शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

घराघरांतील भांडणांत खराब सेवा देणाऱ्या मोबाईल कंपन्या ठरल्या खलनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 11:55 IST

गेल्या ८ दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, यातून लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत.

ठळक मुद्देफोन येतो अन् मध्येच कटतो : बायकोची नाराजी अन् नवऱ्याची फजितीकार्यालयीन कामांतही गैरसमज वाढले : कॉल ड्रॉपचा संताप

यवतमाळ : ‘अतिपरिचयात अवज्ञा’ हा प्रकार सध्या मोबाईल फोनमुळे अतिवाढला आहे. आयडिया, वोडाफोन, एअरटेल, बीएसएनएलसारख्या कंपन्यांच्या नेटवर्क समस्येमुळे चक्क घरोघरी भांडणे वाढत आहेत; तर विविध कार्यालयांतील दैनंदिन कामावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र कंपन्यांची स्थानिक यंत्रणा या समस्येकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही.

गेल्या आठ दिवसांपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, आवाज आला तरी तुटक-तुटक ऐकायला येणे यातून लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत. अनेकांची चिडचिड होत आहे. विशेषत: दिवसभर घराबाहेर राहणारे नवरा-बायको या समस्येचे बळी ठरत आहेत.

एकमेकांना फोन केल्यावर मध्येच फोन कट झाल्यास गैरसमजातून पत्नी-पत्नीची भांडणे वाढली आहे. कार्यालयीन कामकाजासाठी सहकाऱ्यांनी एकमेकांना फोन केल्यास संपर्कच होत नाही. यातून शासकीय व खासगी कार्यालयांची कामे प्रभावित झाली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या उद्भवत असूनही मोबाईल व सिम कंपन्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यवतमाळात असलेल्या या कंपन्यांची सेंटर्स केवळ नाममात्र उरली आहेत. तेथे ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी धाव घेतल्यास ‘आमच्या हाती काहीच नाही, वरूनच प्राॅब्लेम आहे’ असे सांगून कर्मचारी जबाबदारी झटकतात.

जिल्ह्याचे शहर, पण परिस्थिती खेड्यासारखी

यवतमाळ हे जिल्हा मुख्यालयाचे शहर आहे. तरीही येथे फोनवरून होणाऱ्या संपर्काची परिस्थिती खेड्यापेक्षाही बिकट झाली आहे. एखाद्या खेड्यात मोबाईलची रेंज मिळविण्यासाठी जसे घराच्या छतावर चढणे, झाडावर चढण्याचे प्रकार घडतात, तशी अवस्था यवतमाळ शहरातील मोबाईलधारकांची झाली आहे.

प्रतिष्ठित कंपन्यांकडून डोळेझाक

बीएसएनएल, आयडिया, व्होडाफाेन, एअरटेलसारख्या प्रतिष्ठित मोबाईल कंपन्यांचे ग्राहक ‘काॅल ड्राॅप’च्या समस्येने आठ दिवसांपासून हैराण असताना या कंपन्यांकडून सेवेत सुधारणा झालेली नाही. ग्राहक स्थानिक कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जात आहे. त्यामुळे संपर्काच्या सोयीसाठी घेतलेला मोबाईल फोन अनेकांसाठी भांडणाचे मूळ ठरत आहे.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारMobileमोबाइलFamilyपरिवारtechnologyतंत्रज्ञान