शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

यवतमाळ विद्युत कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठाेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:33 IST

Electricity Bill: वीज बिल माफीची मागणी : वीज ग्राहक संघटनेची आक्रमक भूमिका

यवतमाळ : वीज बिल माफीसाठी सरकारकडून केवळ आश्वासन दिली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहक संघटनेने मंगळवारी विद्युत कंपनीच्या स्थानिक लोहारा येथील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

दरमहा ३०० युनिटच्या आत वीज वापर असलेल्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची सहा महिन्याच्या काळातील संपूर्ण वीज देयके माफ करावी, यासाठी १३ जुलै २०२० रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले. बिलाची होळी करून राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. २२ जिल्हे तसेच अनेक ठिकाणी गावपातळीवर हे आंदोलन झाले. यावर सरकारकडून कुठलीही कारवाई झाली नाही.

२० ते ३० टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली. ही सवलत नाकारत तीन महिन्याचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, ही मागणी घेवून १० ऑगस्टला धरणे देण्यात आले. यानंतरही गेल्या अडीच महिन्यात कोणताही निर्णय झाला नाही. अखेर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी विद्युत कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. सहा महिने कालावधीचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी करण्यात आली.

कुलूप ठोकताना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दर्यापुरकर, उपाध्यक्ष राजू जेकब, दत्ता कुळकर्णी, अमोल देशमुख, सुहास सावरकर, अविनाश धनेवार, मोहन रिनाईत, राधेश्याम निमोदिया, राजू राणा आदी उपस्थित होते.

देशातील केरळ, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील सरकारने घरगुती वीज बिलामध्ये ५० टक्के सवलत दिली. महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक वीज ग्राहक अडचणीत आहे. यात गरीब आणि सामान्य व्यक्ती अधिक अडचणीत आला आहे. लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही बिले भरण्याचा तगादा लावला जात आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील सहा महिन्यांची देयके माफ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण