शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

ऑनलाईन रॅकेटमध्ये परराज्यातील अधिक; सावध राहण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 1:39 PM

सायबर भामट्यांनी ९ लाखांवर रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकर्ज ते रिचार्जपर्यंत फसवणुकीचे जाळे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सवलतींचे कर्ज, निम्म्या रकमेत दुप्पट फायदा अशा अजब सवलतींचे जाळे अवतीभवती विणले गेले आहे. मोबाईलवर लोकांना आमिष दाखवून लूटले जाते. त्यात परराज्यातील लोकांची संख्या मोठी आहे. शिवाय जिल्ह्यातील काही लोकही या जाळयात सहभागी आहेत. यात फसलेल्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली, तरी या साखळया तुटता तुटत नाहीत, असेच चित्र आहे.मार्च ते ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत १०० च्यावर नागरिकांची फसवणूक झाली. सायबर भामट्यांनी ९ लाखांवर रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.तीन टक्के व्याजाने कर्जमोबाईलवर एक संदेश येतो, तीन टक्के वार्षिक व्याजाने कर्ज मिळेल. हवे असल्यास कॉल करा. लोक त्याला संपर्क करतात. त्याला नियम सांगितले जातात. त्यानुसार, तुम्ही ऑनलाईन कजार्साठी अर्ज करायचा. तुम्ही नोकरी करीत असाल तर पगारपत्रक, व्यवसाय असेल तर दुकानाचा परवाना, पत्ता, आधारकार्ड जोडा. त्याची पडताळणी होईल. तुमचे कर्ज मंजूर झाले आहे. असे सांगितले जाईल, तसा निरोप आल्यावर तुम्हाला प्रक्रिया शुल्क म्हणून एक हजार रुपये ऑनलाईन भरावे लागेल. त्यानंतर कर्जमंजुरीचा पहिला हप्ता दहा लाख असेल तर पाच लाख खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. त्याआधी तुम्हाला १५ हजार रुपये त्यांच्या खात्यावर ऑनलाईन भरावे लागतील. इथे विषय संपतो. कारण तुमच्याकडून १६ हजार रुपये लुटण्यासाठीच ही योजना आहे. कुणीही तुम्हाला कर्ज देणार नाही. आणि तशी अपेक्षाही करुन फसू नका.विम्यात सवलत...वाहनाचा विमा काढायचा आहे का, आमच्याकडे सर्व कंपन्यांचा विमा हप्त्यात ७० ते ८० टक्क्यांची सवलत योजना सुरु आहे...असे फोन आता येत आहेत. या कंपन्यांनी ऐवढी सवलत का दिली असेल. याची चौकशी केली असता ही फसवेगिरी असल्याचे समोर आले. कुठल्याच कंपनीने ८० टक्क्यांपर्यंत सवलत योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे अशा बनावट प्रतिनिधींपासून सावध राहिले पाहिजे.मोबाईल रिचार्जचा सापळाकाही दलालांनी मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून ग्राहकांना फसवायला सुरुवात केली आहे. सहा महिन्यांचे पैसे भरा आणि एक वर्ष रिचार्ज मिळवा... असा हा फंडा आहे. हाच फंडा डिश टीव्हीच्या रिचार्जसाठीही लावला जातो. त्यात एकदा पैसे भरले की, पहिल्या महिन्याचे रिचार्ज मिळते. मात्र, पुढे गायब असा अनेकांना अनुभव आला आहे. त्यातून हजारे रुपयांची फसवणूक झाली. एका मोबाईल कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधला असता कंपनीने अशी कोणतीही योजना दिली नसल्याचे सांगितले. ही योजना द्यायचीच असती तर साऱ्यांनाच खुली केली असती. असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम