शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नऊ हजार शेतकरी मुक्कामी

By admin | Updated: April 26, 2017 00:14 IST

तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुमारे नऊ हजार शेतकरी मुक्कामी आहेत.

तूर विक्रीची प्रतीक्षा : बाजार समित्यांमध्ये सोयीसुविधांचा अभाव रूपेश उत्तरवार यवतमाळ तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुमारे नऊ हजार शेतकरी मुक्कामी आहेत. मोजमाप होईल या आशेने ते रात्र जागून काढत आहेत. मात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या शेतकऱ्यांसाठी साध्या पायाभूत सुविधांचाही अभाव आहे. बाजार समित्यांना प्रती क्विंटल एक रुपया सेस (शुल्क) दिला जातो. यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी विश्रामगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, शेतमालाची सुरक्षा, उपहारगृह, अत्यल्प दरात भोजन, गावापासून बैलगाड्यांनी शेतमाल घेवून येणाऱ्या जनावरांसाठी चारापाणी आदी व्यवस्था बंधनकारक आहे. परंतु दुर्दैवाने या सोयीसुविधांचा अभाव आहे. शेतकऱ्यांना शुद्ध तर दूर साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही. प्रमुख बाजार समितीतच हे चित्र आहे, तर अन्य बाजार समित्यांमध्ये काय अवस्था असेल, याची यावरून कल्पना येते. शेतकऱ्यांमधून ओरड झाल्यानंतर यवतमाळ बाजार समितीने आता दोन दिवसांपासून पाणी व मसालेभाताची व्यवस्था केली आहे. बाजार समित्यांमध्ये सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात तुरीच्या गंजीवरच रात्र काढावी लागत आहे. त्याच्या खाण्यापिण्याचेही वांदे सुरू आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळ व प्रशासनाविरूद्ध शेतकरी वर्गात रोष पाहायला मिळतो आहे. बाजार समिती एक रुपया सेस घेते कशासाठी, असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारत आहेत. मुक्कामी असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे आपल्या समस्यांना वाट मोकळी करून दिली. मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना उघड्यावर शौचास गेले म्हणून दंड भरावा लागतो. यवतमाळ केंद्रावर २०० शेतकरी मुक्कामी आहेत. दिग्रसमध्ये २५० शेतकरी, उमरखेडमध्ये १५०, पुसदमध्ये ५८८, बाभूळगावत ५०, कळंबमध्ये ६६, पांढरकवड्यात ६००, दारव्हा येथे ८००, घाटंजीत ३००, मुकुटबनमध्ये १०० शेतकरी मुक्कामी आहेत. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.