शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

कृषिपंपधारकांना तब्बल 15 वर्षांपासून बिलच नाही महावितरणचा कारभार; दुष्काळातही वीज तोडणी कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 07:35 IST

शेतकऱ्यांचे ऐन रबी हंगामात सिंचन वांध्यात आल्याने तीव्र रोष आहे. शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेतून विद्युत देयकांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या निदर्शनास आले.

यवतमाळ/नागपूर : विद्युत ग्राहकांकडील ७१ हजार कोटींच्या देयक वसुलीसाठी महावितरणने थेट वीजपुरवठा तोडण्याचा सपाटा सुरू केला असताना, राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सुमारे १५ वर्षांपासून कृषिपंपाचे वीज बिलच दिले गेले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (MSEDCL has no bill for agricultural pump holders for over 15 years; How to cut off electricity even in drought?)त्यामुळे हजारो कोटींच्या थकबाकीची एकत्रित वसुली होणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांची खरीप पिकांची आणेवारी ४७ पैशांच्या आत असताना महावितरणला कोणत्या नियमात वीज खंडित करत आहे, असा रोकडा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.महावितरणच्या देयके थकबाकीचा आकडा ७१ हजार ५०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यातील कृषिपंपांची थकबाकी ४५ हजार ७५० कोटींची आहे. थकबाकीदार वीज कपात मोहिमेला दिलेली स्थगिती अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अचानक उठविण्यात आली. त्यामुळे राज्यभर आता घरगुती, व्यावसायिक, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपाची वीज कापण्याचा सपाटा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांचे ऐन रबी हंगामात सिंचन वांध्यात आल्याने तीव्र रोष आहे. शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेतून विद्युत देयकांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या निदर्शनास आले.

कृषिपंपाचे बिलच पाहिले नाहीमाझ्या शेतात पाच कनेक्शन आहेत. गेल्या सात-आठ वर्षात मी कृषिपंपाचे विद्युत देयक पाहिले नाही. मध्यंतरी दुष्काळ असल्याने कृषिपंप चालू नव्हते. जिल्ह्याची आणेवारी ४७ पैसे असल्याने महावितरणला शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करता येत नाही.- मनीष जाधव, शेतकरी, वागद (ता. महागाव, जि. यवतमाळ)

कित्येक वर्षांपासून महावितरणने कृषिपंपाचे देयक दिले नाहीत. आता अचानक हजारो रुपयांचे देयक देऊन ते भरण्याची सक्ती केली जात आहे. मिटणापुरात तर एकच कनेक्शन असलेल्या शेतकऱ्याला चक्क दोन देयके (९० हजार व १५ हजार) पाठविण्याचा चमत्कार महावितरणने केला. - करीम मिर्झा, मिटणापूर, (ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ)

नियमित देयके देणे बंधनकारककृषिपंपाला विद्युत जोडणी देताना ‘मीटर’ आणि ‘नॉन मीटर’ अशी वर्गवारी केली जाते. मीटरला रीडिंगनुसार, तर नॉन मीटरला मोटारपंपाच्या अश्वशक्तीनुसार (एचपी) देयक आकारले जाते. शहरी भागात हे विद्युत देयक दरमहा, तर ग्रामीण भागात तीन महिन्यांतून एकदा देणे बंधनकारक आहे. रीडिंग घेऊन देयक देण्याचा नियम असला तरी बहुतांश देयके अंदाजे आकारली जातात.

व्याज व दंडाचीच रक्कम अधिकnबहुतांश शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाल्यापासून देयकेच दिली गेली नाहीत. काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन देयके काढली असता, त्यातील आकडे डोळे विस्फारणारे आहेत. nविद्युत देयक लाखाच्या जवळपास पोहोचले असून, त्यात वीज वापराची रक्कम कमी आणि व्याज व दंडाचीच रक्कम अधिक आहे. 

हे महावितरणच्या यंत्रणेचे अपयशशेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना वीज बिल देण्याची जबाबदारी लाइनमनची आहे. या कामासाठी आता अनेक आऊटसोर्सिंग संस्थांची मदत घेतली जाते. सर्व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असतानाही दूरवर व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांपर्यंत वीज बिल पोहोचत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

दर तीन महिन्यांनी कृषिपंपाची देयके नियमित पाठविली जातात. स्थानिक यंत्रणेकडे हे काम सोपविले आहे. ते नित्यनियमाने सुरू असून त्यात कोणताही खंड पडला नाही. - संजय खंगार, प्रशासन अधिकारी, महावितरण, यवतमाळ मुख्यालय. 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण