शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

घराघरांतील भांडणांत खराब सेवा देणाऱ्या मोबाईल कंपन्या ठरल्या खलनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 11:55 IST

गेल्या ८ दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, यातून लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत.

ठळक मुद्देफोन येतो अन् मध्येच कटतो : बायकोची नाराजी अन् नवऱ्याची फजितीकार्यालयीन कामांतही गैरसमज वाढले : कॉल ड्रॉपचा संताप

यवतमाळ : ‘अतिपरिचयात अवज्ञा’ हा प्रकार सध्या मोबाईल फोनमुळे अतिवाढला आहे. आयडिया, वोडाफोन, एअरटेल, बीएसएनएलसारख्या कंपन्यांच्या नेटवर्क समस्येमुळे चक्क घरोघरी भांडणे वाढत आहेत; तर विविध कार्यालयांतील दैनंदिन कामावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र कंपन्यांची स्थानिक यंत्रणा या समस्येकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही.

गेल्या आठ दिवसांपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, आवाज आला तरी तुटक-तुटक ऐकायला येणे यातून लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत. अनेकांची चिडचिड होत आहे. विशेषत: दिवसभर घराबाहेर राहणारे नवरा-बायको या समस्येचे बळी ठरत आहेत.

एकमेकांना फोन केल्यावर मध्येच फोन कट झाल्यास गैरसमजातून पत्नी-पत्नीची भांडणे वाढली आहे. कार्यालयीन कामकाजासाठी सहकाऱ्यांनी एकमेकांना फोन केल्यास संपर्कच होत नाही. यातून शासकीय व खासगी कार्यालयांची कामे प्रभावित झाली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या उद्भवत असूनही मोबाईल व सिम कंपन्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यवतमाळात असलेल्या या कंपन्यांची सेंटर्स केवळ नाममात्र उरली आहेत. तेथे ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी धाव घेतल्यास ‘आमच्या हाती काहीच नाही, वरूनच प्राॅब्लेम आहे’ असे सांगून कर्मचारी जबाबदारी झटकतात.

जिल्ह्याचे शहर, पण परिस्थिती खेड्यासारखी

यवतमाळ हे जिल्हा मुख्यालयाचे शहर आहे. तरीही येथे फोनवरून होणाऱ्या संपर्काची परिस्थिती खेड्यापेक्षाही बिकट झाली आहे. एखाद्या खेड्यात मोबाईलची रेंज मिळविण्यासाठी जसे घराच्या छतावर चढणे, झाडावर चढण्याचे प्रकार घडतात, तशी अवस्था यवतमाळ शहरातील मोबाईलधारकांची झाली आहे.

प्रतिष्ठित कंपन्यांकडून डोळेझाक

बीएसएनएल, आयडिया, व्होडाफाेन, एअरटेलसारख्या प्रतिष्ठित मोबाईल कंपन्यांचे ग्राहक ‘काॅल ड्राॅप’च्या समस्येने आठ दिवसांपासून हैराण असताना या कंपन्यांकडून सेवेत सुधारणा झालेली नाही. ग्राहक स्थानिक कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जात आहे. त्यामुळे संपर्काच्या सोयीसाठी घेतलेला मोबाईल फोन अनेकांसाठी भांडणाचे मूळ ठरत आहे.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारMobileमोबाइलFamilyपरिवारtechnologyतंत्रज्ञान