शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

हृदयद्रावक! कर्जाचा डोंगर चढत गेला अन् आई-बाबांचे अवसानच गळाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:37 IST

आई-वडिलांच्या आत्महत्येनंतर मुलावर कुटुंबाची जबाबदारी, म्हणाला ‘नापिकीच्या चक्राने सर्वस्व हिरावलं’

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : साहेब, १ लाख १० हजार रुपये मक्त्याने शेती घेतली होती. शेतात दिवसरात्र घाम गाळला. हे पीक गेल्यानंतर दुसरे हाताला लागेल, अशी भाबडी आशा होती. मात्र, नापिकीचे चक्र सुरूच राहिले. बहिणीचे लग्न, नंतर तिचे सिझर, पुन्हा आलेले आजारपण यातून वाट काढत असताना, सोयाबीन अन् कापसाने दगा दिला. त्यातून बाहेर पडण्यासाठी हरभरा पेरला, तर रानडुकरांनी रातोरात तोही फस्त केला, अशा परिस्थितीत पुढे काय? घेतलेले कर्ज कशाने फेडायचे, अशा विवंचनेत आई-बाबा होते. 

या नापिकीच्या चक्रानेच त्यांचा बळी घेतल्याचा टाहो मुलगा निखिल याने फोडला. दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे रविवारी किशोर बाळकृष्ण नाटकर (४५) आणि वनिता किशोर नाटकर (४०) या दाम्पत्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. 

आई-वडिलांसोबत शेतात राबणारा २३ वर्षीय मधला मुलगा निखिलने सोमवारी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्याच्या बाजूलाच मोठी बहीण निकिता (२४), लहान बहीण शारदा (१८), आजोबा बाळकृष्ण (७३) आणि आजी विमलाबाई (७०) शून्यात नजर लावून बसले होते.  

आधीच कर्ज, त्यात आजारपण...   - कुटुंबामध्ये वडील सगळ्यात मोठे होते. घरची सहा एकर कोरडवाहू शेती आणि तिला जोड म्हणून गावातीलच दहा एकर ओलिताची शेती मक्त्याने घेतली होती. - निकिताच्या लग्नासाठी दोन लाखांचे कर्ज घेतले. तिचे सिझर झाल्याने पुन्हा पैसे मोजावे लागले. आई-वडिलांनी तिच्या उपचारासाठी दीड लाखावर खर्च केला. - कापूस, सोयाबीन पिकल्यानंतर कर्जफेड होईल, अशी आशा वाटत होती. मात्र, पीक हाती आले नाही. रब्बीत दोन एकरांवर हरभरा घेतला, तर रानडुकरांनीच तो फस्त केला. यात पुन्हा कृषी केंद्राची दीड लाखाची उधारी चढली. यातून आम्ही सगळेच हवालदिल झालो होतो, अशी व्यथा निखिलने मांडली.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी