शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुरातून मुलींना वाचविताना आईचा मृत्यू, यवतमाळातील वाघाडीची दुर्दैवी घटना

By सुरेंद्र राऊत | Updated: July 22, 2023 16:02 IST

घर अंगावर कोसळले : ५० घर जमीनदोस्त

यवतमाळ : शहरात शुक्रवारी रात्री ११ वाजेपासून ढगफुटी झाली. काही तासांतच शहरातील रस्त्यावरून पाणी वाहू लागले. यामुळे शहरालगत असलेल्या वाघाडी नदीला पूर आला. या नदीचे पाणी वाघाडी येथील वस्तीत शिरले. रात्रीच्या अंधारात अचानक आलेल्या पुरामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली. घरात पुराचे पाणी येत असताना दोन चिमुकल्या मुलींना घराबाहेर काढल्यानंतर आईच्या अंगावर पत्र्याचे घर कोसळले. पाण्याची पातळी वाढल्याने महिलेला बाहेर पडता आले नाही, यात तिचा मृत्यू झाला. पुरामुळे अनेकजण वाहून गेली, ५० घरे जमीनदोस्त झाली.

शालू रवींद्र कांबळे (३५, रा. वाघाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. वाघाडी नदीला पूर आल्याने काठावरच्या वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहामुळे परिसरातील ५० घरे जमीनदोस्त झाली. अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला. रात्रीच्या अंधारात जीव वाचविण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. काहींनी झाडावर, पक्क्या छतावर आसरा घेतला. दरम्यान, शालू कांबळे व तिचा पती रवींद्र दोन मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. पाण्यातच शालूने मुलींना घराबाहेर काढून पतीला सुरक्षितस्थळी हलविण्यास सांगितले. पती मुलींना घेऊन बाहेर पडला, त्याच्या मागे शालू बाहेर येत असतानाच संपूर्ण घर तिच्या अंगावर कोसळले. यात तिचा मृत्यू झाला.

वाघाडीमध्ये पूर आल्याची माहिती मिळताच बचाव पथक, अवधूतवाडी पोलिस, नगर परिषदेची यंत्रणा, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी घटनस्थळी पोहोचले व तत्काळ बचाव कार्य सुरू केले. १५० वर नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना रेल्वेच्या निर्माणाधीन वसाहतीमध्ये आश्रय दिला. त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मोलमजुरी करणाऱ्यांची घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली. यवतमाळ शहरतील अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने माेठे नुकसान झाले. व्यापारी संकुलातील तळमजल्यावर असलेल्या दुकानांतही पाणी साचल्याने लाखोंचे नुकसान झाले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरDeathमृत्यूYavatmalयवतमाळ