पुसद तालुक्यात कोरोना विषाणू बळींची संख्या पोहोचली १५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:10+5:30
गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच तर २१ ऑगस्टला पाच अशा ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

पुसद तालुक्यात कोरोना विषाणू बळींची संख्या पोहोचली १५ वर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ जणांचे बळी गेले आहे. शनिवारी नव्याने नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.
गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच तर २१ ऑगस्टला पाच अशा ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली आहे.
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये एका जिल्हा परिषद शिक्षकाचा समावेश आहे. याशिवाय शुक्रवारी एका ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बळीसंख्या १५ वर पोहोचली आहे. शनिवारी पॉथझटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये एका शिक्षकासह लोहार लाईनमधील सहा, द्वारकानगरीतील दोन आणि पार्वतीनगरमधील एकाचा समावेश आहे. तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या एकूण आता ४५० वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ३४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नव्याने ३५ जणांचे स्वॅब यवतमाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.
शहर व तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनला आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढत आहे. संपूर्ण यंत्रणा रुग्णांवरील उपचार आणि संशयित रुग्णांचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही पुरेशाप्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनात यंत्रणा कार्यरत आहे. आता नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
गर्दीमुळे संसर्गाचा धोका कायम
प्रशासनातर्फे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, टीएचओ डॉ.आशीष पवार, बीडीओ शिवाजी गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुंकलवाड आदी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र अनेक नागरिक विनाकारण विनामास्क घराबाहेर पडत आहे. गणेशचतुर्थीला बाजारात गर्दी दिसून आली.