शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नेर बायपासचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 21:46 IST

अनेक वर्षांपासून नेर ग्रामस्थांचा बायपाससाठी संघर्ष सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या बायपासचे काम सुरू होणार, अशा वावड्या उठविण्यात आल्या. काम सुरू झाल्याचा देखावाही निर्माण झाला. प्रत्यक्ष मात्र बायपासकरिता लागणारी जमीन संपादनाची प्रक्रियाच अर्धवट आहे.

ठळक मुद्देयंत्रणेकडून केवळ देखावा : भूसंपादनात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : अनेक वर्षांपासून नेर ग्रामस्थांचा बायपाससाठी संघर्ष सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या बायपासचे काम सुरू होणार, अशा वावड्या उठविण्यात आल्या. काम सुरू झाल्याचा देखावाही निर्माण झाला. प्रत्यक्ष मात्र बायपासकरिता लागणारी जमीन संपादनाची प्रक्रियाच अर्धवट आहे. यामुळे नेर बायपासचे काम पुन्हा रखडले आहे.प्रशासकीय मान्यता होऊन पाच वर्षे लोटली. त्यानंतरही बायपासच्या भूसंपादन व रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. या बायपासला वनविभागानेही परवानगी दिली नाही. शिवाय नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून हा बायपास जात आहे. त्या शेतकऱ्यांनीही राजीनामा दिलेला नाही. बायपाससाठी लागणाºया जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्यास्तरावरही याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा बायपासचे काम रखडणार काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या सर्वेत बदल करण्याचा प्रस्ताव आहे. शासनाने गेल्या पाच वर्षात हे काम संथ गतीने केले. बायपासच्या मुद्यावर राजकीय नेत्यांनी प्रत्येकवेळी आपली पोळी शेकली आहे. रस्त्याचे काम रखडल्याने लाखो रुपयांचा भुर्दंड शासनावरच बसत आहे. गरज नसताना बायपाससाठी अनेक ठिकाणी जागांची खरेदी करण्यात आली आहे. अमरावती-यवतमाळ या राज्य मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नेर शहरातूनच हा मार्ग जात असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत राहते. येथील अपघातात अनेकांचे बळी गेले आहे. बायपाससाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन, मोर्चे काढले. निवेदने दिली. तरीही या बायपासच्या कामाबाबत यंत्रणा गंभीर दिसत नाही.बायपाससाठी नऊ शेतकरी जागा देण्यास तयार नाही. भूसंपादनाच्या मंजूरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ज्या जागा खरेदी झाल्या आहे त्यांचा ताबा घेण्यासाठी काम सुरू आहे.- भूपेश कथलकर,बांधकाम अभियंता, नेर

टॅग्स :highwayमहामार्ग