शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वणीत धान्यासाठी गरजूंची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा लाभही मोलमजुरी करणाऱ्यांना मिळाला.

ठळक मुद्देपुरवठा विभागापुढे ठिय्या : सोशल डिस्टसिंगचा फज्जा, वाढणारी गर्दी चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एकीकडे दानदात्यांकडून वणी शहरातील गरजवंतांना धान्याचे वाटप केले जात आहे. परंतु तरीही दररोज वणीच्या तहसीलसमोर अनेकजण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. दानदाते व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा लाभही मोलमजुरी करणाऱ्यांना मिळाला. परंतु तरीही तहसीलपुढे होणारी गर्दी सर्वांची चिंता वाढविणारी ठरत आहे. गुरूवारी वणी तहसील परिसरातील पुरवठा विभागासमोर अनेक महिला व पुरूष एकत्रितरित्या ठिय्या देऊन बसून असल्याचे चित्र पहायला मिळाले. विचारणा केली असता, राशन कार्ड अपडेट करण्यासाठी आम्ही आलो असल्याचे त्यातील काहींनी सांगितले, तर काहीजणांनी आम्ही धान्यासाठी आल्याची माहिती दिली.केवळ तहसील कार्यालयच नाही, तर शहरातील अनेक नेत्यांच्या घरापुढेही दररोज काही महिला व पुरूष आम्हाला धान्य मिळत नाही, अशा तक्रारी करित गर्दी करत असल्याचे चित्रदेखील पहायला मिळत आहे. यात मदत मागणाºयांची संख्या मोठी असल्याने नेत्यांचा वैतागही वाढत आहे. मदत करायची तरी किती, असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे. लॉकडाऊननंतर सुरूवातीच्या काळात मदतीचा ओघ प्रचंड होता. दानदात्यांनी तसेच काही सामाजिक संस्थांनी ज्या भागात मोलमजुरी करणारे लोक वास्तव्याला आहे, त्या भागात जाऊन एका कुटुंबाला १५ दिवस किंवा त्यापेक्षाही अधिक काळ धान्य पुरेल, अशा किटचे वितरण केले होते. त्यानंतर मात्र मदतीचा ओघ कमी झाला आहे. परिणामी रोजमजुरी करणाºयांपुढील समस्या वाढल्या आहेत. 

टॅग्स :Socialसामाजिक