आता शेतकऱ्यांच्या हाती भूईमुगाचे टरफलच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:20 IST2018-05-28T22:20:17+5:302018-05-28T22:20:41+5:30
यावर्षीच्या हंगामात भुईमूग उत्पादकांना एका बॅगला ५० किलो ते १०० किलोचाच उतारा आला. यामुळे लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आता शेतकऱ्यांना कुटारावरच समाधान मानण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

आता शेतकऱ्यांच्या हाती भूईमुगाचे टरफलच
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षीच्या हंगामात भुईमूग उत्पादकांना एका बॅगला ५० किलो ते १०० किलोचाच उतारा आला. यामुळे लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आता शेतकऱ्यांना कुटारावरच समाधान मानण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
गतवर्षी जिल्ह्यात भूईमुगाची रेकॉर्डबे्रक लागवड झाली. यावर्षी या क्षेत्रात रेकॉर्डब्रेक घट झाली आहे. भविष्यात शेतकरी भुईमूग पेरणार किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी एका बॅगला ५ ते १० क्विंटलपर्यंत भूईमुगाचा उतारा येतो. यावर्षी हा उतारा २० किलो ते एक क्विंटलपर्यंतच मर्यादित राहिला आहे. भूईमुगाचे दरही पडलेले आहे. यामुळे भुईमूग लागवड खर्च निघणे अवघड आहे.
भुईमूगाचे उत्पादन घटण्यामागे वाढलेले तापमान कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात बियाण्याची भेसळही उतारा कमी येण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कृषी विद्यापीठाच्या तपासणीनंतरच यातील वास्तव पुढे येणार आहे.
भुुईमूग उत्पादन घटण्याचे प्रमुख कारण न शोधल्यास येणाºया हंगामात भूईमुगाचा पेरा शून्यावर येण्याची शक्यता आहे.
यामुळे कृषी विभागाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना त्यांच्या चुकलेल्या बाबीचे मार्गदर्शन करण्यासोबत बियाणे कंपन्या दोषी असल्यास त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. तरच भूईमुगाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.
शेंगांची संख्या घटली, दाणे भरलेच नाही
भूईमुगाच्या झाडाला लागणाऱ्या शेंगांची संख्या यावर्षी तिप्पट प्रमाणात घटली आहे. अनेक शेंगा भरल्याच नाही. यामुळे अशा पोकळ शेंगामध्ये दाणाच नाही. यातुन भूईमुगाचे एकरी उत्पादन कमी झाले.