शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

मोहन प्रकाश, अशोक चव्हाण करणार नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:34 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवार १६ आॅक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा सोमवारी जनआक्रोश मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवार १६ आॅक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील पक्षाचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. दुपारी १२ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातून हा मोर्चा निघणार आहे. जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना आतापर्यंत २१ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून ७०० पेक्षा अधिक लोक बाधित झाले आहे. मात्र त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याकडे फिरकलेले नाही. २१ मृत्यू होऊनही एका कृषी विकास अधिकाºयाचे निलंबन वगळता कुणावरही ठोस कारवाई झालेली नाही. याच मुद्याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने हा जनआक्रोश मोर्चा आयोजित केल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी सांगितले. फवारणीतील मृताच्या कुटुंबांना तत्काळ दहा लाख रुपयांची मदत देण्यात यावी, बाधितांच्या कुटुंबांनाही मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.