शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

दोन हजार गावांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले. या गावांना रेड कार्ड देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजलजन्य आजार : प्रतिबंधासाठी सतर्कता आणि उपाययोजना

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात जलजन्य आजाराचा जिल्ह्यात उद्रेक होण्याचा धोका आहे. तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दोन हजार ४० गावांना सतर्क राहण्याची नोटीस बजावली आहे. पावसाळ््यात प्रामुख्याने पेयजलातून साथरोगाची लागण होते. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. नदी काठावरच्या १८० गावांमध्ये काटेकोर उपाययोजना राबविल्या जात आहे.साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले. या गावांना रेड कार्ड देण्यात आले आहे.जोखीम क्षेत्रात येत असलेल्या ३१ गावांमध्ये साथरोग प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. साथरोगाची स्थिीत उद्भवल्यास आरोग्य विभागाने शिघ्र कृती दल स्थापन केले आहे. प्रथमोपचार कीट तयार आहे. ज्या गावांमध्ये संभाव्य धोका आहे, अशा ठिकाणी दररोज भेटी देऊन तेथील आढावा घेतला जात आहे.नदी काठची १८० गावे संवेदनशीलनदी काठावरील गावांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका संभवतो. पुराचे पाणी नदी पात्रात गेल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याच दाट शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता यावर्षी पाऊस सरासरी ओलांडणार हे निश्चित मानले जात आहे. त्याच दृष्टीकोणातून आरोग्य विभाग उपाययोजना करीत आहे. यवतमाळ तालुक्यात चार, बाभूळगाव १४, कळंब १०, राळेगाव चार, घाटंजी चार, पांढरकवडा नऊ, मारेगाव आठ, झरी जामणी दहा, वणी १५, नेर पाच, दारव्हा १७, आर्णी १५, दिग्रस दोन, पुसद २२, महागाव २७, उमरखेड १३ या गावांचा समावेश आहे. यातही ३१ गावे अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहेत. त्या ठिकाणचा दररोज अहवाल घेतला जात आहे.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य