राणा आदी उपस्थित होते.

देशातील केरळ, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील सरकारने घरगुती वीज बिलामध्ये ५० टक्के सवलत दिली. महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक वीज ग्राहक अडचणीत आहे. यात गरीब आणि सामान्य व्यक्ती अधिक अडचणीत आला आहे. लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही बिले भरण्याचा तगादा लावला जात आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील सहा महिन्यांची देयके माफ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण