शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

आता जनआरोग्यचा लाभ सर्वांनाच; कोरोनामुळे निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:41 IST

कोव्हीड -१९ साथरोग प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना दिला जाणार आहे. यापूर्वी योजनेत ८५ टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश होता. उर्वरित १५ टक्के नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित होते.

ठळक मुद्दे३१ जुलै २०२० पर्यंत योजनेची मुदत

प्रकाश लामणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोव्हीड -१९ साथरोग प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना दिला जाणार आहे. यापूर्वी योजनेत ८५ टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश होता. उर्वरित १५ टक्के नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित होते.या योजनेत लाभार्थ्यांना रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसीलदारांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा तसेच शासनमान्य छायाचित्र ओळखपत्र देणे आवश्यक राहणार आहे. या योजनेची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत आहे. नंतर आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात २६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये सुधारित महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संलग्नीकरण करुन एकत्रित स्वरुपात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकायार्ने १ एप्रिल २०२० पासून अंमलात आली. सध्या योजनेतंर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत एक हजार २०९ (१२०९) उपचार नागरिकांना पुरविले जातात. त्याचा लाभ राज्यातील दोन कोटी २३ लाख कुटुंबांना मिळत आहे. यात राज्यातील ८५ टक्के लोकसंख्येचा समावेश आहे.आता राज्यातील कोव्हीड-१९ उद्रेकाची स्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील उर्वरित नागरिकांना ९६६ उपचार पद्घतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या १३४ उपचारांपैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवण यंत्राचा उपचार वगळता १२० उपचार संबंधित अंगीकृत खासगी रुग्णालयांत ३१ जुलै २०२० पर्यंत मान्यताप्राप्त दराने नागरिकांना लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांच्या खचार्ची प्रतिपूर्ती विमा कंपनीकडून व लाभार्थी नसलेल्या कुटुंबाच्या उपचाराच्या खचार्ची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे हमी तत्वावर दिली जाणार आहे.कोव्हीड-१९ साठी शासनाने जाहीर केलेल्या खासगी अंगीकृत रूग्णालयांकडून कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पीपीई किट्स व एन-९५ मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार निधी दिला जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत संनियंत्रण करण्यात येणार आहे. ३१ जुलै २०२० नंतर आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीनिशी २३ मे २०२० रोजी काढण्यात आलेल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यांचा समावेशमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पिवळी, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना शिक्षापत्रिकाधारक कुटुंबे आणि अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, औरंगाबाद आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील जीवीत नोंदणीकृत लाभार्थी कुटुंबे योजनेत समाविष्ट असणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना २०११ मधील नोंदीत लाभार्थी कुटुंबे समाविष्ट आहे. ग्रामीण भागातील स्वाभाविक निकष व शहरी भागासाठी व्यवसायिक निकष ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य