शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

दोन हजार गावांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले. या गावांना रेड कार्ड देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजलजन्य आजार : प्रतिबंधासाठी सतर्कता आणि उपाययोजना

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात जलजन्य आजाराचा जिल्ह्यात उद्रेक होण्याचा धोका आहे. तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दोन हजार ४० गावांना सतर्क राहण्याची नोटीस बजावली आहे. पावसाळ््यात प्रामुख्याने पेयजलातून साथरोगाची लागण होते. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. नदी काठावरच्या १८० गावांमध्ये काटेकोर उपाययोजना राबविल्या जात आहे.साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले. या गावांना रेड कार्ड देण्यात आले आहे.जोखीम क्षेत्रात येत असलेल्या ३१ गावांमध्ये साथरोग प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. साथरोगाची स्थिीत उद्भवल्यास आरोग्य विभागाने शिघ्र कृती दल स्थापन केले आहे. प्रथमोपचार कीट तयार आहे. ज्या गावांमध्ये संभाव्य धोका आहे, अशा ठिकाणी दररोज भेटी देऊन तेथील आढावा घेतला जात आहे.नदी काठची १८० गावे संवेदनशीलनदी काठावरील गावांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका संभवतो. पुराचे पाणी नदी पात्रात गेल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याच दाट शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता यावर्षी पाऊस सरासरी ओलांडणार हे निश्चित मानले जात आहे. त्याच दृष्टीकोणातून आरोग्य विभाग उपाययोजना करीत आहे. यवतमाळ तालुक्यात चार, बाभूळगाव १४, कळंब १०, राळेगाव चार, घाटंजी चार, पांढरकवडा नऊ, मारेगाव आठ, झरी जामणी दहा, वणी १५, नेर पाच, दारव्हा १७, आर्णी १५, दिग्रस दोन, पुसद २२, महागाव २७, उमरखेड १३ या गावांचा समावेश आहे. यातही ३१ गावे अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहेत. त्या ठिकाणचा दररोज अहवाल घेतला जात आहे.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य