शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जवाब दो’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:26 IST

राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे.

ठळक मुद्देआर्णीतून प्रारंभ : येड्या-गबाळ्या सरकारला विचारणार जाब

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे. आर्णीतून २९ आॅक्टोबरला पदयात्रेची सुरूवाइ होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी शनिवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी विविध घोषणा दिल्या. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, नोकरदार, बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र त्यांची पूर्तता केली नाही, असा आरोप आमदार बेग यांनी केला. या सर्व आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी पक्षातर्फे सोमवारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘जवाब दो’ पदयात्रेचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून ‘येड्या-गबाळ्यां’च्या सरकारला जवाब विचारणार असून शेतमालाला देण्यात येणाऱ्या हमी दराचे काय झाले, शेतकºयांच्या संपूर्ण कर्ज माफीच्या भिजत घोंगड्याचे काय झाले, दरवर्षी दोन कोटी युवकांच्या नोकरीचे काय झाले, शेतमालाची नाफेड खरेदी कधी सुरू करणार, शेत मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीड पट भाव कधी देणार, पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेलची दरवाढ कधी थांबणार, शेतीला २४ तास वीज कधी मिळणार, सव्वा कोटी घरकूल सव्वा लाख विहिरी शेतकºयांना कधी मिळेल, आदी प्रश्न सरकारला विचाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच प्रत्येकांच्या खात्यात १५ लाख कधी टाकणार, बोंडअळीची मदत दिवाळीपर्यंत देणार का, जीएसटीमधील जाचक अटी रद्द करणार का, पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून कधी सुरू करणार, शेतकरी, मजूर, कामगारांना ५८ वर्षांनंतर निवृत्ती वेतन देण्याचे काय झाले, मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले, महात्मा फुले आरोग्य सेवेचा लाभ शेतकºयांना कधी मिळणार, महिला सुरक्षेचे काय, नोटबंदीमुळे देश रांगेत उभा केला त्याचे काय, यवतमाळचे कृषी महाविद्यालय इतरत्र का पळविले, आदी प्रश्नांची उत्तरे सरकरला मागणार असल्याचे आमदार ख्वाजा बेग यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष रवी नालमवार, शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार, नपतील गटनेते चिराग शहा, संदीप बुटले, सुनील पोटगंदलावार, यासिन नागानी, संजय व्यवहारे, जाफर शेख, सुनील राठोड, परवेज शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Khwaja Baigख्वाजा बेगNCPराष्ट्रवादी काँग्रेस