शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

कुणालाही पाठीशी घालणार नाही

By admin | Updated: July 3, 2016 02:26 IST

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या छेडखानीची घडलेली घटना निंदनीयच असून जनतेचा रोष व त्या अनुषंगाने होणारे आंदोलन सहाजिकच आहे.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : वायपीएसचे प्रकरण, तिसऱ्या दिवशीही रोष
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या छेडखानीची घडलेली घटना निंदनीयच असून जनतेचा रोष व त्या अनुषंगाने होणारे आंदोलन सहाजिकच आहे. परंतु त्याला शांततेचा मार्ग हवा, असे स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही यवतमाळकर जनतेला दिली.
वायपीएसच्या दोन शिक्षकांवर विद्यार्थिनींच्या छेडखानीचा आरोप आहे. या प्रकरणात या शिक्षकांना अटक करण्यात आली. त्यांना संस्थेतून काढूनही टाकण्यात आले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पालक, राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिकांचा रोष शनिवारी तिसऱ्या दिवशीही कायम होता. हे आंदोलक सकाळी दारव्हा नाक्यावर एकत्र आले. तेथून त्यांनी आपला मोर्चा संस्था सचिवांच्या घराकडे वळविला. बराच वेळ हे आंदोलक तेथे होते. त्यांनी घोषणाही दिल्या. काही वेळानंतर यवतमाळचे आमदार मदन येरावार तेथे पोहोचले. त्यांनी लाऊड स्पीकरवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हॉईस रेकॉर्डरवरील संदेश आंदोलक पालकांना ऐकविला. मुख्यमंत्री या संदेशात म्हणाले, छेडखानीचे हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, आवश्यकता भासल्यास चांगल्यात चांगला वकील त्यासाठी नेमला जाईल. सर्व पालकांच्यावतीने एक संयुक्त समिती स्थापन केली जावी, ही समिती चौकशी अधिकाऱ्यांना आपल्या सूचना सादर करतील, या सूचनांची दखल घेतली जाईल, असे ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी आमदार मदन येरावार यांनीही पालकांना शांततेचे आवाहन केले. येरावार म्हणाले, छेडखानीचे हे प्रकरण आपण विधानसभेत मांडू, यातील दोषींवर निश्चित कारवाई होईल, कोणतीही संस्था, पदाधिकाऱ्यांची गय होणार नाही, या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल. पालकांनी तक्रारी कराव्या, त्यांना न्यायालयात जावे लागणार नाही, असे आवाहनही यावेळी येरावार यांनी केले. छेडखानीच्या या प्रकरणामुळे सर्वच पालकांच्या मनामध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षिततेविषयी भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अन्य शाळांमध्येही असा प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी प्रकरणे रोखण्यासाठी सखोल चौकशी करून ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही मदन येरावार यांनी दिली. शनिवारी आंदोलकांनी प्रवासी निवारे, आॅटोरिक्षा स्टँडवर दगडफेक करून तोडफोड केली. शनिवारी सकाळी प्राचार्य जेकब दास यांना अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
सायंकाळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या उपस्थितीत पालकांची बैठक झाली. या बैठकीत पालकांनी आपल्या विविध मागण्या ठेवल्या. त्याच्या अंमलबजावणीची ग्वाही मान्यवरांनी दिली. यावेळी उपरोक्त मान्यवरांनी पालक, नागरिक व राजकीय नेते-पदाधिकाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. (शहर वार्ताहर)