शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जवाब दो’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:26 IST

राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे.

ठळक मुद्देआर्णीतून प्रारंभ : येड्या-गबाळ्या सरकारला विचारणार जाब

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे. आर्णीतून २९ आॅक्टोबरला पदयात्रेची सुरूवाइ होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी शनिवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी विविध घोषणा दिल्या. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, नोकरदार, बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र त्यांची पूर्तता केली नाही, असा आरोप आमदार बेग यांनी केला. या सर्व आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी पक्षातर्फे सोमवारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘जवाब दो’ पदयात्रेचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून ‘येड्या-गबाळ्यां’च्या सरकारला जवाब विचारणार असून शेतमालाला देण्यात येणाऱ्या हमी दराचे काय झाले, शेतकºयांच्या संपूर्ण कर्ज माफीच्या भिजत घोंगड्याचे काय झाले, दरवर्षी दोन कोटी युवकांच्या नोकरीचे काय झाले, शेतमालाची नाफेड खरेदी कधी सुरू करणार, शेत मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीड पट भाव कधी देणार, पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेलची दरवाढ कधी थांबणार, शेतीला २४ तास वीज कधी मिळणार, सव्वा कोटी घरकूल सव्वा लाख विहिरी शेतकºयांना कधी मिळेल, आदी प्रश्न सरकारला विचाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच प्रत्येकांच्या खात्यात १५ लाख कधी टाकणार, बोंडअळीची मदत दिवाळीपर्यंत देणार का, जीएसटीमधील जाचक अटी रद्द करणार का, पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून कधी सुरू करणार, शेतकरी, मजूर, कामगारांना ५८ वर्षांनंतर निवृत्ती वेतन देण्याचे काय झाले, मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले, महात्मा फुले आरोग्य सेवेचा लाभ शेतकºयांना कधी मिळणार, महिला सुरक्षेचे काय, नोटबंदीमुळे देश रांगेत उभा केला त्याचे काय, यवतमाळचे कृषी महाविद्यालय इतरत्र का पळविले, आदी प्रश्नांची उत्तरे सरकरला मागणार असल्याचे आमदार ख्वाजा बेग यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष रवी नालमवार, शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार, नपतील गटनेते चिराग शहा, संदीप बुटले, सुनील पोटगंदलावार, यासिन नागानी, संजय व्यवहारे, जाफर शेख, सुनील राठोड, परवेज शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Khwaja Baigख्वाजा बेगNCPराष्ट्रवादी काँग्रेस