शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार शेतकरी मुक्कामी

By admin | Updated: April 26, 2017 00:14 IST

तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुमारे नऊ हजार शेतकरी मुक्कामी आहेत.

तूर विक्रीची प्रतीक्षा : बाजार समित्यांमध्ये सोयीसुविधांचा अभाव रूपेश उत्तरवार यवतमाळ तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुमारे नऊ हजार शेतकरी मुक्कामी आहेत. मोजमाप होईल या आशेने ते रात्र जागून काढत आहेत. मात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या शेतकऱ्यांसाठी साध्या पायाभूत सुविधांचाही अभाव आहे. बाजार समित्यांना प्रती क्विंटल एक रुपया सेस (शुल्क) दिला जातो. यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी विश्रामगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, शेतमालाची सुरक्षा, उपहारगृह, अत्यल्प दरात भोजन, गावापासून बैलगाड्यांनी शेतमाल घेवून येणाऱ्या जनावरांसाठी चारापाणी आदी व्यवस्था बंधनकारक आहे. परंतु दुर्दैवाने या सोयीसुविधांचा अभाव आहे. शेतकऱ्यांना शुद्ध तर दूर साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही. प्रमुख बाजार समितीतच हे चित्र आहे, तर अन्य बाजार समित्यांमध्ये काय अवस्था असेल, याची यावरून कल्पना येते. शेतकऱ्यांमधून ओरड झाल्यानंतर यवतमाळ बाजार समितीने आता दोन दिवसांपासून पाणी व मसालेभाताची व्यवस्था केली आहे. बाजार समित्यांमध्ये सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात तुरीच्या गंजीवरच रात्र काढावी लागत आहे. त्याच्या खाण्यापिण्याचेही वांदे सुरू आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळ व प्रशासनाविरूद्ध शेतकरी वर्गात रोष पाहायला मिळतो आहे. बाजार समिती एक रुपया सेस घेते कशासाठी, असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारत आहेत. मुक्कामी असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे आपल्या समस्यांना वाट मोकळी करून दिली. मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना उघड्यावर शौचास गेले म्हणून दंड भरावा लागतो. यवतमाळ केंद्रावर २०० शेतकरी मुक्कामी आहेत. दिग्रसमध्ये २५० शेतकरी, उमरखेडमध्ये १५०, पुसदमध्ये ५८८, बाभूळगावत ५०, कळंबमध्ये ६६, पांढरकवड्यात ६००, दारव्हा येथे ८००, घाटंजीत ३००, मुकुटबनमध्ये १०० शेतकरी मुक्कामी आहेत. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.