शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मातेसह दोन चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार, पतीसह सासू-सासरे यांना अटक

By रवींद्र चांदेकर | Updated: August 16, 2023 19:20 IST

रेश्मा, श्रावणी आणि सार्थकच्या मृतदेहांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे अंतःकरण भरून आले.

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेतील माता व चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या मृतदेहाशेजारी दोन्ही चिमुकल्यांचे पार्थिव ठेवून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या दुर्दैवी प्रसंगाने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. निंगनूर व आजूबाजूची अनेक गावेही या काळीज पिळविटणाऱ्या प्रसंगाने शोकमग्न झाली.

रेश्मा नितीन मुडे (२६), श्रावणी (६) आणि सार्थक (३) अशी त्या तीन मायलेकांची नावे आहेत. नितीन मुडे व रेश्मा मुडे यांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. नितीनला दारूचे व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे आर्थिक टंचाईत वाढ होत गेली. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर श्रावणी व सार्थक अशी फुले उमलली. दारूच्या व्यसनामुळे नितीनला ऑटोरिक्षा विकावी लागली. त्यामुळे तो रेश्माला माहेरवरून पैसे आणण्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होता, अशी माहिती रेश्माच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली. सततच्या जाचामुळे आयुष्याला कंटाळलेल्या रेश्माने आपली दोन्ही चिमुकले श्रावणी आणि सार्थक यांच्यासह आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. स्वतः विषाचा घोट घेत तिने दोन्ही निरागस लेकरांना विष पाजले.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसाआधी सोमवारी निंगनूर येथे ही घटना घडली होती. या घटनेत रेश्मासह दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. देशभर स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असताना हे आक्रीत घडले होते. या प्रसंगाने परिसरावर शोककळा पसरली. आईने पोटच्या गोळ्यांना घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे समाजमन सुन्न झाले. बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून तिन्ही मृतदेह निंगनूर येथे आणण्यात आले. त्यावेळी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता.

रेश्माच्या माहेरची मंडळी आणि आप्तेष्टांनी हंबरडा फोडला. तिघांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सासरच्यांना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. त्यानंतर रेश्माचा पती नितीन मुडे, सासरे किसन हेमला मुडे आणि सासू निर्गुणा मुडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध हुंडा बळी आणि छळ केल्याप्रकरणी भादंवि ४९८ अ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३०६ आणि ३४ कलमानुसार गुन्हा नोंद केला. त्यानंतर एकाच चितेवर तिन्ही मायलेकरांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जड अंतःकरणाने शेवटचा निरोप

रेश्मा, श्रावणी आणि सार्थकच्या मृतदेहांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे अंतःकरण भरून आले. मान्यवरांसह हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. निंगनूर येथे बुधवारी एकही चूल पेटली नाही. संपूर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येकजण दुःख व्यक्त करत होते. आबालवृद्धांच्या हुंदक्यांनी संपूर्ण परिसर गहिवरून गेला होता. सर्वच जण हळहळ व्यक्त करीत होते.

टॅग्स :YavatmalयवतमाळDomestic Violenceघरगुती हिंसाWomenमहिलाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी