शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जवाब दो’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:26 IST

राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे.

ठळक मुद्देआर्णीतून प्रारंभ : येड्या-गबाळ्या सरकारला विचारणार जाब

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे. आर्णीतून २९ आॅक्टोबरला पदयात्रेची सुरूवाइ होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी शनिवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी विविध घोषणा दिल्या. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, नोकरदार, बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र त्यांची पूर्तता केली नाही, असा आरोप आमदार बेग यांनी केला. या सर्व आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी पक्षातर्फे सोमवारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘जवाब दो’ पदयात्रेचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून ‘येड्या-गबाळ्यां’च्या सरकारला जवाब विचारणार असून शेतमालाला देण्यात येणाऱ्या हमी दराचे काय झाले, शेतकºयांच्या संपूर्ण कर्ज माफीच्या भिजत घोंगड्याचे काय झाले, दरवर्षी दोन कोटी युवकांच्या नोकरीचे काय झाले, शेतमालाची नाफेड खरेदी कधी सुरू करणार, शेत मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीड पट भाव कधी देणार, पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेलची दरवाढ कधी थांबणार, शेतीला २४ तास वीज कधी मिळणार, सव्वा कोटी घरकूल सव्वा लाख विहिरी शेतकºयांना कधी मिळेल, आदी प्रश्न सरकारला विचाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच प्रत्येकांच्या खात्यात १५ लाख कधी टाकणार, बोंडअळीची मदत दिवाळीपर्यंत देणार का, जीएसटीमधील जाचक अटी रद्द करणार का, पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून कधी सुरू करणार, शेतकरी, मजूर, कामगारांना ५८ वर्षांनंतर निवृत्ती वेतन देण्याचे काय झाले, मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले, महात्मा फुले आरोग्य सेवेचा लाभ शेतकºयांना कधी मिळणार, महिला सुरक्षेचे काय, नोटबंदीमुळे देश रांगेत उभा केला त्याचे काय, यवतमाळचे कृषी महाविद्यालय इतरत्र का पळविले, आदी प्रश्नांची उत्तरे सरकरला मागणार असल्याचे आमदार ख्वाजा बेग यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष रवी नालमवार, शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार, नपतील गटनेते चिराग शहा, संदीप बुटले, सुनील पोटगंदलावार, यासिन नागानी, संजय व्यवहारे, जाफर शेख, सुनील राठोड, परवेज शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Khwaja Baigख्वाजा बेगNCPराष्ट्रवादी काँग्रेस