कोरोनाच राहिला नाही, मास्क कशाला वापरायचा? कारवाईची भीतीही संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST2021-11-22T05:00:00+5:302021-11-22T05:00:35+5:30

गावापासून शहरापर्यंत, वाड्यापासून वस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी मास्कचा वापरच होत नाही. आता कोरोना संपला आहे. याच आविर्भावात सर्व मंडळी पाहायला मिळत आहे. दवाखान्यामध्ये जाताना मास्कचा वापर काही लोक करीत आहेत, तर काही जाणकार मंडळी मास्क वापरून वावरताना पाहायला मिळत आहे. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला तर चिंता वाढणार आहे.

No corona left, why use a mask? The fear of action also disappeared | कोरोनाच राहिला नाही, मास्क कशाला वापरायचा? कारवाईची भीतीही संपली

कोरोनाच राहिला नाही, मास्क कशाला वापरायचा? कारवाईची भीतीही संपली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लाॅकडाऊन खुले करण्यात आले. लाॅकडाऊन खुले झाल्यानंतर संपूर्ण व्यवहार पूर्ववत होत आहे. याच सुमारास तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापरच सोडून दिला आहे. ‘लोकमत’ने शहरातील बहुतांश भागांचे सर्वेक्षण केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.
गावापासून शहरापर्यंत, वाड्यापासून वस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी मास्कचा वापरच होत नाही. आता कोरोना संपला आहे. याच आविर्भावात सर्व मंडळी पाहायला मिळत आहे. दवाखान्यामध्ये जाताना मास्कचा वापर काही लोक करीत आहेत, तर काही जाणकार मंडळी मास्क वापरून वावरताना पाहायला मिळत आहे. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला तर चिंता वाढणार आहे.

कोरोनाची लाट ओसरली, अन् कारवाईही संपली
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला घाबरून मास्क वापरणे सुरू केले होते. यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आता कोरोनाची लाट ओसरली आहे. 
दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नगर परिषद, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी कारवाई करणे टाळले आहे. विनाकारणच रोष नको म्हणून कारवाई थंड बस्त्यात आहे.

मास्क ना रस्त्यावर, ना बाजारात

आज बाजाराचा दिवस होता. खेड्यापासून शहरातील मंडळीही भाजी खरेदीसाठी आली होती. मात्र, या ठिकाणी बोटावर मोजता येईल इतक्याच व्यक्तीच्या तोंडाला मास्क होता.

 दत्त चाैक 

शहरातील सर्वाधिक गजबजलेला चाैक म्हणून दत्त चाैक ओळखला जातो. याठिकाणी प्रत्येकजण येतो. मात्र, विक्रेत्यांपासून खरेदीदारापर्यंत अनेकांच्या तोंडावर मास्क दिसतच नाही.

 आर्णी नाका 

नव्याने गजबजलेली बाजारपेठ या मार्गावर पाहायला मिळते. मोठमोठी दुकाने आणि हाॅटेल्स याच मार्गावर आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी बहुतांश नागरिक विनामास्क वावरताना पाहायला मिळतात.

मास्क न वापरण्याची ही काय कारणे झाली?

प्रशासनाकडून मास्क नसणाऱ्या नागरिकांवर कारवाईच होत नाही. मग, आपण मास्क वापरायचे कशाला? या कारणाने अनेकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. यातून धोका वाढला आहे.
- जीवन बोरकर

आपण लस घेतली, अनेकांनी लस घेतली. आता कोरोनाची काळजीच नाही. नागरिकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. शहर आणि खेड्यात सारखी स्थिती आहे.
- अंगद पोपटकर

मास्क वापरला तर पार्लरची केलेली तयारी दिसत नाही. याशिवाय चांगले कपडे परिधान केल्यावर मॅचिंग मास्कही नसतो. यामुळे बहुतांश मुली, महिला मास्क वापरणे टाळत आहे.
- प्रियंका बिडकर

 

Web Title: No corona left, why use a mask? The fear of action also disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.