शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

मोहन प्रकाश, अशोक चव्हाण करणार नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:34 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवार १६ आॅक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा सोमवारी जनआक्रोश मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवार १६ आॅक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील पक्षाचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. दुपारी १२ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातून हा मोर्चा निघणार आहे. जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना आतापर्यंत २१ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून ७०० पेक्षा अधिक लोक बाधित झाले आहे. मात्र त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याकडे फिरकलेले नाही. २१ मृत्यू होऊनही एका कृषी विकास अधिकाºयाचे निलंबन वगळता कुणावरही ठोस कारवाई झालेली नाही. याच मुद्याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने हा जनआक्रोश मोर्चा आयोजित केल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी सांगितले. फवारणीतील मृताच्या कुटुंबांना तत्काळ दहा लाख रुपयांची मदत देण्यात यावी, बाधितांच्या कुटुंबांनाही मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.