शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांतील भांडणांत खराब सेवा देणाऱ्या मोबाईल कंपन्या ठरल्या खलनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 11:55 IST

गेल्या ८ दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, यातून लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत.

ठळक मुद्देफोन येतो अन् मध्येच कटतो : बायकोची नाराजी अन् नवऱ्याची फजितीकार्यालयीन कामांतही गैरसमज वाढले : कॉल ड्रॉपचा संताप

यवतमाळ : ‘अतिपरिचयात अवज्ञा’ हा प्रकार सध्या मोबाईल फोनमुळे अतिवाढला आहे. आयडिया, वोडाफोन, एअरटेल, बीएसएनएलसारख्या कंपन्यांच्या नेटवर्क समस्येमुळे चक्क घरोघरी भांडणे वाढत आहेत; तर विविध कार्यालयांतील दैनंदिन कामावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र कंपन्यांची स्थानिक यंत्रणा या समस्येकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही.

गेल्या आठ दिवसांपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, आवाज आला तरी तुटक-तुटक ऐकायला येणे यातून लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत. अनेकांची चिडचिड होत आहे. विशेषत: दिवसभर घराबाहेर राहणारे नवरा-बायको या समस्येचे बळी ठरत आहेत.

एकमेकांना फोन केल्यावर मध्येच फोन कट झाल्यास गैरसमजातून पत्नी-पत्नीची भांडणे वाढली आहे. कार्यालयीन कामकाजासाठी सहकाऱ्यांनी एकमेकांना फोन केल्यास संपर्कच होत नाही. यातून शासकीय व खासगी कार्यालयांची कामे प्रभावित झाली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या उद्भवत असूनही मोबाईल व सिम कंपन्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यवतमाळात असलेल्या या कंपन्यांची सेंटर्स केवळ नाममात्र उरली आहेत. तेथे ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी धाव घेतल्यास ‘आमच्या हाती काहीच नाही, वरूनच प्राॅब्लेम आहे’ असे सांगून कर्मचारी जबाबदारी झटकतात.

जिल्ह्याचे शहर, पण परिस्थिती खेड्यासारखी

यवतमाळ हे जिल्हा मुख्यालयाचे शहर आहे. तरीही येथे फोनवरून होणाऱ्या संपर्काची परिस्थिती खेड्यापेक्षाही बिकट झाली आहे. एखाद्या खेड्यात मोबाईलची रेंज मिळविण्यासाठी जसे घराच्या छतावर चढणे, झाडावर चढण्याचे प्रकार घडतात, तशी अवस्था यवतमाळ शहरातील मोबाईलधारकांची झाली आहे.

प्रतिष्ठित कंपन्यांकडून डोळेझाक

बीएसएनएल, आयडिया, व्होडाफाेन, एअरटेलसारख्या प्रतिष्ठित मोबाईल कंपन्यांचे ग्राहक ‘काॅल ड्राॅप’च्या समस्येने आठ दिवसांपासून हैराण असताना या कंपन्यांकडून सेवेत सुधारणा झालेली नाही. ग्राहक स्थानिक कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जात आहे. त्यामुळे संपर्काच्या सोयीसाठी घेतलेला मोबाईल फोन अनेकांसाठी भांडणाचे मूळ ठरत आहे.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारMobileमोबाइलFamilyपरिवारtechnologyतंत्रज्ञान