शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

आता जनआरोग्यचा लाभ सर्वांनाच; कोरोनामुळे निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:41 IST

कोव्हीड -१९ साथरोग प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना दिला जाणार आहे. यापूर्वी योजनेत ८५ टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश होता. उर्वरित १५ टक्के नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित होते.

ठळक मुद्दे३१ जुलै २०२० पर्यंत योजनेची मुदत

प्रकाश लामणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोव्हीड -१९ साथरोग प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना दिला जाणार आहे. यापूर्वी योजनेत ८५ टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश होता. उर्वरित १५ टक्के नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित होते.या योजनेत लाभार्थ्यांना रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसीलदारांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा तसेच शासनमान्य छायाचित्र ओळखपत्र देणे आवश्यक राहणार आहे. या योजनेची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत आहे. नंतर आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात २६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये सुधारित महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संलग्नीकरण करुन एकत्रित स्वरुपात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकायार्ने १ एप्रिल २०२० पासून अंमलात आली. सध्या योजनेतंर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत एक हजार २०९ (१२०९) उपचार नागरिकांना पुरविले जातात. त्याचा लाभ राज्यातील दोन कोटी २३ लाख कुटुंबांना मिळत आहे. यात राज्यातील ८५ टक्के लोकसंख्येचा समावेश आहे.आता राज्यातील कोव्हीड-१९ उद्रेकाची स्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील उर्वरित नागरिकांना ९६६ उपचार पद्घतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या १३४ उपचारांपैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवण यंत्राचा उपचार वगळता १२० उपचार संबंधित अंगीकृत खासगी रुग्णालयांत ३१ जुलै २०२० पर्यंत मान्यताप्राप्त दराने नागरिकांना लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांच्या खचार्ची प्रतिपूर्ती विमा कंपनीकडून व लाभार्थी नसलेल्या कुटुंबाच्या उपचाराच्या खचार्ची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे हमी तत्वावर दिली जाणार आहे.कोव्हीड-१९ साठी शासनाने जाहीर केलेल्या खासगी अंगीकृत रूग्णालयांकडून कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पीपीई किट्स व एन-९५ मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार निधी दिला जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत संनियंत्रण करण्यात येणार आहे. ३१ जुलै २०२० नंतर आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीनिशी २३ मे २०२० रोजी काढण्यात आलेल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यांचा समावेशमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पिवळी, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना शिक्षापत्रिकाधारक कुटुंबे आणि अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, औरंगाबाद आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील जीवीत नोंदणीकृत लाभार्थी कुटुंबे योजनेत समाविष्ट असणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना २०११ मधील नोंदीत लाभार्थी कुटुंबे समाविष्ट आहे. ग्रामीण भागातील स्वाभाविक निकष व शहरी भागासाठी व्यवसायिक निकष ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य