शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

अहाहा नेहा ! नीटमध्ये मिळविले ७२० पैकी ७२० गुण

By अविनाश साबापुरे | Updated: June 5, 2024 16:42 IST

ऑल इंडिया फस्ट रॅंक : खेड्यातल्या शिक्षकाची कन्या होणार डाॅक्टर

यवतमाळ : लोकसभेच्या एकेका फेरीचा निकाल हाती येत असतानाच मंगळवारी नीट परीक्षेचाही निकाल जाहीर झाला. अपार मेहनतीनंतरच यश देणाऱ्या या परीक्षेत एका साध्यासुध्या मुलीने चक्क ७२० पैकी ७२० गुण मिळवून संपूर्ण भारतात पहिली रॅंक पटकावली आहे. नेहा कुलदीप माने असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती बोरी या अगदीच छोट्याशा खेड्यातली रहिवासी आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) देशभरात ५ मे रोजी घेण्यात आली होती. देशासह परदेशातील २३ लाख ३३ हजार २९७ जणांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख १६ हजार २६८ विद्यार्थी नीटमध्ये उत्तीर्ण झालेत. मंगळवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटचा निकाल जाहीर केला. त्यात नेहा कुलदीप माने या विद्यार्थिनीने पैकीच्या पैकी गुण मिळविले. 

नेहा ही उमरखेड तालुक्यातील बोरी या गावची रहिवासी आहे. तिचे वडील कुलदीप माने हे बाजूच्याच चातारी गावातील शिवाजी विद्यालयात शिक्षक आहेत. तर आई उर्मिला गृहिणी आहेत. नेहाच्या यशाने माने कुटुंबीय आनंदाने गदगदून गेले आहे. 

मोबाईल म्हणजे कामापुरता मामा ! गेल्या तीन वर्षांपासून नेहा नीटची झपाटून तयारी करीत होती. या काळात तिने टीव्ही पाहिलाच नाही. तर मोबाईलसाठी सकाळी १५ मिनिटे आणि सायंकाळी १५ मिनिटे एवढाच वेळ दिला. ‘मोबाईल म्हणजे कामापुरता मामा म्हणून वापरावा’ असे नेहा सांगते. नेहाची छोटी बहीण निधी सहाव्या वर्गात आहे. पण आपल्या ताईच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून तिनेही टीव्हीचा मोह सोडला अन् कादंबरी वाचनाचा छंद धरला.

समर्पित भावनेने केला अभ्यासनीटची तयारी करताना नेहाने अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींना अजिबात स्थान दिले नाही. नीटमध्ये १०० टक्के गुण मिळविण्याचे तुझे तंत्र कोणते, असे विचारले असता नेहा म्हणते, ‘‘आपले बेसिक क्लिअर असले पाहिजे. मग पुढला अभ्यास कठीण जात नाही. रोजचा अभ्यास रोज आटोपलाच पाहिजे. आजच्या अभ्यासाला १५ तास हवे असतील तर १५ तास अभ्यास करावा. एखाद्या दिवशी आपला अभ्यास तीन तासात आटोपणारा असेल तर तीनच तास द्यावे. 

नेहाने आपल्या स्टडी टेबलवर लिहून ठेवले होते, ‘मला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचेच आहेत.’ हा तिचा आत्मविश्वास तिने स्वत:च्या मेहनतीने सार्थ ठरविला. दिल्लीच्या एम्समध्ये ॲडमिशन हे तिचे ध्येय होते. तेही आता पूर्ण होईलच.- कुलदीप माने, वडील

मुलांच्या मनावरील प्रेशर कमी करण्यात पालकांचाच मोठा वाटा असतो. माझे आई-बाबा माझ्याशी फार कनेक्ट आहेत. नीटच्या पेपरला जाताना मलाही थोडे टेन्शन जाणवलेच. तेव्हा बाबांनी माझा हात धरून सांगितले होते, ‘ही काही जीवनातली शेवटची परीक्षा नाही. तुला कमी गुण मिळाले तरी आम्ही तुझ्या सोबतच आहोत.’ त्यांच्या या शब्दांमुळेच मला जे शेवटचे दोन प्रश्न कठीण वाटले, तेही रिलॅक्स होऊन सोडवता आले.- नेहा कुलदीप माने

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालYavatmalयवतमाळStudentविद्यार्थीdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र