शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

मातेसह दोन चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार, पतीसह सासू-सासरे यांना अटक

By रवींद्र चांदेकर | Updated: August 16, 2023 19:20 IST

रेश्मा, श्रावणी आणि सार्थकच्या मृतदेहांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे अंतःकरण भरून आले.

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेतील माता व चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या मृतदेहाशेजारी दोन्ही चिमुकल्यांचे पार्थिव ठेवून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या दुर्दैवी प्रसंगाने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. निंगनूर व आजूबाजूची अनेक गावेही या काळीज पिळविटणाऱ्या प्रसंगाने शोकमग्न झाली.

रेश्मा नितीन मुडे (२६), श्रावणी (६) आणि सार्थक (३) अशी त्या तीन मायलेकांची नावे आहेत. नितीन मुडे व रेश्मा मुडे यांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. नितीनला दारूचे व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे आर्थिक टंचाईत वाढ होत गेली. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर श्रावणी व सार्थक अशी फुले उमलली. दारूच्या व्यसनामुळे नितीनला ऑटोरिक्षा विकावी लागली. त्यामुळे तो रेश्माला माहेरवरून पैसे आणण्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होता, अशी माहिती रेश्माच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली. सततच्या जाचामुळे आयुष्याला कंटाळलेल्या रेश्माने आपली दोन्ही चिमुकले श्रावणी आणि सार्थक यांच्यासह आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. स्वतः विषाचा घोट घेत तिने दोन्ही निरागस लेकरांना विष पाजले.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसाआधी सोमवारी निंगनूर येथे ही घटना घडली होती. या घटनेत रेश्मासह दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. देशभर स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असताना हे आक्रीत घडले होते. या प्रसंगाने परिसरावर शोककळा पसरली. आईने पोटच्या गोळ्यांना घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे समाजमन सुन्न झाले. बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून तिन्ही मृतदेह निंगनूर येथे आणण्यात आले. त्यावेळी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता.

रेश्माच्या माहेरची मंडळी आणि आप्तेष्टांनी हंबरडा फोडला. तिघांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सासरच्यांना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. त्यानंतर रेश्माचा पती नितीन मुडे, सासरे किसन हेमला मुडे आणि सासू निर्गुणा मुडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध हुंडा बळी आणि छळ केल्याप्रकरणी भादंवि ४९८ अ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३०६ आणि ३४ कलमानुसार गुन्हा नोंद केला. त्यानंतर एकाच चितेवर तिन्ही मायलेकरांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जड अंतःकरणाने शेवटचा निरोप

रेश्मा, श्रावणी आणि सार्थकच्या मृतदेहांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे अंतःकरण भरून आले. मान्यवरांसह हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. निंगनूर येथे बुधवारी एकही चूल पेटली नाही. संपूर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येकजण दुःख व्यक्त करत होते. आबालवृद्धांच्या हुंदक्यांनी संपूर्ण परिसर गहिवरून गेला होता. सर्वच जण हळहळ व्यक्त करीत होते.

टॅग्स :YavatmalयवतमाळDomestic Violenceघरगुती हिंसाWomenमहिलाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी