शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निधीअभावी मध्यान्ह भोजन योजना सापडली अडचणीत

By admin | Published: January 14, 2015 11:17 PM

प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़

वणी : प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना शाळांमध्ये सुरू झाली़ ग्रामीण भागातील शाळांत धान्याचा पुरवठा कंत्राटदाराद्वारे केला जातो़ शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळाचा पुरवठा केला जाते़ उर्वरित दाळ, कडधान्ये, तिखट, मीठ, हळद, मसाला हे बाजारातून विकत घेऊन विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याची सक्ती आहे़ ग्रामीण भागातील शाळांना भाजीपाला, इंधन, पूरक आहार व शिजविण्याची मजुरी यावरील खर्चाची रक्कम देण्यात येते़ शहरी भागातील शाळांना तांदूळाव्यतीरिक्त सर्व वस्तूंसाठी निधी दिला जातो़ मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून शाळांना हा निधी मिळाला नाही़ पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची सप्टेंबर महिन्यापर्यंतची रक्कम देण्यात आली आहे़ मात्र सहावी ते आठवीसाठीची आॅगस्ट महिन्यापासूनची रक्कम शाळांना अद्याप मिळाली नाही़ पाच महिन्यांपासून उधारीवर व्यवहार सुरू आहे़ आता मुख्याध्यापकांची ‘पत’ संपण्याची वेळ आली आहे़ मजुरी न मिळाल्याने स्वयंपाक करणारे मजूर व बचत गटही आर्थिक अडचणीत आले आहे़ त्यामुळे मध्यान्ह भोजनातील ‘कस’ लुप्त होण्याची वेळ आली आहे़चार-पाच महिन्यांसाठी दुकानदारही उधार देण्यास नकार देतात़ भाजीपाला व इंधन उधार मिळत नसल्याने त्यावरील खर्च मुख्याध्यापकांना स्वत:जवळून करावा लागतो़ मुख्याध्यापकांची चार-पाच महिन्याची रक्कम गुंतल्याने तेही अडचणीत आले आहे़ मध्यान्ह भोजन योजना व्यवस्थित चालवायची असेल, तर दर महिन्याला निधी मिळणे आवश्यक आहे़ रक्कम न मिळाल्याने आपोआपच या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागण्याची शक्यता बळावते. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)